ETV Bharat / state

अन्यथा ऊस दर मंडळाच्या सदस्यपदी राहण्यात रस नाही - प्रल्हाद इंगोले

अन्यथा आम्हाला मंडळाच्या सदस्यपदी आणि समितीच्या बैठकीला येण्यात रस नाही, अशी स्पष्ट भूमिका ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडली.

author img

By

Published : Jul 18, 2019, 11:44 AM IST

Updated : Jul 18, 2019, 1:17 PM IST

अन्यथा ऊस दर मंडळाच्या सदस्यपदी राहण्यात रस नाही - प्रसाद इंगोले

मुंबई - ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये पारित झालेले ठरावांची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने स्वीकारावी, अन्यथा आम्हाला मंडळाच्या सदस्यपदी आणि समितीच्या बैठकीला येण्यात रस नाही, अशी स्पष्ट भूमिका ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडली.

यासंदर्भात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांच्याशी केलेली बातचित पाहण्यासाठी क्लिक करा

'ईटीव्ही भारत'शी बोलतना ही भूमिका इंगोले यांनी मांडली. यावेळी ते म्हणाले, गेली वर्षभर ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक पार पडत होती. मात्र, बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होत नव्हती. शेतकरी प्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर आम्ही बैठकीमध्ये मांडलेले मुद्दे रेकॉर्डवर आले. त्यानंतर ऊस दर समिती मंडळाचे अध्यक्ष अजय मेहता यांनी सर्व मुद्दे ऐकून घेऊन ठोस अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल विभागने शेतकऱ्यांची थकबाकी आरएसएफ ठेवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी बैठकीत केली होती. त्यानुसार 2018- 19 वर्षातील 20 साखर कारखान्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

विठ्ठल पवार यांनी वजनकाट्यामध्ये होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबावी. यासाठी ऑनलाइन काटे आणि पारदर्शकता निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी संशोधन संस्थांच्या माध्यमातून उसाचे अधिक उत्पादन देणारे गुणवत्तापूर्ण वान संशोधित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

वर्षभराच्या बैठकीमध्ये अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे विषय ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आले आहेत. यापूर्वी हे विषय रेकॉर्डवर घेण्यात आले नव्हते. मात्र, नवे सचिव अजय मेहता यांच्याकडून शेतकरी हिताचे विषय प्राधान्याने सोडवले जातील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आम्हाला सगळ्यांना मंडळाच्या सदस्यपदी राहण्यात काही रस नाही, असे इंगोले यांनी सांगितले.

मुंबई - ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये पारित झालेले ठरावांची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने स्वीकारावी, अन्यथा आम्हाला मंडळाच्या सदस्यपदी आणि समितीच्या बैठकीला येण्यात रस नाही, अशी स्पष्ट भूमिका ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडली.

यासंदर्भात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांच्याशी केलेली बातचित पाहण्यासाठी क्लिक करा

'ईटीव्ही भारत'शी बोलतना ही भूमिका इंगोले यांनी मांडली. यावेळी ते म्हणाले, गेली वर्षभर ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक पार पडत होती. मात्र, बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होत नव्हती. शेतकरी प्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर आम्ही बैठकीमध्ये मांडलेले मुद्दे रेकॉर्डवर आले. त्यानंतर ऊस दर समिती मंडळाचे अध्यक्ष अजय मेहता यांनी सर्व मुद्दे ऐकून घेऊन ठोस अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल विभागने शेतकऱ्यांची थकबाकी आरएसएफ ठेवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी बैठकीत केली होती. त्यानुसार 2018- 19 वर्षातील 20 साखर कारखान्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

विठ्ठल पवार यांनी वजनकाट्यामध्ये होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबावी. यासाठी ऑनलाइन काटे आणि पारदर्शकता निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कृषी संशोधन संस्थांच्या माध्यमातून उसाचे अधिक उत्पादन देणारे गुणवत्तापूर्ण वान संशोधित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

वर्षभराच्या बैठकीमध्ये अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे विषय ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आले आहेत. यापूर्वी हे विषय रेकॉर्डवर घेण्यात आले नव्हते. मात्र, नवे सचिव अजय मेहता यांच्याकडून शेतकरी हिताचे विषय प्राधान्याने सोडवले जातील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आम्हाला सगळ्यांना मंडळाच्या सदस्यपदी राहण्यात काही रस नाही, असे इंगोले यांनी सांगितले.

