ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द, दहावीचे दोन पेपर वेळापत्रकानुसारच - वर्षा गायकवाड

author img

By

Published : Mar 20, 2020, 1:59 PM IST

Updated : Mar 20, 2020, 3:58 PM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दहावीच्या परीक्षेचे दोनच पेपर हे शिल्लक राहिले असल्याने ते नियोजित वेळात्रकानुसारच होतील. त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Varsha gaikwad comment on corona crisis
वर्षा गायकवाड

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द केल्या असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ९ वी आणि ११ वीचे पेपर १५ एप्रिलनंतर घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच १० वीचे शिक्षक सोडून इतर शिक्षकांनी घरुनच काम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. १० वी चे राहिलेल्या विषयाचे पेपर मात्र, वेळापत्रकारनुसारच होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. १ ले ८ वी पर्यंतच्या परीक्षा मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. ९ वी आणि ११ वी च्या परीक्षेचा निर्यण १५ एप्रिलनंतर घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द

सीबीएसई आणि इतर केंद्रीय मंडळाने आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय घेतल्यानंतर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेतल्या जाणार असल्याचे जाहीर केले. दहावीच्या परीक्षेचे दोनच पेपर हे शिल्लक राहिले असल्याने ते नियोजित वेळात्रकानुसारच होतील. त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहितीही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेते केली.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच शाळा- महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. तर, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाजगी कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानेही बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली आणि आठवीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करून त्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील. बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपल्या असून दहावीच्या परीक्षेचे केवळ दोनच परीक्षा पेपर शिल्लक असल्याने त्यात कोणताही बदल केला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांना वर्क फॉर्म होमची मुभा -

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार शिक्षकांना आजपासून वर्क फॉर्म होमची मुभा देण्यात आली आहे. त्याचाही आज निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे आजपासून घरातूनच काम करू शकतील.

दहावीचे दोनच पेपर शिल्लक -

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीची ३ मार्चपासून सुरू झालेली परीक्षा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून केवळ दोनच विषयाचे पेपर शिल्लक आहेत. यात, शनिवारी २१ मार्च आणि सोमवारी २३ मार्च रोजी असे २ पेपर शिल्लक आहेत ते पेपर नियोजित वेळेतच घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द केल्या असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ९ वी आणि ११ वीचे पेपर १५ एप्रिलनंतर घेतले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच १० वीचे शिक्षक सोडून इतर शिक्षकांनी घरुनच काम करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. १० वी चे राहिलेल्या विषयाचे पेपर मात्र, वेळापत्रकारनुसारच होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. १ ले ८ वी पर्यंतच्या परीक्षा मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. ९ वी आणि ११ वी च्या परीक्षेचा निर्यण १५ एप्रिलनंतर घेतला जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द

सीबीएसई आणि इतर केंद्रीय मंडळाने आपल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचा निर्णय घेतल्यानंतर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेतल्या जाणार असल्याचे जाहीर केले. दहावीच्या परीक्षेचे दोनच पेपर हे शिल्लक राहिले असल्याने ते नियोजित वेळात्रकानुसारच होतील. त्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहितीही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेते केली.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच शाळा- महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. तर, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खाजगी कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानेही बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली आणि आठवीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करून त्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येतील. बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपल्या असून दहावीच्या परीक्षेचे केवळ दोनच परीक्षा पेपर शिल्लक असल्याने त्यात कोणताही बदल केला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षकांना वर्क फॉर्म होमची मुभा -

राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार शिक्षकांना आजपासून वर्क फॉर्म होमची मुभा देण्यात आली आहे. त्याचाही आज निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे आजपासून घरातूनच काम करू शकतील.

दहावीचे दोनच पेपर शिल्लक -

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीची ३ मार्चपासून सुरू झालेली परीक्षा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून केवळ दोनच विषयाचे पेपर शिल्लक आहेत. यात, शनिवारी २१ मार्च आणि सोमवारी २३ मार्च रोजी असे २ पेपर शिल्लक आहेत ते पेपर नियोजित वेळेतच घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Mar 20, 2020, 3:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.