ETV Bharat / state

दुर्घटना ग्रस्त पादचारी पुलाचा सांगाडा अखेर २४ तासानंतर क्रेनच्या साह्याने उचलला

author img

By

Published : Mar 15, 2019, 4:16 PM IST

Updated : Mar 15, 2019, 9:30 PM IST

सीएसएमटी जवळची वाहतूक थांबण्यात आली होती. पूल पाडून पहाटेपर्यंत येथे वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.

पुल कोसळला

मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. आज सकाळपासूनच पुलाचा सांगाडा उचलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आठ तासांच्या प्रयत्नांनंतर संध्याकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पूल दोन्ही बाजूने गॅस कटरने तोडण्यात आला. नंतर क्रेनच्या सहाय्याने सांगाडा अलगद उचलून खाली रस्त्यावर ठेवण्यात आला. ३ क्रेन व १ मोठी मोबाईल क्रेन या कामासाठी वापरण्यात आली होती.

पुल कोसळला

मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवरआज पालिकेकडून २ अभियत्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, झाहीद रशिद खान, सारिका कुलकर्णी आणि तपेंद्र सिंह अशी मृतांची नावे आहेत. यापैकी अपूर्वा आणि रंजना या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. काहीजण या पूलावरून जात असताना अचानक पूल कोसळला. त्यामुळे सर्वजण खाली कोसळले. यामध्ये ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. जखमींवर सेंट जॉर्ज आणि जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास सीएसटीएमटी रेल्वे स्थानकात लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणाऱ्या पुलाचा मोठा भाग अचानक कोसळला आणि एकच धावपळ उडाली. या पादचारी पुलावरून जाणारे लोकस्लॅबसह खाली कोसळले. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. यात ३ महिलांचा समावेश आहे, तर ३४ जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

दादाभाई नौरोजी मार्गावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणाऱ्या पुलावरून रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्यांची रोज मोठी गर्दी असते. सायंकाळी अनेकजण या पुलावरून घरी परतत असतानाच हा पूल कोसळला. यावेळी नेमका सिग्नल बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, पुलाखाली एक टॅक्सी सापडली. टॅक्सीचा चालक वाचला. टॅक्सीचे मात्र मोठे नुकसान झाले.

पूल कोसळताना मोठा आवाज झाला. लोकांच्या किंकाळ्या दूरवर ऐकायला आल्या. त्यानंतर काही क्षणातच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. ५ मिनिटातच अग्निशमन दलाच्या जवानांनी दुर्घटनास्थळी पोहोचून जखमींना तत्काळ जीटी व सेंटजॅार्ज रुग्णालयात हलवले. दुर्घटना घडताच पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक बंद केली व तातडीने ढिगाराउपसण्याचे काम सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन अग्निशमन दलासोबत त्यांनीही मदतकार्य सुरू केले.

२ वर्षांपूर्वी पुलाच्या दुरुस्ती आणि ऑडीटसंदर्भात निवेदन दिले होते. रेल्वे प्रशासनालाही पत्रव्यवहार केला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रेल्वे प्रशासन या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी केला.

रुग्णसेविकांचा मृत्यू

अपूर्वा प्रभू (४०) आणि रंजना तांबे (३५) या दोघी जीटी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यकत होत्या. त्या रात्रपाळीसाठी रुग्णालयात कामावर निघाल्या होत्या. त्या पुलावर आल्या असता अचानक पूल कोसळला. या दुर्घटनेत अपूर्वा आणि रंजना या दोघींचा मृत्यू झाला. रुग्णांची सेवा करणाऱ्या या परिचारिकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जखमींची नावे
१) सोनाली नवले (३०), २) अद्वित नवले (३), ३) राजेंद्र नवले (३३), ४) राजेश लोखंडे (३९), ५) तुकाराम येडगे (३१), ६) जयेश अवलनी (४६), ७) मोहन कायंदे (४०), ८) महेश शेरे, ९) अजय पंडीत (३१), १०) हर्षदा वाघले (३५), ११) विजय भागवत (४२), १२) परशुराम पवार,१३) मुंबलीक जैसवाल, १४) मोहन मोझदा (४३), १५) निलेश पटावकर, १६) अनोळखी (३२), १७आयुशी रांखा (३०), १८) सिराज खान (५५), १९) राम कुप्रेजा (५९), २०) राजेदास दास (२३), २१) सुनिल गिरलोटकर (३९), २२) अनिकेत जाधव (१९), २३) अभिजित माना (२१), २४) राजकुमार चावला (४९), २५) सुभाष बॅनर्जी (३७), २६) रवी लागशेट्टी (४०), २७) नंदा विठ्ठल कदम (५६), २८) राकेश मिश्रा (४०), २९) अत्तार खान (४५), ३०) सुजय माजी (२८), ३१) कानूभाई सोळंखी (४७), ३२) दिपक पारेख

मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. आज सकाळपासूनच पुलाचा सांगाडा उचलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आठ तासांच्या प्रयत्नांनंतर संध्याकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पूल दोन्ही बाजूने गॅस कटरने तोडण्यात आला. नंतर क्रेनच्या सहाय्याने सांगाडा अलगद उचलून खाली रस्त्यावर ठेवण्यात आला. ३ क्रेन व १ मोठी मोबाईल क्रेन या कामासाठी वापरण्यात आली होती.

