मुंबई - वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी आंतराराष्ट्रीय विश्वविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून समाजामध्ये होणाऱ्या वाईट घटना त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. विद्यार्थ्यांच्या या कृतीमुळे विद्यापीठाने दिनांक ९ ऑक्टोबरला एस. सी. प्रवर्गातील 3 व ओबीसी प्रवर्गातील 3 अशा एकूण 6 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या आदेशात विश्वविद्यालयाने या विद्यार्थ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे कारण दिले. याविरोधात काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन विद्यापीठाच्या प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.
![congress gave complaint to chief election officer in mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4732919_53_4732919_1570891798743.png)
हेही वाचा - 'भाजपला सत्ता येणार असल्याचा विश्वास, मग मोदी-शाहंच्या सभा का?'
यासंदर्भात बोलताना पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की देशपातळीवरती गेल्या 5 वर्षांमध्ये मनुवादी विचारधारा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न संघ विचारातून सुरु आहेत. याकरिता जाणीवपूर्वक विद्यापीठांना लक्ष्य करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर अत्याचार केले जात आहेत. रोहित वेमुला प्रकरण असेल, आयआयटी मद्रास येथील घटना, दिल्ली विद्यापीठातील घटना असोत वा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटना असोत यामागे एक समान दुवा आहे, असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा - पीएमसीसह सिटी बँकेच्या खातेधारकांना राज ठाकरेंचे आश्वासन
वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील विद्यार्थी हे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. वेगवेगळ्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांनी कांशीराम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशात घडणाऱ्या अनुचित घटना त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता. समाजातील महत्त्वाच्या ४९ विचारवंत व कलाकारांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला विरोध प्रकट केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार असेल, चिन्मयानंद वा कुलदीप सेंगर यांनी महिलांवर केलेला अत्याचार असेल, काश्मीरमध्ये गेल्या 2 महिन्यांपासून संचारबंदीचे वातावरण असेल किंवा मॉबलिंचिंग सारख्या घटना असतील या संबंधात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदी यांना सामूहिक पत्रे लिहिली.
हेही वाचा - मतदारांना सुरक्षित छत्र आणि तरुणांना नशेतून मुक्त करण्यासाठी काम करणार - यामिनी जाधव
विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ते रूचले नाही आणि सरकारची मर्जी सांभाळण्याकरता यातील निवडक 6 विद्यार्थ्यांना त्यांची सामाजिक पार्श्वभूमी पाहून कारवाई केली, असा आरोप त्यांनी केला. तसेच यातील आश्चर्याची बाब म्हणजे कारवाईकरता निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे कारण दाखवले गेले आहे. याविरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यापीठाला अशा तऱ्हेचा निवडणूक आचारसंहिताभंगाबद्दल कारवाई करण्याचा विशेषाधिकार आयोगाने दिला आहे का? अशी विचारणा केली. तसेच विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसच्या विधी विभागाचे अॅड. विजय पांडे ही उपस्थित होते.