ETV Bharat / state

Sanjay Raut News : उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का- खासदार संजय राऊत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 2:05 PM IST

Sanjay Raut News मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा फरार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sanjay Raut News
Sanjay Raut News

मुंबई Sanjay Raut News - पोलिसांनी ललित पाटील याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याने संधी साधून तेथून पळ काढला. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी ललित पाटील याला पळून जाण्यास दादा भुसे यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दादा भुसे यांनी आरोप फेटाळले असले तरी आता यावर खासदार संजय राऊत यांनीदेखील मंत्री भुसे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. ते मुंबईत निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गिरणा सहकारी साखर कारखान्यात 179 कोटींचा भष्टाचार झाला. त्यानंतर त्यांनी साधारण 200 कोटी रुपयांचा माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला. त्याला आम्ही सामोरे जाऊ. पण, त्याहीपेक्षा भयंकर प्रकरण समोर आलंय. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आधी प्रकरण बाहेर काढलं. ललित पाटील हा ड्रग्ज माफिया आहे.

उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का?- पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ललित पाटीलला तुरुंगातून ससून रुग्णालयात दाखल करण्याची काळजी कोणी घेतली? नाशिकच्या एका आमदारांच नावे पुढे आलं. त्यानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अप्रत्यक्ष तर आमच्या सुषमा अंधारे यांनी तर दादा भुसे यांच थेट नाव घेतलं आहे. हातात पुरावे असल्याशिवाय आणि संपूर्ण माहिती असल्याशिवाय आमचे हे तिन्ही प्रमुख लोक बोलणार नाहीत. ललित पाटील या ड्रग्ज माफियाने नऊ महिने ससूनमध्ये पाहुणचार घेतला. त्यानंतर त्याला एकनाथ शिंदे गटाच्या एका मंत्र्याने त्याला पळून जायला मदत केली. त्या मंत्र्यांचे नाव काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. नाशिकमध्ये ड्रग्ज माफिया आहे. उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.


मेळाव्याने देशामध्ये महत्व प्राप्त केलं- जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता. तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? अशी टीका दसरा मेळाव्यावरून शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. याला उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत दसरा मेळावा हा शिवसेनेच्या विचारांचा अंगार घेऊनच होत असतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याने देशामध्ये महत्व प्राप्त केलं आहे. त्यामुळे अंगार कोण भंगार कोण? हा येणारा काळ ठरवेल. तुमच्या मेळाव्याला येणारे लोक तुमचे विचार ऐकण्यासाठी येत असतील तर येऊ द्या. तुमच्या विचारांना आम्ही अंगार, भंगार म्हणणार नाही.

यांची जीभ खाली घसरली- पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेला भंगार म्हणण्याइतकी यांची जीभ खाली घसरली आहे. त्यांना सध्या नड्डा, मोदी आणि शाह यांची छबी लागली आहे. हा काय बाळासाहेबांचा विचारांचा अंगार नाही. बाळासाहेबांचा विचार हा स्वतंत्र होता. तो शिवसेनेचा विचार होता. नक्कीच त्यांनी भाजपा पक्षासोबत पंचवीस वर्ष युती ठेवली. पण, ती युती करत असताना त्यांनी शिवसेनेचा विचार कुठल्याही दुसऱ्या पक्षाला विचारला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नड्डा यांच्या स्वागतासाठी बोर्ड लागवले आहेत. ही तुमच्यावर वेळ आली आहे."


मुख्यमंत्र्यांना गुलामासारखे जावे लागते- राऊत पुढे म्हणाले की, तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी पक्ष काढून दाखवा. पक्ष स्थापन करून लोकांपुढे जाऊन मत मागा. मग समजेल अंगार कोण आणि भंगार कोण? व्हायब्रांट गुजरात प्रोग्राम मुंबईच्या ताजमहल पॅलेसला पार पडत आहे. यावेळी मुंबईत रोड शोदेखील होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. हाच तो महाराष्ट्राचे अंगार आणि भंगारमधला फरक आहे. व्हायब्रेट गुजरातसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखे जावे लागते. जान काढून गुजरातला पाठवली जाते. आत्मा काढून मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रेट गुजरात बनवलाय. राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम म्हणून तिथे हजर राहतात. हाच का तुमचा अंगार? याच्यावर उत्तर द्या, असे खासदार राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं.

