ETV Bharat / state

भारत विरुद्ध वेस्टइंडिज सामन्याला पोलीस सुरक्षा देण्यास मुंबई पोलिसांची असमर्थता

author img

By

Published : Nov 22, 2019, 10:01 AM IST

६ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी व पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळ वापरण्यात येते.

भारत विरुद्ध वेस्टइंडिजला सामन्याला पोलीस सुरक्षा देण्यास मुंबई पोलिसांची असमर्थता

मुंबई - पुढील महिन्यात ६ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात टी-20 सामना खेळविला जाणार आहे. मात्र, या सामन्यासाठी लागणारी पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यास मुंबई पोलिसांकडून नकार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- प्रशासनाने काश्मीरवरील निर्बंधांबाबत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे - सर्वोच्च न्यायालय

६ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी व पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळ वापरण्यात येते. याबरोबरच सहा डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यामुळे संवेदनशील परिसरामध्ये मुंबई पोलिसांना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. याचदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 सामन्यासाठी पोलीस बळ अपुरे पडत असल्याचे कळत आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी लवकरच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई - पुढील महिन्यात ६ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात टी-20 सामना खेळविला जाणार आहे. मात्र, या सामन्यासाठी लागणारी पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यास मुंबई पोलिसांकडून नकार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- प्रशासनाने काश्मीरवरील निर्बंधांबाबत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे - सर्वोच्च न्यायालय

६ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी व पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस मनुष्यबळ वापरण्यात येते. याबरोबरच सहा डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यामुळे संवेदनशील परिसरामध्ये मुंबई पोलिसांना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. याचदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 सामन्यासाठी पोलीस बळ अपुरे पडत असल्याचे कळत आहे. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी लवकरच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:पुढील महिन्यात सहा डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्टइंडीज असा टी-20 सामना खेळविला जाणार आहे मात्र या सामन्यासाठी लागणारी पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यास मुंबई पोलिसांकडून नकार देण्यात आल्याचे सांगण्यात आलेल आहे.


Body:याचं कारण म्हणजे सहा डिसेंबर रोजी मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दाखल होतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा व पोलिस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस मनुष्यबळ हे वापरण्यात येते . याबरोबरच सहा डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यामुळे संवेदनशील परिसरामध्ये मुंबई पोलिसांना मोठा पोलिस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे .याचदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सहा डिसेंबर रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टि 20 सामन्यासाठी पोलीस बळ अपुरे पडत असल्याचे कळत आहे. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी हे लवकरच मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.