पुल कोसळला

मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवरआज पालिकेकडून २ अभियत्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, झाहीद रशिद खान, सारिका कुलकर्णी आणि तपेंद्र सिंह अशी मृतांची नावे आहेत. यापैकी अपूर्वा आणि रंजना या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. काहीजण या पूलावरून जात असताना अचानक पूल कोसळला. त्यामुळे सर्वजण खाली कोसळले. यामध्ये ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. जखमींवर सेंट जॉर्ज आणि जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास सीएसटीएमटी रेल्वे स्थानकात लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणाऱ्या पुलाचा मोठा भाग अचानक कोसळला आणि एकच धावपळ उडाली. या पादचारी पुलावरून जाणारे लोकस्लॅबसह खाली कोसळले. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. यात ३ महिलांचा समावेश आहे, तर ३४ जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

दादाभाई नौरोजी मार्गावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणाऱ्या पुलावरून रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्यांची रोज मोठी गर्दी असते. सायंकाळी अनेकजण या पुलावरून घरी परतत असतानाच हा पूल कोसळला. यावेळी नेमका सिग्नल बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, पुलाखाली एक टॅक्सी सापडली. टॅक्सीचा चालक वाचला. टॅक्सीचे मात्र मोठे नुकसान झाले.

पूल कोसळताना मोठा आवाज झाला. लोकांच्या किंकाळ्या दूरवर ऐकायला आल्या. त्यानंतर काही क्षणातच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. ५ मिनिटातच अग्निशमन दलाच्या जवानांनी दुर्घटनास्थळी पोहोचून जखमींना तत्काळ जीटी व सेंटजॅार्ज रुग्णालयात हलवले. दुर्घटना घडताच पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक बंद केली व तातडीने ढिगाराउपसण्याचे काम सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन अग्निशमन दलासोबत त्यांनीही मदतकार्य सुरू केले.

२ वर्षांपूर्वी पुलाच्या दुरुस्ती आणि ऑडीटसंदर्भात निवेदन दिले होते. रेल्वे प्रशासनालाही पत्रव्यवहार केला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रेल्वे प्रशासन या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी केला.

रुग्णसेविकांचा मृत्यू

अपूर्वा प्रभू (४०) आणि रंजना तांबे (३५) या दोघी जीटी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यकत होत्या. त्या रात्रपाळीसाठी रुग्णालयात कामावर निघाल्या होत्या. त्या पुलावर आल्या असता अचानक पूल कोसळला. या दुर्घटनेत अपूर्वा आणि रंजना या दोघींचा मृत्यू झाला. रुग्णांची सेवा करणाऱ्या या परिचारिकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जखमींची नावे
१) सोनाली नवले (३०), २) अद्वित नवले (३), ३) राजेंद्र नवले (३३), ४) राजेश लोखंडे (३९), ५) तुकाराम येडगे (३१), ६) जयेश अवलनी (४६), ७) मोहन कायंदे (४०), ८) महेश शेरे, ९) अजय पंडीत (३१), १०) हर्षदा वाघले (३५), ११) विजय भागवत (४२), १२) परशुराम पवार,१३) मुंबलीक जैसवाल, १४) मोहन मोझदा (४३), १५) निलेश पटावकर, १६) अनोळखी (३२), १७आयुशी रांखा (३०), १८) सिराज खान (५५), १९) राम कुप्रेजा (५९), २०) राजेदास दास (२३), २१) सुनिल गिरलोटकर (३९), २२) अनिकेत जाधव (१९), २३) अभिजित माना (२१), २४) राजकुमार चावला (४९), २५) सुभाष बॅनर्जी (३७), २६) रवी लागशेट्टी (४०), २७) नंदा विठ्ठल कदम (५६), २८) राकेश मिश्रा (४०), २९) अत्तार खान (४५), ३०) सुजय माजी (२८), ३१) कानूभाई सोळंखी (४७), ३२) दिपक पारेख

Intro:सीएसटी ब्रिज पाडण्या पूर्वीचे vis


Body:सीएसटी


Conclusion:
Last Updated : Mar 15, 2019, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.