ETV Bharat / state

Shiv Sena Launches Delhi Unit : शिंदे गटाकडून राजधानीत शिवसेनेची शाखा सुरू, लवकरच मुख्यमंत्री शिंदे देणार भेट

author img

By

Published : May 1, 2023, 10:50 AM IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 30 एप्रिल रोजी दिल्लीत शाखा सुरू केली आहे. राष्ट्रीय राजधानीत विकासाचे 'महाराष्ट्र मॉडेल' लागू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ आणि अंशुम्मन जोशी यांनी अनेक नेत्यांना पक्षात सामील करून घेतले. त्यांनी असे प्रतिपादन केले की, ही संघटना मातीच्या सुपुत्रांच्या हक्कासाठी लढेल आणि राष्ट्रीय राजधानीतील भ्रष्टाचार उखडून टाकेल.

Eknath Shinde
एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अडसूळ यांनी सांगितले की, पक्षाच्या दिल्लीतील शाखेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यासाठी एकनाथ शिंदे लवकरच राष्ट्रीय राजधानीत जाणार आहे. आम्ही आमची माणुसकी, सर्वसमावेशकता आणि सुशासनाचा अजेंडा घेऊन लोक आणि स्थानिक नेत्यांपर्यंत पोहोचत आहोत, असे अडसूळ म्हणाले. पक्षाच्या 'सुशासन, महाराष्ट्र मॉडेल' आणि 'अपना अभिमान, धनुष-बान' मोहिमेचा शुभारंभ केल्याचेही त्यांनी म्हटले.

'महाराष्ट्र मॉडेल' लागू करण्याचे वचन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 30 एप्रिल रोजी दिल्लीत शाखा सुरू केली. त्यांनी राष्ट्रीय राजधानीत विकासाचे 'महाराष्ट्र मॉडेल' लागू करण्याचे वचन दिले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ आणि अंशुम्मन जोशी यांनी अनेक नेत्यांना पक्षात सामील करून घेतले. त्यांनी असे प्रतिपादन केले की ही संघटना मातीच्या सुपुत्रांच्या हक्कासाठी लढेल आणि राष्ट्रीय राजधानीतील भ्रष्टाचार उखडून टाकेल.

20 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश बनले : माजी केंद्रीय मंत्री अडसूळ म्हणाले की, शिवसेना सर्वसमावेशकता, मानवता, सुशासन आणि त्यांचा जुना मित्र भाजपसोबत युती या संदर्भात पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेणार आहे. दिल्ली शाखेच्या प्रारंभासह, राष्ट्रीय राजधानी ही शिवसेना शाखा असणारे 20 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश बनले आहे, असे ते म्हणाले. पक्ष राष्ट्रीय स्तरावर आपली पोहोच वाढवण्यासाठी अनुभवी नेतृत्वाचा लाभ घेईल. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला प्रशासनाचे मॉडेल दिले आहे. दिल्ली आणि इतर राज्यांमध्येही आपला पाया वाढवण्यासाठी पक्षाच्या तरुण नेत्यांचा आधार घेतला आहे, असे अडसूळ म्हणाले.

दिल्लीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना लढणार : 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील शीखांना बाळासाहेब ठाकरेंनी वाचवल्याची आठवण अडसूळ यांनी सांगितली. दिल्लीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना लढणार असल्याचे जोशी म्हणाले. लोकांना वीज आणि पाण्याची बिले दिली जात आहेत. त्यामुळे मोफत पाणी आणि वीज देण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही, असे जोशी म्हणाले.

हेही वाचा : Karnataka Assembly Polls 2023 : कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी सुरू, भाजप आज जाहीर करणार जाहीरनामा

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अडसूळ यांनी सांगितले की, पक्षाच्या दिल्लीतील शाखेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यासाठी एकनाथ शिंदे लवकरच राष्ट्रीय राजधानीत जाणार आहे. आम्ही आमची माणुसकी, सर्वसमावेशकता आणि सुशासनाचा अजेंडा घेऊन लोक आणि स्थानिक नेत्यांपर्यंत पोहोचत आहोत, असे अडसूळ म्हणाले. पक्षाच्या 'सुशासन, महाराष्ट्र मॉडेल' आणि 'अपना अभिमान, धनुष-बान' मोहिमेचा शुभारंभ केल्याचेही त्यांनी म्हटले.

'महाराष्ट्र मॉडेल' लागू करण्याचे वचन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 30 एप्रिल रोजी दिल्लीत शाखा सुरू केली. त्यांनी राष्ट्रीय राजधानीत विकासाचे 'महाराष्ट्र मॉडेल' लागू करण्याचे वचन दिले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ आणि अंशुम्मन जोशी यांनी अनेक नेत्यांना पक्षात सामील करून घेतले. त्यांनी असे प्रतिपादन केले की ही संघटना मातीच्या सुपुत्रांच्या हक्कासाठी लढेल आणि राष्ट्रीय राजधानीतील भ्रष्टाचार उखडून टाकेल.

20 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश बनले : माजी केंद्रीय मंत्री अडसूळ म्हणाले की, शिवसेना सर्वसमावेशकता, मानवता, सुशासन आणि त्यांचा जुना मित्र भाजपसोबत युती या संदर्भात पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेणार आहे. दिल्ली शाखेच्या प्रारंभासह, राष्ट्रीय राजधानी ही शिवसेना शाखा असणारे 20 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश बनले आहे, असे ते म्हणाले. पक्ष राष्ट्रीय स्तरावर आपली पोहोच वाढवण्यासाठी अनुभवी नेतृत्वाचा लाभ घेईल. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला प्रशासनाचे मॉडेल दिले आहे. दिल्ली आणि इतर राज्यांमध्येही आपला पाया वाढवण्यासाठी पक्षाच्या तरुण नेत्यांचा आधार घेतला आहे, असे अडसूळ म्हणाले.

दिल्लीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना लढणार : 1984 च्या शीखविरोधी दंगलीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील शीखांना बाळासाहेब ठाकरेंनी वाचवल्याची आठवण अडसूळ यांनी सांगितली. दिल्लीतील भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना लढणार असल्याचे जोशी म्हणाले. लोकांना वीज आणि पाण्याची बिले दिली जात आहेत. त्यामुळे मोफत पाणी आणि वीज देण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही, असे जोशी म्हणाले.

हेही वाचा : Karnataka Assembly Polls 2023 : कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी सुरू, भाजप आज जाहीर करणार जाहीरनामा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.