ETV Bharat / state

जंगल वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या आदिवासी महिलेची संघर्षमय कहाणी - जंगल वाचवणाऱ्या महिलेची संघर्षमय कहाणी

निसर्ग हा आमचा मायबाप आहे आणि आमच्या या माय-बापाच्या जिवावर कुणी उठत असेल तर ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असे म्हणत या महिलेने 'आरे बचाव'ची हाक दिली. आरे, जंगल वाचवण्यासाठी ही महिला प्रसंगी तुरुंगातही गेली, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण ती काही डगमगली नाही.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Mar 7, 2021, 10:33 PM IST

Updated : Mar 7, 2021, 10:54 PM IST

मुंबई - आज जागतिक महिला दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी गृहिणींपासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कामाचा गौरव केला जातो, त्याचं कौतुक केलं जातं. तेव्हा असंच कौतुक करावं असं काम आरेतील जंगलात आदिवासी पाड्यात राहणारी एक आदिवासी महिला मागील सहा करत आहे. निसर्ग हा आमचा मायबाप आहे आणि आमच्या या मायबापाच्या जिवावर जर कुणी उठत असेल तर ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असं म्हणत या महिलेने 'आरे बचाव' आधी हाक दिली. आरे, जंगल वाचवण्यासाठी ही महिला प्रसंगी तुरुंगात ही गेली, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण ती काही डगमगली नाही. उलट मेट्रो कारशेड आणि इतर प्रकल्प आरे जंगलातून हद्दपार करण्यासाठी आणखी खंबीर होत ती लढा देत आहे. तर या अशा लढवय्या आदिवासी महिलेचं नाव आहे प्रमिला भोईर. आज जागतिक दिन जंगल वाचवण्यासाठीचा त्यांची लढाई कशी सुरू आहे याची ही कहाणी.

मुंबई

सहा वर्षांपूर्वी सामाजिक कार्यात उडी
प्रमिला भोईर या मूळच्या डहाणूच्या. त्या प्रकाश भोईर यांच्याशी लग्न करून ....आरेतील केलटी पाडा येथे आल्या. तेव्हा त्यांचे वास्तव्य आरे जंगलातील याच पाड्यात. सर्वसामान्य आदिवासी महिलेप्रमाणे शेती करायची, भाजीची विकायची आणि घरची सर्व काम कफायची असं त्यांचं आयुष्य सुरू होतं. अशात आरे जंगलात मेट्रो कारडेपो बांधण्यात येत आहे, इथं मोठ्या प्रमाणावर झाडे कापली जाणार आहेत, जंगल नष्ट केलं जाणार आहे हे जेव्हा आदिवासीयांना समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यातून मग सुरू झाला 'आरे बचाव' आंदोलनाचा लढा. कारशेडला 27 ही पाड्यातील आदिवासीयांना जोरदार विरोध करत रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई सुरू केली. या लढाई प्रकाश भोईर अग्रस्थानी होते. त्यांच्या बरोबरीने मग प्रमिलाजी ही या लढाईत उतरल्या आणि आरे बचाव शी जोडल्या गेल्या. जिथे जिथे आरे बचावसाठी आंदोलन असेल तिथे त्या पोहचू लागल्या. सरकारी स्तरावर त्या कारशेड हलवण्यासाठी पाठपुरावा करू लागल्या. असं करता करता त्या आरे बचाव आंदोलनातील आघाडीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
'त्या' दोन रात्री मी खूप रडले!
4 ऑक्टोबर 2019 हा दिवस मुंबईकर आणि खरे पर्यावरण प्रेमी कधीच विसरणार नाही. याच दिवशी रात्री अंधारात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडुन कारशेडसाठी अनधिकृत झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर सरकार, पोलीस विरुद्ध आदिवासी-पर्यावरणप्रेमी असा संघर्ष निर्माण झाला होता. प्रमिला भोईर यांना जेव्हा आरेत अनधिकृतपणे झाडांची कत्तल केली जात असल्याचे समजले तेव्हा त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. ही कत्तल रोखण्यासाठी कडाडून विरोध केला. रात्रभर त्या आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करत होत्या. 5 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता त्यांना अटक झाली. त्यांना दोन दिवस तुरुंगात राहावं लागलं. त्यांच्यासह 29 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यात त्यांच्यासह पाच महिला होत्या. एक आदिवासी महिला जिचं सगळं आयुष्य हे जंगलाने व्यापलेलं, अशावेळी कधी विचार ही केला नव्हता की आपल्याला कधी तुरुंगात जावं लागेल तिथे रहावं लागेल. पण ते घडलं. त्या दोन रात्री, तीन दिवस रडत आणि दुःखात आपण घालवल्याचं त्या सांगतात. तुरुंगात जावं लागतंय वा आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे याचं मुळीच दुःख मला नव्हतं. तर मला दुःख होतं की आरेतील झाडे कापल्याचं. धरती मातेला आम्ही मायबाप मानतो, सूर्या-प्राण्यांना-पक्ष्यांना देव आज झाडांना आम्ही आमची मुलं मानतो. तेव्हा अशी झाडे आमच्या डोळ्यादेखत कापली जातात तेव्हा आमच्या काळजाला चिरा पडतात असं सांगताना आज ही त्यांचे डोळे पणावतात. तर जंगलाची एक इंचही जागा यापुढे कुठल्याही प्रकल्पासाठी आम्ही देऊ देणार नाही, असा इशारा ही त्या देतात.


