ETV Bharat / state

यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनी राज्याच्या विधानभवनाचा झाला 'राजकीय आखाडा'

author img

By

Published : Nov 25, 2019, 6:12 PM IST

Updated : Nov 25, 2019, 9:41 PM IST

आज राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने विधानभवन परिसरात राजकीय नेत्यांनी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली. यामध्ये राज्यातील नव्या सरकारमध्ये सामील असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या मनधरणीसाठी आलेल्या नेत्यांचाही समावेश होता.

यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिदिनी राज्याच्या विधानभवनाचा झाला 'राजकीय आखाडा'

मुंबई - राज्यात स्थापन झालेले भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारबाबत सर्वोच्च न्यायालय नक्की काय निर्णय घेणार याबाबत टांगती तलवार कायम आहे. नव्या सरकारबाबत संभ्रम असतानाच आज सकाळपासून मुंबईतील विधानभवन हे राजकीय आखड्याचे केंद्र बनल्याचे चित्र पाहायला मिळाले. याला महाराष्ट्राचे शिल्पकार यंशवतराव चव्हाण यांचा स्मृतिदिनाचे कारण ठरले आहे.

सगळ्यात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर लगेचच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात आले. त्यांनीही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करून विधानभवन गाठलं. मात्र, त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँगेसचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील हे देखील विधानभवनात आले. त्यांनी पुन्हा एकदा अजित दादाची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सुद्धा विधानभवनात आले आणि त्यांनीही मनधरणीसाठी जोर वाढवला असल्याची चर्चा आहे. मात्र तेवढ्यात सुनील तटकरे विधानभवनातून बाहेर आले आणि माध्यमाचा गराडा बाजूला करून काहीही न बोलता निघून गेले.

विधानभवनाचा झाला 'राजकीय आखाडा'
हा सर्व प्रकार सुरू असतानाच थोड्याच वेळात काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे देखील विधानभवनात पोहोचले. मात्र त्यांनी आपण यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलो असल्याचं सांगितले. लगेच त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाले. तुम्ही अजित पवार यांची समजूत काढणार नाही का? अशी त्यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी त्यावेळी हा राष्ट्रवादी काँगेसचा अंतर्गत प्रश्न असून ते आणि त्यांचे नेतेच त्यातून मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया दिली.काँग्रेस नेत्यांचा आदरांजली कार्यक्रम संपताच थोड्याच वेळात शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांचंही विधानभवनात आगमन झालं. मात्र त्यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचं पत्र पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष यांना देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. मात्र अजितदादांच्या विषयावर त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असे म्हणत कानावर हात ठेवले.यांच्याशिवाय दिवसभर भाजप नेते राम शिंदे, बबनराव पाचपुते, अनिल बोंडे हे देखील येऊन गेले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील दादांच्या बंडामुळे त्यांना कुणी फारस महत्त्व दिले नाही. थोडक्यात काय यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीच्या निमित्ताने विधानभवनात जमलेल्या नेत्यांनी दादांची समजूत काढून काका-पुतण्यात पुन्हा एकदा प्रीती संगम जुळतो का? याचेच प्रयत्न केल्याचे चित्र यावेळी दिसून येत होते.

मुंबई - राज्यात स्थापन झालेले भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या सरकारबाबत सर्वोच्च न्यायालय नक्की काय निर्णय घेणार याबाबत टांगती तलवार कायम आहे. नव्या सरकारबाबत संभ्रम असतानाच आज सकाळपासून मुंबईतील विधानभवन हे राजकीय आखड्याचे केंद्र बनल्याचे चित्र पाहायला मिळाले. याला महाराष्ट्राचे शिल्पकार यंशवतराव चव्हाण यांचा स्मृतिदिनाचे कारण ठरले आहे.

सगळ्यात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर लगेचच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात आले. त्यांनीही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करून विधानभवन गाठलं. मात्र, त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँगेसचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील हे देखील विधानभवनात आले. त्यांनी पुन्हा एकदा अजित दादाची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सुद्धा विधानभवनात आले आणि त्यांनीही मनधरणीसाठी जोर वाढवला असल्याची चर्चा आहे. मात्र तेवढ्यात सुनील तटकरे विधानभवनातून बाहेर आले आणि माध्यमाचा गराडा बाजूला करून काहीही न बोलता निघून गेले.