हेही वाचा-

  1. Sanjay Raut On Deepak Kesarkar : केसरकर म्हणजे मोती तलावातील डोमकावळा - संजय राऊत यांची टीका
  2. Sanjay Raut On CM : कोण शिंदे? त्यांचं कर्तृत्व काय? संजय राऊतांनी उडवली खिल्ली

मुंबई Sanjay Raut News - पोलिसांनी ललित पाटील याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्याने संधी साधून तेथून पळ काढला. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी ललित पाटील याला पळून जाण्यास दादा भुसे यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दादा भुसे यांनी आरोप फेटाळले असले तरी आता यावर खासदार संजय राऊत यांनीदेखील मंत्री भुसे यांच्या चौकशीची मागणी केली आहे. ते मुंबईत निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. गिरणा सहकारी साखर कारखान्यात 179 कोटींचा भष्टाचार झाला. त्यानंतर त्यांनी साधारण 200 कोटी रुपयांचा माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला. त्याला आम्ही सामोरे जाऊ. पण, त्याहीपेक्षा भयंकर प्रकरण समोर आलंय. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आधी प्रकरण बाहेर काढलं. ललित पाटील हा ड्रग्ज माफिया आहे.

उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का?- पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ललित पाटीलला तुरुंगातून ससून रुग्णालयात दाखल करण्याची काळजी कोणी घेतली? नाशिकच्या एका आमदारांच नावे पुढे आलं. त्यानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अप्रत्यक्ष तर आमच्या सुषमा अंधारे यांनी तर दादा भुसे यांच थेट नाव घेतलं आहे. हातात पुरावे असल्याशिवाय आणि संपूर्ण माहिती असल्याशिवाय आमचे हे तिन्ही प्रमुख लोक बोलणार नाहीत. ललित पाटील या ड्रग्ज माफियाने नऊ महिने ससूनमध्ये पाहुणचार घेतला. त्यानंतर त्याला एकनाथ शिंदे गटाच्या एका मंत्र्याने त्याला पळून जायला मदत केली. त्या मंत्र्यांचे नाव काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातर्फे जाहीर करण्यात आले. नाशिकमध्ये ड्रग्ज माफिया आहे. उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र करायचा प्लॅन आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.


मेळाव्याने देशामध्ये महत्व प्राप्त केलं- जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता. तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? अशी टीका दसरा मेळाव्यावरून शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. याला उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की, शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत दसरा मेळावा हा शिवसेनेच्या विचारांचा अंगार घेऊनच होत असतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे दसरा मेळावा घेत आहेत. या मेळाव्याने देशामध्ये महत्व प्राप्त केलं आहे. त्यामुळे अंगार कोण भंगार कोण? हा येणारा काळ ठरवेल. तुमच्या मेळाव्याला येणारे लोक तुमचे विचार ऐकण्यासाठी येत असतील तर येऊ द्या. तुमच्या विचारांना आम्ही अंगार, भंगार म्हणणार नाही.

यांची जीभ खाली घसरली- पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या राज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेला भंगार म्हणण्याइतकी यांची जीभ खाली घसरली आहे. त्यांना सध्या नड्डा, मोदी आणि शाह यांची छबी लागली आहे. हा काय बाळासाहेबांचा विचारांचा अंगार नाही. बाळासाहेबांचा विचार हा स्वतंत्र होता. तो शिवसेनेचा विचार होता. नक्कीच त्यांनी भाजपा पक्षासोबत पंचवीस वर्ष युती ठेवली. पण, ती युती करत असताना त्यांनी शिवसेनेचा विचार कुठल्याही दुसऱ्या पक्षाला विचारला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नड्डा यांच्या स्वागतासाठी बोर्ड लागवले आहेत. ही तुमच्यावर वेळ आली आहे."


मुख्यमंत्र्यांना गुलामासारखे जावे लागते- राऊत पुढे म्हणाले की, तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी पक्ष काढून दाखवा. पक्ष स्थापन करून लोकांपुढे जाऊन मत मागा. मग समजेल अंगार कोण आणि भंगार कोण? व्हायब्रांट गुजरात प्रोग्राम मुंबईच्या ताजमहल पॅलेसला पार पडत आहे. यावेळी मुंबईत रोड शोदेखील होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. हाच तो महाराष्ट्राचे अंगार आणि भंगारमधला फरक आहे. व्हायब्रेट गुजरातसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखे जावे लागते. जान काढून गुजरातला पाठवली जाते. आत्मा काढून मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रेट गुजरात बनवलाय. राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम म्हणून तिथे हजर राहतात. हाच का तुमचा अंगार? याच्यावर उत्तर द्या, असे खासदार राऊत यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं.

हेही वाचा-

  1. Sanjay Raut On Deepak Kesarkar : केसरकर म्हणजे मोती तलावातील डोमकावळा - संजय राऊत यांची टीका
  2. Sanjay Raut On CM : कोण शिंदे? त्यांचं कर्तृत्व काय? संजय राऊतांनी उडवली खिल्ली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.