Intro:MH_MUM_03_SUGARCANE_PRICE_MEET_INGOLE121_MH_7204684


Body:MH_MUM_03_SUGARCANE_PRICE_MEET_INGOLE121_MH_7204684

तर पुन्हा ऊस दर नियंत्रण समितीच्या बैठकीला येणार नाही: प्रल्हाद इंगोले यांचा इशारा

मुंबई:
जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर साखर उद्योग संकटात असताना राज्याचा आर्थिक कणा असलेला ऊस उत्पादक शेतकरी वाचवण्यासाठी ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीमध्ये पारित झालेले ठराव अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने स्विकारावी.अन्यथा आम्हाला मंडळाच्या सदस्यपदी आणि समितीच्या बैठकीला येण्यात रस नाही.अशी स्पष्ट भूमिका ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी ई टीव्ही भारत चे प्रतिनिधी विजय गायकवाड यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केली.
इंगोले म्हणाले गेली वर्षभर ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक पार पडत होती. परंतु बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी होत नव्हती शेतकरी प्रतिनिधींना आवाज उठवल्यानंतर आम्ही बैठकीमध्ये मांडलेले मुद्दे रेकॉर्डवर आले राज्याचे नवे सचिव अजय मेहता आणि ऊस दर समितीचे मंडळाचे अध्यक्ष अजय मेहता यांनी गांभीर्यपूर्वक सर्व मुद्दे ऐकून घेऊन ठोस अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
महसूल विभाग ने सूत्रानुसार शेतकऱ्यांची थकबाकी आर एस एफ ठेवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली .त्यानुसार 2018- 19 वर्षातील 20 साखर कारखान्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बैठकीमध्ये मंत्री तानाजी सावंत यांनी कारखान्यांना वित्त पुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांना तंबी द्यावी अशी मागणी केली याशिवाय तीन टप्प्यात वाहतूक खर्च करावा हा निर्णय घेऊ नये याची याची
अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचा निर्णय झाला साखर कारखान्याच्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकतेचा अभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक होते यासंदर्भात मंडळाचे अध्यक्ष अजय
मेहता यांनी कारखाने देत असलेली माहिती खरी की खोटी
हे तपासण्यासाठी यंत्रणा उभी करावी. व त्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी असावा या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद दिला ऊसदर नियंत्रण मंडळाचा विषय केवळ साखर पुरता मर्यादित नसून गुळ कारखाना खांडसरी गुळ पावडर इतर पूरक उद्योगांसाठी गाळप झालेल्या उसाला या एफ आर पी च्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मान्य करण्यात आली आहे 70 30 महसूल उभारणी सूत्रानुसार अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना काल मर्यादा ठरवून देण्यात येणार आहे. ऊस तोडणी यंत्र धारकांच्या थकीत आमचा प्रश्न निकाली काढावा अशा मागण्या मी राज्य सरकार पुढे ठेवले आहेत .तोडणी खर्चामध्ये इतर खर्च कामगारांना आणि नेऊन सोडणे त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे बैलगाडीची देखभाल आणि दुरुस्ती स्लीप बॉय मदतनीस यांचे वेतन खर्च तोड वाहतूक खर्चात न पकडतात व्यवस्थापन खर्चात समाविष्ट करावा अशी मागणी मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आली आहे. विठ्ठल पवार यांनी वजन काट्या मध्ये होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबावी यासाठी ऑनलाइन काटे आणि पारदर्शकता निर्माण करावे अशी मागणी केली कृषी संशोधन संस्थांच्या माध्यमातून उसाचे अधिक उत्पादन देणारे गुणवत्तापूर्ण वान संशोधित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी पांडुरंग शिंदे यांनी केले वर्षभराच्या बैठकीमध्ये अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे विषय ऊसदर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आले यापूर्वी रेकॉर्डवर विषय घेण्यात आले नव्हते परंतु नवे सचिव अजय मेहता त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यामुळे शेतकरी हिताचे विषय प्राधान्याने अंमलबजावणीसाठी घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्हा सगळ्यांना मंडळाच्या सदस्यपदी राहण्यात रस नाही,असे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.



Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.