ETV Bharat / state

नाणार प्रकल्प: शिवसेनेने बेरोजगारांच्या पोटावर लाथ मारली; प्रमोद जठारांची संतप्त प्रतिक्रिया

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर शिवसेनेकडून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. मात्र, जठार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका उद्योगमंत्र्यानेच लाखो रोजगार संधी निर्माण करणारा उद्योग रद्द करावा, ही संपूर्ण कोकणवासीयांची शोकांतिकाच आहे. मात्र, रद्द झालेला एन्रॉन पुन्हा उभा राहू शकतो.

author img

By

Published : Mar 3, 2019, 10:12 PM IST

भाजपचे माजी आमदार आणि नाणार समर्थक प्रमोद जठार

मुंबई - नाणार प्रकल्प रद्द होणे, हा बेरोजगारांच्या आयुष्यातील काळा दिवस आहे. प्रकल्प रद्द झाल्याने लाखो तरुणांची रोजगाराची संधी गेली आहे. शिवसेनेने बेरोजगारांच्या पोटावरच लाथ मारली असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार आणि नाणार समर्थक प्रमोद जठार यांनी केला आहे. सोमवारी कणकवलीत सभा घेऊन युतीच्या विरोधात निवडणूक लढवायची, की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचेही जठार यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपचे माजी आमदार आणि नाणार समर्थक प्रमोद जठार

नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रद्द केल्याचे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यावर जठार यांनी आज ही संतप्त प्रतिक्रिया दिली. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर शिवसेनेकडून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. मात्र, जठार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका उद्योगमंत्र्यानेच लाखो रोजगार संधी निर्माण करणारा उद्योग रद्द करावा, ही संपूर्ण कोकणवासीयांची शोकांतिकाच आहे. मात्र, रद्द झालेला एन्रॉन पुन्हा उभा राहू शकतो. त्याचधर्तीवर नाणार प्रकल्पही पुन्हा सुरू होईल. त्यासाठी केवळ सौदी अरेबियामधून एखादी रिबेका मार्क कंपनी मातोश्रीवर यायला हवी, असा टोलाही जठार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

कोकणात काबाड कष्ट करणाऱ्या गरिबांच्या घरातील चूल पेटावी, यासाठी भाजप सरकारने हा प्रकल्प आणला होता. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेला येथील गरिबांचे, बेरोजगारांचे सोयरसुतक नाही. नाणार रद्द झाल्याने कोकणातील ३ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकल्प होत असताना पर्यावरणाची अधिक काळजी घेता आली असती. विनाकारण पर्यावरणवाद्यांनी कोकणच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने हा प्रकल्प रद्द होण्याचा घाट घातला, हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. कोकणच्या आर्थिक क्रांतीमध्ये ३ लाख कोटींचा खड्डा पडला असून आता तो भरून येणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

undefined

मुंबई - नाणार प्रकल्प रद्द होणे, हा बेरोजगारांच्या आयुष्यातील काळा दिवस आहे. प्रकल्प रद्द झाल्याने लाखो तरुणांची रोजगाराची संधी गेली आहे. शिवसेनेने बेरोजगारांच्या पोटावरच लाथ मारली असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार आणि नाणार समर्थक प्रमोद जठार यांनी केला आहे. सोमवारी कणकवलीत सभा घेऊन युतीच्या विरोधात निवडणूक लढवायची, की नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचेही जठार यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपचे माजी आमदार आणि नाणार समर्थक प्रमोद जठार

नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रद्द केल्याचे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यावर जठार यांनी आज ही संतप्त प्रतिक्रिया दिली. नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्यानंतर शिवसेनेकडून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. मात्र, जठार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका उद्योगमंत्र्यानेच लाखो रोजगार संधी निर्माण करणारा उद्योग रद्द करावा, ही संपूर्ण कोकणवासीयांची शोकांतिकाच आहे. मात्र, रद्द झालेला एन्रॉन पुन्हा उभा राहू शकतो. त्याचधर्तीवर नाणार प्रकल्पही पुन्हा सुरू होईल. त्यासाठी केवळ सौदी अरेबियामधून एखादी रिबेका मार्क कंपनी मातोश्रीवर यायला हवी, असा टोलाही जठार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

कोकणात काबाड कष्ट करणाऱ्या गरिबांच्या घरातील चूल पेटावी, यासाठी भाजप सरकारने हा प्रकल्प आणला होता. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेला येथील गरिबांचे, बेरोजगारांचे सोयरसुतक नाही. नाणार रद्द झाल्याने कोकणातील ३ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकल्प होत असताना पर्यावरणाची अधिक काळजी घेता आली असती. विनाकारण पर्यावरणवाद्यांनी कोकणच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने हा प्रकल्प रद्द होण्याचा घाट घातला, हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली. कोकणच्या आर्थिक क्रांतीमध्ये ३ लाख कोटींचा खड्डा पडला असून आता तो भरून येणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.

undefined
Intro:या बातमी साठी प्रमोद जठार यांचे विसुअल्स पाठवत आहे.. त्यांच्याशी फोन वर बोलणे झाले आहे....

शिवसेनेने बेरोजगारांच्या पोटावरच लाथ मारली आहे -प्रमोद जठार


मुंबई - 4

नाणार प्रकल्प रद्द होणे हा बेरोजगारांच्या आयुष्यातील काळा दिवस आहे. बेरोजगारांच्या पाठीवर मारा व पोटावर मारू नका असे आम्ही सांगत होतो. पण शिवसेनेने बेरोजगारांच्या पोटावरच लाथ मारली असल्याचे भाजपचे माजी आमदार आणि नानार समर्थक प्रमोद जठार यांनी म्हटले आहे. सोमवारी कणकवलीत सभा घेऊन युतीच्या विरोधात निवडणूक लढवायची की नाही या बाबत निर्णय घेणार असल्याचे ही जठार यांनी स्पष्ट केले आहे.

नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रद्द केल्याचे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यानंतर जठार यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नानार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्या नंतर शिवसेनेकडून सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. यावर ही जठार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका उद्योगमंत्र्यानेच लाखो रोजगार संधी निर्माण करणारा उद्योग रद्द करावा ही संपूर्ण कोकणवासीयांची शोकांतिकाच आहे. मात्र ज्या प्रमाणे रद्द झालेला एन्रॉन पुन्हा उभा राहू शकतो. त्याचधर्तीवर नाणार प्रकल्प देखील पुन्हा सुरू होईल.त्यासाठी केवळ सौदी अरेबियामधून एखादी रिबेका मार्क मातोश्री वर यायला हवी असा टोला ही जठार यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

कोकणात काबाड कष्ट करणाऱ्या गरीबाच्या घरातील चूल पेटावी यासाठी भाजप सरकारने हा प्रकल्प आणला होता. पण उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेला इथल्या गरिबांचे, बेरोजगारांचे सोयरसुतक नाही. नाणार रद्द झाल्याने कोकणातील तीन लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकल्प होत असताना पर्यावरणाची अधिक काळजी घेता आली असती. विनाकारण पर्यावरण वाद्यांनी कोकणच्या तोंडाचा घास हिरावून घेतला आहे. शेतकर्‍यांचे आणि प्रकल्पग्रस्तांचेही योग्य पुनर्वसन करता आले असते. मात्र मतांच्या राजकारणासाठी शिवसेनेने हा प्रकल्प रद्द होण्याचा घाट घातला हे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली आहे. यामुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोकणच्या आर्थिक क्रांतीमध्ये तीन लाख कोटींचा खड्डा पडला असून आता तो भरून येणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. Body:........Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.