ETV Bharat / state

विद्यापीठाच्या परीक्षा समितीची पहिली बैठक निष्फळ

राज्यातील सर्वच विद्यापीठातील परीक्षा कशा घ्यायच्या यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने चार कुलगुरू आणि दोन संचालकांची , एक समिती ६ एप्रिल रोजी स्थापन केली होती. त्यानंतर आज तब्बल नऊ दिवसानंतर या‍ समितीची पहिली बैठक ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यातून पार पडली.

author img

By

Published : Apr 14, 2020, 6:17 PM IST

Updated : Apr 14, 2020, 11:28 PM IST

mumbai university exam committee
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा समितीची पहिली बैठक निष्फळ

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये थांबलेल्या परीक्षांसोबतच सीईटी आदी परीक्षांसाठी उच्च शिक्षण विभागाने नेमलेल्या कुलगुरूंच्या समितीची पहिली बैठक आज (मंगळवारी) पार पडली. मात्र, परीक्षांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या कुलगुरुंमध्येच समन्वय नसल्याने कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यामुळे या बैठकीत केवळ थातूरमातूर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली.

राज्यातील सर्वच विद्यापीठातील परीक्षा कशा घ्यायच्या यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने चार कुलगुरू आणि दोन संचालकांची , एक समिती ६ एप्रिल रोजी स्थापन केली होती. त्यानंतर आज तब्बल नऊ दिवसानंतर या‍ समितीची पहिली बैठक ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यातून पार पडली. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये परीक्षांच्या संदर्भात एक नियमावली आणि पॅटर्न नसल्याने त्यात मेळ कसा घालायचा हा सर्वात मोठा प्रश्न समितीपुढे असताना अद्यापही समितीपुढे किती परीक्षा आहेत, त्या किती दिवस चालतात, त्या कशा घेतल्या जातात, याची माहितीच आली नाही. त्यामुळे ही माहिती आता मागवली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

कोरानाचे संकट राज्यावर पुन्हा गंभीर होत असताना राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीन घेण्याचा एक पर्याय सुरूवातीपासून समोर आला असला तरी त्याला मुंबई, पुणे येथील विद्यापीठ वगळता दुसऱ्या एका विद्यापीठाने खो घातला असल्याचे सांगण्यात येते. या विद्यापीठाचा पसारा राज्यात आणि परराज्यात असतानाही त्यांच्याकडे ऑनलाईन परीक्षा आणि निकाल लावण्यासाठी यंत्रणाच नसल्याने त्यांनी यासाठी आडकाठी घातली असून राज्यातील इतर विद्यापीठांचीही अशीच अवस्था असल्याचे समोर आले आहे.


पुणे आणि मुंबई विद्यापीठाकडे ऑनलाईन परीक्षा आणि निकाल लावण्यासंदर्भात यंत्रणा असली तरी इतर विद्यापीठांमध्ये प्रचंड मोठा गोंधळ असल्याने या परीक्षांचा मेळ घालणे समितीला कठीण होणार आहे. त्यातच जे कुलगुरू या समितीवर आहेत, त्यांच्यातच परीक्षांच्या संदर्भात एकवाक्यता नसल्याने आजच्या या पहिल्या बैठकीत एका कुलगुरूंनी आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठे आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये थांबलेल्या परीक्षांसोबतच सीईटी आदी परीक्षांसाठी उच्च शिक्षण विभागाने नेमलेल्या कुलगुरूंच्या समितीची पहिली बैठक आज (मंगळवारी) पार पडली. मात्र, परीक्षांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या कुलगुरुंमध्येच समन्वय नसल्याने कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. यामुळे या बैठकीत केवळ थातूरमातूर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली.

राज्यातील सर्वच विद्यापीठातील परीक्षा कशा घ्यायच्या यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने चार कुलगुरू आणि दोन संचालकांची , एक समिती ६ एप्रिल रोजी स्थापन केली होती. त्यानंतर आज तब्बल नऊ दिवसानंतर या‍ समितीची पहिली बैठक ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यातून पार पडली. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये परीक्षांच्या संदर्भात एक नियमावली आणि पॅटर्न नसल्याने त्यात मेळ कसा घालायचा हा सर्वात मोठा प्रश्न समितीपुढे असताना अद्यापही समितीपुढे किती परीक्षा आहेत, त्या किती दिवस चालतात, त्या कशा घेतल्या जातात, याची माहितीच आली नाही. त्यामुळे ही माहिती आता मागवली जाणार असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.

कोरानाचे संकट राज्यावर पुन्हा गंभीर होत असताना राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीन घेण्याचा एक पर्याय सुरूवातीपासून समोर आला असला तरी त्याला मुंबई, पुणे येथील विद्यापीठ वगळता दुसऱ्या एका विद्यापीठाने खो घातला असल्याचे सांगण्यात येते. या विद्यापीठाचा पसारा राज्यात आणि परराज्यात असतानाही त्यांच्याकडे ऑनलाईन परीक्षा आणि निकाल लावण्यासाठी यंत्रणाच नसल्याने त्यांनी यासाठी आडकाठी घातली असून राज्यातील इतर विद्यापीठांचीही अशीच अवस्था असल्याचे समोर आले आहे.


पुणे आणि मुंबई विद्यापीठाकडे ऑनलाईन परीक्षा आणि निकाल लावण्यासंदर्भात यंत्रणा असली तरी इतर विद्यापीठांमध्ये प्रचंड मोठा गोंधळ असल्याने या परीक्षांचा मेळ घालणे समितीला कठीण होणार आहे. त्यातच जे कुलगुरू या समितीवर आहेत, त्यांच्यातच परीक्षांच्या संदर्भात एकवाक्यता नसल्याने आजच्या या पहिल्या बैठकीत एका कुलगुरूंनी आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात आले.

Last Updated : Apr 14, 2020, 11:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.