ETV Bharat / state

मुंबईचा केळी विक्रेता बनला पोलीस उपनिरीक्षक

ज्ञानेशच्या  वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. केळी विकण्याचा व्यवसाय सांभाळत त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

author img

By

Published : Mar 20, 2019, 12:01 AM IST

ज्ञानेश येडगे

मुंबई - तुमचे ध्येय ठरलेले असेल तर तुम्ही काहीही करू शकता. याचेचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश येडगे. ज्ञानेश यांनी धोबीतलाव येथील केळी विक्रेता ते पोलीस उपनिरीक्षक, असा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएसआय पदासाठीच्या परीक्षेत राज्यात खुल्या प्रवर्गातून ज्ञानेशने १६१ वा क्रमांक पटकावला आहे.

ज्ञानेश येडगे

ज्ञानेशच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. केळी विकण्याचा व्यवसाय सांभाळत त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

पदवीनंतर ज्ञानेशने एअर इंडियाच्या सुरक्षा विभागात नोकरी पत्करली. तसेच MPSC चा अभ्यास सुरू केला. पहिल्या ३ प्रयत्नांत मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचल्या नंतरही यश हुलकावणी देत होते. त्यामुळे ज्ञानेशने मनाशी जिद्द बाळगून एअर इंडियाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अखेर यावर्षी ज्ञानेशला यश मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचा ८ मार्चला निकाल होता. निवडीचा निकाल हाती आल्यानंतर ज्ञानेशचा आनंद द्विगुणित झाला. मला जे यश मिळाले ते पहायला माझे वडील नाहीत, असे म्हणत त्याने खंत व्यक्त केली.

मनात जिद्द असल्यास प्रतिकुल परिस्थितवर मात करूनही यश मिळवू शकता, हे ज्ञानेश्वर यांनी दाखवून दिले.

मुंबई - तुमचे ध्येय ठरलेले असेल तर तुम्ही काहीही करू शकता. याचेचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश येडगे. ज्ञानेश यांनी धोबीतलाव येथील केळी विक्रेता ते पोलीस उपनिरीक्षक, असा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएसआय पदासाठीच्या परीक्षेत राज्यात खुल्या प्रवर्गातून ज्ञानेशने १६१ वा क्रमांक पटकावला आहे.

ज्ञानेश येडगे

ज्ञानेशच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर आली. केळी विकण्याचा व्यवसाय सांभाळत त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

पदवीनंतर ज्ञानेशने एअर इंडियाच्या सुरक्षा विभागात नोकरी पत्करली. तसेच MPSC चा अभ्यास सुरू केला. पहिल्या ३ प्रयत्नांत मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचल्या नंतरही यश हुलकावणी देत होते. त्यामुळे ज्ञानेशने मनाशी जिद्द बाळगून एअर इंडियाचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. अखेर यावर्षी ज्ञानेशला यश मिळाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचा ८ मार्चला निकाल होता. निवडीचा निकाल हाती आल्यानंतर ज्ञानेशचा आनंद द्विगुणित झाला. मला जे यश मिळाले ते पहायला माझे वडील नाहीत, असे म्हणत त्याने खंत व्यक्त केली.

मनात जिद्द असल्यास प्रतिकुल परिस्थितवर मात करूनही यश मिळवू शकता, हे ज्ञानेश्वर यांनी दाखवून दिले.

Intro:मुंबई ।
मनाशी ध्येय निश्चित केले की मला हे मिळवायचे आहे , आणि ते मिळवून घेणारे खूप कमी असतात. त्यापैकी ज्ञानेश येडगे एक आहेत. धोबीतलाव येथील केळी विक्रेता ते पोलीस उपनिरीक्षक असा प्रवास यशस्वीरित्या पार केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा मध्ये महाराष्ट्रामध्ये १४१० उमेदवारापैकी खुला वर्ग मधून १६१ वा क्रमांक पटकावला आहे.दक्षिण मुंबई येथील धोबीतलाव मध्ये त्यांच्या कुटूंबियांचा केळी विक्रीचा व्यवसाय होता. वडील वारल्यानंतर पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. धंदा सांभाळत त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. बालवयात खेळण्याचे वय असताना कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली.

Body:प्राथमिक शिक्षण येडगेवाडी शाळेत झाल्यावर ज्ञानेशला शिकण्यासाठी मुंबईला आणण्यात आले. चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल मध्ये इयत्ता १०वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांच्या कुटूंबाचा धोबीतलाव मुंबई येथे केळी विक्रीचा व्यवसाय होता. ज्ञानेश तिथे लहानपणापासून जात होता. पण सगळे योग्यरीत्या चालत एक वाईट घटना त्यांच्या आयुष्यात घडली आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यांचे वडील बाबू येडगे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले. कुटुंबाची जबाबदारी
ज्ञानेश यांच्या अंगावर पडली. तेव्हा ते अवघे 14 वर्षाचे होते. ज्ञानेश यांनी १० वी ची परीक्षा दिली. १२वी आणि पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी केळी विक्रीचा व्यवसाय सांभाळतच पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी एअर इंडियाच्या सुरक्षा विभागात नोकरी पत्करली. आणि एका बाजूने MPSC चा अभ्यास चालू केला. पहिल्या 3 प्रयत्नांत मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचल्या नंतरही यश हुलकावणी देत होते. अखेर त्याने मनाशी जिद्द बाळगून एअर इंडियाला राजीनामा देऊन पूर्ण वेळ अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.आणि जोरदार अभ्यास पुन्हा एकदा चालू केला. आणि अखेर ती वेळ आली जिने ज्ञानेश चे स्वप्न पूर्ण केले..


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचा ८ मार्चला निकाल होता. त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. निवडीचा निकाल हाती आल्यानंतर ज्ञानेशचा आनंद द्विगुणित झाला. मला जे यश मिळाले ते पहायला माझे वडील नाहीत आणि मला प्रोत्साहन देणारा 2018 या वर्षात दुःखद निधन झालेला माझा चुलत भाऊ नामदेव नाही याची खंत त्याने व्यक्त केली.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.