माणूस म्हणूनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं...

आरे बचाव आंदोलनाशी प्रमिला भोईर जोडल्या गेल्या आहेत, पण इतकीच त्यांची ओळख नाही तर आज त्या आदिवासीयांच्या न्याय हक्कासाठी ही लढत आहेत. आदिवासी हक्क संवर्धन समितीच्या माध्यमातून त्या पाड्यात वीज, पाणी, रस्ते, शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहेत. आमच्या पिढ्यान पिढ्या अंधारात जन्माला आल्या, आयुष्यभर तहानलेल्या राहिल्या. पण आता आमची नवीन पिढी मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहे, ती शिक्षित होत आहे, त्यांना विविध क्षेत्रात मोठ होताना आम्हाला पाहायचं आहे. पण हे करण्यासाठी आम्हाला वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा हव्या आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात आमचे पाडे असताना आम्ही आज ही अंधारात आहोत, तहानलेले आहोत. वीज, पाणी यावी यासाठी आम्हाला 2021 मध्ये ही संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्या व्यक्त करतात. तर आदिवासीयांच्या अनेक छोट्या मोठ्या समस्या असून मुळात आम्हाला माणूस म्हणून आज ही मुख्य प्रवाहातील समाज आमच्याकडे बघत नाही. आम्हाला कोणताही धर्म नाही, जात नाही. आमचा धर्म एकच माणूस धर्म. तर हे जंगलचं आमचं सर्वस्व. तेव्हा हे जंगल, आमचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी मला यापुढे ही लढावं लागलं, तुरुंगात जावं लागलं तरी माझी तयारी आहे असं ही त्या सांगतात. शेवटी प्रमिला भोईर यांचे पती प्रकाश भोईर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर म्हणावं लागेल, "माणूस म्हणूनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं
आज नाय उद्याला मरायचं
मग कशाला मागं सरायचं!"
म्हणजेच मरणाला न घाबरता, कुठल्याही परिस्थितीला ना घाबरता प्रमिला भोईर आणि त्यांच्या समाजाचा जंगल वाचवण्यासाठीचा तसेच आदिवासीयांच्या न्याय हक्कासाठीचा लढा असाच अविरत सुरू राहणार आहे. तेव्हा आजच्या जागतिक महिला दिनी त्यांना 'ईटीव्ही भारत'कडून शुभेच्छा देत त्यांचा हा लढा यशस्वी होवो याच सदिच्छा व्यक्त करू.

मुंबई - आज जागतिक महिला दिन जगभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी गृहिणींपासून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कामाचा गौरव केला जातो, त्याचं कौतुक केलं जातं. तेव्हा असंच कौतुक करावं असं काम आरेतील जंगलात आदिवासी पाड्यात राहणारी एक आदिवासी महिला मागील सहा करत आहे. निसर्ग हा आमचा मायबाप आहे आणि आमच्या या मायबापाच्या जिवावर जर कुणी उठत असेल तर ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असं म्हणत या महिलेने 'आरे बचाव' आधी हाक दिली. आरे, जंगल वाचवण्यासाठी ही महिला प्रसंगी तुरुंगात ही गेली, तिच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण ती काही डगमगली नाही. उलट मेट्रो कारशेड आणि इतर प्रकल्प आरे जंगलातून हद्दपार करण्यासाठी आणखी खंबीर होत ती लढा देत आहे. तर या अशा लढवय्या आदिवासी महिलेचं नाव आहे प्रमिला भोईर. आज जागतिक दिन जंगल वाचवण्यासाठीचा त्यांची लढाई कशी सुरू आहे याची ही कहाणी.

