ETV Bharat / state

मुंबईकरांसाठी रेल्वे सुरू करा; खासदार मनोज कोटक यांची मागणी

मुंबईमधील 95 टक्के लोकल ट्रेन सुरू आहेत. मात्र, त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा नाही. बेस्टच्या बसेसना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यामधून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी लोकल ट्रेन सुरू करा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिली.

author img

By

Published : Jan 21, 2021, 4:18 PM IST

Updated : Jan 21, 2021, 7:35 PM IST

MP Manoj Kotak news
खासदार मनोज कोटक बातमी

मुंबई - मुंबईमधील 95 टक्के लोकल ट्रेन सुरू आहेत. मात्र, त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा नाही. बेस्टच्या बसेसना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यामधून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी लोकल ट्रेन सुरू करा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिली.

हेही वाचा - वर्कफ्रॉम होम ट्रेंडचा बांधकाम क्षेत्राला 'असा'ही फायदा

रेल्वे सुरू करा -

संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक दोन टप्प्यात होत आहे. मुंबई रायगड आणि पुणे येथील 24 पैकी 12 खासदार या बैठकीला हजर होते. या बैठकीनंतर मनोज कोटक माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईत 95 टक्के लोकल सुरू आहेत. मात्र, त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा नाही. बेस्टमधून गर्दी होते आहे. मुंबईकरांनी किती वाट बघायची, असा प्रश्न आपण उपस्थित केला. याला शिवसेनेच्या खासदारांनीही पाठिंबा दिल्याची माहिती कोटक यांनी दिली.

खासदारांनी एकत्र यावे -

राज्याला जीएसटीच्या माध्यमाने मिळणारा परतावा केंद्राकडून आणण्यासाठी खासदारांनी एकत्र यावे. कारशेड सारख्या प्रश्नावर राज्यातील खासदारांनी राज्य सरकारला समर्थन द्यावे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमाप्रश्नी सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी खासदारांना केल्याची माहिती कोटक यांनी दिली.

आघाडीत विसंवाद -

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री संभाजीनगर बोलतात, मात्र महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष त्याला विरोध करतात. यावरून महाविकास आघाडीत विसंवाद आहे, असे कोटक म्हणाले.

उत्साहाने लस घेतील -

कोरोनावरील लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. यावर बोलताना कोरोनावर लसीकरण देशभर होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. इतरांनी घ्यावी की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. नागरिक उत्साहाने लस घेतील, असे कोटक म्हणाले.

उद्धव यांना शुभेच्छा -

जयंत पाटील यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पडू लागली आहेत. यावर बोलताना जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच बसले होते. एकाच खुर्चीचा फरक होता. ती खुर्ची बदलू शकते. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आमच्या शुभेच्छा असल्याचे कोटक म्हणाले.

हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलीस शिपायावर हवालदाराचा वारंवार बलात्कार

मुंबई - मुंबईमधील 95 टक्के लोकल ट्रेन सुरू आहेत. मात्र, त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा नाही. बेस्टच्या बसेसना प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे. यामधून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी लोकल ट्रेन सुरू करा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिली.

हेही वाचा - वर्कफ्रॉम होम ट्रेंडचा बांधकाम क्षेत्राला 'असा'ही फायदा

रेल्वे सुरू करा -

संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. ही बैठक दोन टप्प्यात होत आहे. मुंबई रायगड आणि पुणे येथील 24 पैकी 12 खासदार या बैठकीला हजर होते. या बैठकीनंतर मनोज कोटक माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईत 95 टक्के लोकल सुरू आहेत. मात्र, त्यामधून सामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा नाही. बेस्टमधून गर्दी होते आहे. मुंबईकरांनी किती वाट बघायची, असा प्रश्न आपण उपस्थित केला. याला शिवसेनेच्या खासदारांनीही पाठिंबा दिल्याची माहिती कोटक यांनी दिली.

खासदारांनी एकत्र यावे -

राज्याला जीएसटीच्या माध्यमाने मिळणारा परतावा केंद्राकडून आणण्यासाठी खासदारांनी एकत्र यावे. कारशेड सारख्या प्रश्नावर राज्यातील खासदारांनी राज्य सरकारला समर्थन द्यावे. महाराष्ट्र, कर्नाटक सीमाप्रश्नी सर्व पक्षीय खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी खासदारांना केल्याची माहिती कोटक यांनी दिली.

आघाडीत विसंवाद -

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री संभाजीनगर बोलतात, मात्र महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्ष त्याला विरोध करतात. यावरून महाविकास आघाडीत विसंवाद आहे, असे कोटक म्हणाले.

उत्साहाने लस घेतील -

कोरोनावरील लस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. यावर बोलताना कोरोनावर लसीकरण देशभर होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. इतरांनी घ्यावी की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. नागरिक उत्साहाने लस घेतील, असे कोटक म्हणाले.

उद्धव यांना शुभेच्छा -

जयंत पाटील यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न पडू लागली आहेत. यावर बोलताना जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच बसले होते. एकाच खुर्चीचा फरक होता. ती खुर्ची बदलू शकते. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आमच्या शुभेच्छा असल्याचे कोटक म्हणाले.

हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलीस शिपायावर हवालदाराचा वारंवार बलात्कार

Last Updated : Jan 21, 2021, 7:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.