ETV Bharat / state

'देश पातळीवरील जबाबदारी अन्य पक्षांसोबत; राज्यात मात्र महाविकास आघाडी'

author img

By

Published : Mar 1, 2020, 6:04 PM IST

Updated : Mar 1, 2020, 7:20 PM IST

शरद पवार मुबंई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरादरम्यान बोलत होते. शिबिरासाठी ज्येष्ठ नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार
शरद पवार

मुंबई - मुंबई शहरात पक्षाला अधिक काम करण्याची, संघटना वाढविण्याची गरज आहे. नव्यांना संधी दिली पाहिजे, त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मुबंई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरादरम्यान बोलताना म्हणाले. अन्याय अत्याचाराविरोधात उभे राहत, जातीचे राजकारण करणाऱ्या शक्तींविरोधात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिबिरासाठी ज्येष्ठ नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीर घेऊन आपली दिशा ठरवत असलो तरी मजबूत संघटना उभारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

दिल्लीत कायदा सुव्यवस्था बघण्याचा अधिकार राज्याला नाही, केंद्र सरकारला आहे, त्याची जबाबदारी केंद्राची असल्याने दिल्लीतील दंगलीची संपूर्ण जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच आहे. ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले आहेत अशी टीकाही पवारांनी आज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही या दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा - 'नाणार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ; उद्धव ठाकरे दिलेला शब्द फिरवणार नाहीत'

महाराष्ट्रातील सरकारविषयी बोलताना ते म्हणाले की, अनेक लोकांना प्रश्न पडत आहे, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे, हे कसे काय चालेल?. हे सरकार पाच वर्षे शंभर टक्के चालेल यात शंका नाही. देश पातळीवर जबाबदारी असेल ती अन्य पक्षांना सोबत घेऊन करू, राज्यात एकसंघ विचार करून सरकार चालेल. भाजप-सेनेने एकत्र निवडणूक लढवली, पण पहिल्यापासून भाजपने राज्य आपल्या मुठीत कसे येईल, यासाठी पाऊले उचलली. मला आनंद आहे याची जाण शिवसेनेने ठेवली, बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, पण जातीय राजकारणाला पाठींबा दिला नव्हता.

दिल्लीतील निवडणुकीचे चित्र ऐतिहासिक आहे. त्याचे समाधान तुम्हाला-आम्हाला आहे. राज्यकर्ते चुकीचे वागायला लागले, धर्माचा आधार घेऊन राजकारण करू लागले आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी लोक लढत आहेत, अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. यासाठी गवर्नरांना एक पत्र लिहिले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा - अल्पवयीन मुलीशी जीममध्ये अश्लील चाळे करणारा विकृत प्रशिक्षक गजाआड

ज्या राज्यात पूर्वी भाजपचे सरकार होते, तेथे भाजपचे सरकार आता राहिले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर हे बदल होत आहेत. याचा अर्थ जनतेचे चित्र आता स्पष्ट आहे, केंद्रातही सरकार बदल होईल, असेही पवार म्हणाले.

मुंबई - मुंबई शहरात पक्षाला अधिक काम करण्याची, संघटना वाढविण्याची गरज आहे. नव्यांना संधी दिली पाहिजे, त्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मुबंई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीरादरम्यान बोलताना म्हणाले. अन्याय अत्याचाराविरोधात उभे राहत, जातीचे राजकारण करणाऱ्या शक्तींविरोधात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिबिरासाठी ज्येष्ठ नेत्यांसह, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबीर घेऊन आपली दिशा ठरवत असलो तरी मजबूत संघटना उभारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

दिल्लीत कायदा सुव्यवस्था बघण्याचा अधिकार राज्याला नाही, केंद्र सरकारला आहे, त्याची जबाबदारी केंद्राची असल्याने दिल्लीतील दंगलीची संपूर्ण जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच आहे. ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले आहेत अशी टीकाही पवारांनी आज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही या दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा - 'नाणार होणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ; उद्धव ठाकरे दिलेला शब्द फिरवणार नाहीत'

महाराष्ट्रातील सरकारविषयी बोलताना ते म्हणाले की, अनेक लोकांना प्रश्न पडत आहे, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे, हे कसे काय चालेल?. हे सरकार पाच वर्षे शंभर टक्के चालेल यात शंका नाही. देश पातळीवर जबाबदारी असेल ती अन्य पक्षांना सोबत घेऊन करू, राज्यात एकसंघ विचार करून सरकार चालेल. भाजप-सेनेने एकत्र निवडणूक लढवली, पण पहिल्यापासून भाजपने राज्य आपल्या मुठीत कसे येईल, यासाठी पाऊले उचलली. मला आनंद आहे याची जाण शिवसेनेने ठेवली, बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, पण जातीय राजकारणाला पाठींबा दिला नव्हता.

दिल्लीतील निवडणुकीचे चित्र ऐतिहासिक आहे. त्याचे समाधान तुम्हाला-आम्हाला आहे. राज्यकर्ते चुकीचे वागायला लागले, धर्माचा आधार घेऊन राजकारण करू लागले आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी लोक लढत आहेत, अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. यासाठी गवर्नरांना एक पत्र लिहिले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

हेही वाचा - अल्पवयीन मुलीशी जीममध्ये अश्लील चाळे करणारा विकृत प्रशिक्षक गजाआड

ज्या राज्यात पूर्वी भाजपचे सरकार होते, तेथे भाजपचे सरकार आता राहिले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर हे बदल होत आहेत. याचा अर्थ जनतेचे चित्र आता स्पष्ट आहे, केंद्रातही सरकार बदल होईल, असेही पवार म्हणाले.

Last Updated : Mar 1, 2020, 7:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.