ETV Bharat / state

राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी किनाऱ्यांवर 'बीच शॅक्स'ला परवानगी - महाराष्ट्र 'बीच शॅक्स' परवानगी

समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील.

beach shacks
बीच शॅक्स
author img

By

Published : Jun 25, 2020, 8:28 PM IST

मुंबई - राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कुट्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असतील, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी किनाऱ्यांवर 'बीच शॅक्स'ला परवानगी

सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल 10 कुटी उभारता येतील. त्या उभारण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल.

चौपाटी कुटी चालवण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी 80 टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षासाठी वाटप करण्यात येईल. त्यांचे क्षेत्रफळ 15 फूट लांब, 15 फूट रुंद व 12 फूट उंच असेल. कुटीच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येईल. कुटी परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे नापरतावा मुल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.

या चौपाटी कुटी सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशा वेळेत सुरू ठेवता येतील. तसेच आजूबाजूच्या पर्यटकांना येथील संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल, असे मंत्री परब यांनी स्पष्ट केले.

मुंबई - राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढवण्यासाठी बीच शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कुट्या तात्पुरत्या स्वरुपाच्या असतील, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी किनाऱ्यांवर 'बीच शॅक्स'ला परवानगी

सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या 8 किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. या संदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल 10 कुटी उभारता येतील. त्या उभारण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल.

चौपाटी कुटी चालवण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी 80 टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षासाठी वाटप करण्यात येईल. त्यांचे क्षेत्रफळ 15 फूट लांब, 15 फूट रुंद व 12 फूट उंच असेल. कुटीच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी 20 फूट लांब आणि 15 फूट रुंद छत टाकता येईल. कुटी परवान्यासाठी 15 हजार रुपये अर्जाचे नापरतावा मुल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय 30 हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.

या चौपाटी कुटी सकाळी 7 ते सायंकाळी 7 अशा वेळेत सुरू ठेवता येतील. तसेच आजूबाजूच्या पर्यटकांना येथील संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल, असे मंत्री परब यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.