मुंबई

सहा वर्षांपूर्वी सामाजिक कार्यात उडी
प्रमिला भोईर या मूळच्या डहाणूच्या. त्या प्रकाश भोईर यांच्याशी लग्न करून ....आरेतील केलटी पाडा येथे आल्या. तेव्हा त्यांचे वास्तव्य आरे जंगलातील याच पाड्यात. सर्वसामान्य आदिवासी महिलेप्रमाणे शेती करायची, भाजीची विकायची आणि घरची सर्व काम कफायची असं त्यांचं आयुष्य सुरू होतं. अशात आरे जंगलात मेट्रो कारडेपो बांधण्यात येत आहे, इथं मोठ्या प्रमाणावर झाडे कापली जाणार आहेत, जंगल नष्ट केलं जाणार आहे हे जेव्हा आदिवासीयांना समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यातून मग सुरू झाला 'आरे बचाव' आंदोलनाचा लढा. कारशेडला 27 ही पाड्यातील आदिवासीयांना जोरदार विरोध करत रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई सुरू केली. या लढाई प्रकाश भोईर अग्रस्थानी होते. त्यांच्या बरोबरीने मग प्रमिलाजी ही या लढाईत उतरल्या आणि आरे बचाव शी जोडल्या गेल्या. जिथे जिथे आरे बचावसाठी आंदोलन असेल तिथे त्या पोहचू लागल्या. सरकारी स्तरावर त्या कारशेड हलवण्यासाठी पाठपुरावा करू लागल्या. असं करता करता त्या आरे बचाव आंदोलनातील आघाडीच्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
'त्या' दोन रात्री मी खूप रडले!
4 ऑक्टोबर 2019 हा दिवस मुंबईकर आणि खरे पर्यावरण प्रेमी कधीच विसरणार नाही. याच दिवशी रात्री अंधारात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)कडुन कारशेडसाठी अनधिकृत झाडांची कत्तल करण्यात आली होती. त्यानंतर सरकार, पोलीस विरुद्ध आदिवासी-पर्यावरणप्रेमी असा संघर्ष निर्माण झाला होता. प्रमिला भोईर यांना जेव्हा आरेत अनधिकृतपणे झाडांची कत्तल केली जात असल्याचे समजले तेव्हा त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली. ही कत्तल रोखण्यासाठी कडाडून विरोध केला. रात्रभर त्या आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करत होत्या. 5 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता त्यांना अटक झाली. त्यांना दोन दिवस तुरुंगात राहावं लागलं. त्यांच्यासह 29 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. यात त्यांच्यासह पाच महिला होत्या. एक आदिवासी महिला जिचं सगळं आयुष्य हे जंगलाने व्यापलेलं, अशावेळी कधी विचार ही केला नव्हता की आपल्याला कधी तुरुंगात जावं लागेल तिथे रहावं लागेल. पण ते घडलं. त्या दोन रात्री, तीन दिवस रडत आणि दुःखात आपण घालवल्याचं त्या सांगतात. तुरुंगात जावं लागतंय वा आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे याचं मुळीच दुःख मला नव्हतं. तर मला दुःख होतं की आरेतील झाडे कापल्याचं. धरती मातेला आम्ही मायबाप मानतो, सूर्या-प्राण्यांना-पक्ष्यांना देव आज झाडांना आम्ही आमची मुलं मानतो. तेव्हा अशी झाडे आमच्या डोळ्यादेखत कापली जातात तेव्हा आमच्या काळजाला चिरा पडतात असं सांगताना आज ही त्यांचे डोळे पणावतात. तर जंगलाची एक इंचही जागा यापुढे कुठल्याही प्रकल्पासाठी आम्ही देऊ देणार नाही, असा इशारा ही त्या देतात.


माणूस म्हणूनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं...

आरे बचाव आंदोलनाशी प्रमिला भोईर जोडल्या गेल्या आहेत, पण इतकीच त्यांची ओळख नाही तर आज त्या आदिवासीयांच्या न्याय हक्कासाठी ही लढत आहेत. आदिवासी हक्क संवर्धन समितीच्या माध्यमातून त्या पाड्यात वीज, पाणी, रस्ते, शौचालय अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करत आहेत. आमच्या पिढ्यान पिढ्या अंधारात जन्माला आल्या, आयुष्यभर तहानलेल्या राहिल्या. पण आता आमची नवीन पिढी मुख्य प्रवाहात येऊ पाहत आहे, ती शिक्षित होत आहे, त्यांना विविध क्षेत्रात मोठ होताना आम्हाला पाहायचं आहे. पण हे करण्यासाठी आम्हाला वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा हव्या आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात आमचे पाडे असताना आम्ही आज ही अंधारात आहोत, तहानलेले आहोत. वीज, पाणी यावी यासाठी आम्हाला 2021 मध्ये ही संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्या व्यक्त करतात. तर आदिवासीयांच्या अनेक छोट्या मोठ्या समस्या असून मुळात आम्हाला माणूस म्हणून आज ही मुख्य प्रवाहातील समाज आमच्याकडे बघत नाही. आम्हाला कोणताही धर्म नाही, जात नाही. आमचा धर्म एकच माणूस धर्म. तर हे जंगलचं आमचं सर्वस्व. तेव्हा हे जंगल, आमचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी मला यापुढे ही लढावं लागलं, तुरुंगात जावं लागलं तरी माझी तयारी आहे असं ही त्या सांगतात. शेवटी प्रमिला भोईर यांचे पती प्रकाश भोईर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर म्हणावं लागेल, "माणूस म्हणूनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं
आज नाय उद्याला मरायचं
मग कशाला मागं सरायचं!"
म्हणजेच मरणाला न घाबरता, कुठल्याही परिस्थितीला ना घाबरता प्रमिला भोईर आणि त्यांच्या समाजाचा जंगल वाचवण्यासाठीचा तसेच आदिवासीयांच्या न्याय हक्कासाठीचा लढा असाच अविरत सुरू राहणार आहे. तेव्हा आजच्या जागतिक महिला दिनी त्यांना 'ईटीव्ही भारत'कडून शुभेच्छा देत त्यांचा हा लढा यशस्वी होवो याच सदिच्छा व्यक्त करू.

Last Updated : Mar 7, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.