विधानभवनाचा झाला 'राजकीय आखाडा'
हा सर्व प्रकार सुरू असतानाच थोड्याच वेळात काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे देखील विधानभवनात पोहोचले. मात्र त्यांनी आपण यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलो असल्याचं सांगितले. लगेच त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाले. तुम्ही अजित पवार यांची समजूत काढणार नाही का? अशी त्यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी त्यावेळी हा राष्ट्रवादी काँगेसचा अंतर्गत प्रश्न असून ते आणि त्यांचे नेतेच त्यातून मार्ग काढतील, अशी प्रतिक्रिया दिली.काँग्रेस नेत्यांचा आदरांजली कार्यक्रम संपताच थोड्याच वेळात शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांचंही विधानभवनात आगमन झालं. मात्र त्यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचं पत्र पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष यांना देण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. मात्र अजितदादांच्या विषयावर त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असे म्हणत कानावर हात ठेवले.यांच्याशिवाय दिवसभर भाजप नेते राम शिंदे, बबनराव पाचपुते, अनिल बोंडे हे देखील येऊन गेले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील दादांच्या बंडामुळे त्यांना कुणी फारस महत्त्व दिले नाही. थोडक्यात काय यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीच्या निमित्ताने विधानभवनात जमलेल्या नेत्यांनी दादांची समजूत काढून काका-पुतण्यात पुन्हा एकदा प्रीती संगम जुळतो का? याचेच प्रयत्न केल्याचे चित्र यावेळी दिसून येत होते.
Intro:(या बातमीसाठी लागणारे व्हिज्युअल्स मी पाठवत असून अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचा बाईट सचिन गडहिरे आणि अनिल निर्मळ यांनी लाईव्ह व्ह्यू वरून पाठवला आहे.)

राज्यात स्थापन झालेले भाजप आणि राष्ट्रवादी यांचे सरकार बाबत सर्वोच्च न्यायालय नक्की काय निर्णय घेणार याबाबत टांगती तलवार कायम असतानाच आज सकाळपासून मुंबईतील विधानभवन हे राजकीय आखड्याचे केंद्र बनले.

सगळ्यात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन आदरांजली अर्पण केली त्यानंतर लगेचच मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार विधानभवनात आले. त्यांनीही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करून विधानभवन गाठलं. मात्र त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँगेसचे नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील हे देखील विधानभवनात आले. त्यांनी पुन्हा एकदा अजित दादाची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगू लागल्या. थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील सुद्धा विधानभवनात आले. आणि ही मनधरणी जोर धरत असल्याची चर्चा वाढली. मात्र तेवढ्यात सुनील तटकरे विधांभवणातून बाहेर आले आणि माध्यमाचा गराडा बाजूला करून काहीही न बोलता निघून गेले.

थोड्याच वेळात काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे देखील विधानभवनात पोहोचले. मात्र त्यांनी आपण यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं. लगोलग त्यांनी यशवंतरावांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाले. तुम्ही अजित पवार यांची समजूत काढणार नाही का अस विचारण्यात आल त्यावेळी त्यांनी हा राष्ट्रवादी काँगेसचा अंतर्गत प्रश्न असून ते आणि त्यांचे नेतेच त्यातून मार्ग काढतील अशी प्रतिक्रिया दिली.


थोड्याच वेळात शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांचंही विधानभवनात आगमन झालं. मात्र त्यांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचं पत्र पक्षाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष याना देण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं. मात्र अजितदादांच्या विषयावर त्यानीही राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न अस म्हनून कानावर हात ठेवले.

यांच्याशिवाय दिवसभर भाजप नेते राम शिंदे, बबनराव पाचपुते, अनिल बॉंडे हे देखील येऊन गेले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील दादांच्या बंडामुळे त्यांना कुणी फारस महत्त्व दिलं नाही. थोडक्यात काय यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीच्या निमित्ताने विधानभवनात जमलेल्या नेत्यांनी दादांची समजूत काढून काका पुतण्यात पुन्हा एकदा प्रीती संगम जुळतो का याचेच प्रयत्न केले.


Body:.


Conclusion:.
Last Updated : Nov 25, 2019, 9:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.