ETV Bharat / state

Mumbai High Court: JEE मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याच्या याचिकेवर स्थगिती, आदेश दाखल करण्याचे निर्देश

author img

By

Published : Jan 4, 2023, 4:14 PM IST

Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जेईई मेन 2023 सत्र 1 पुढे ढकलण्याच्या याचिकेवर स्थगिती दिली आहे. याचिकाकर्ता परीक्षेचं माहितीपत्रक सादर करू शकला नाही. (High Court) त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहे. तुम्ही ज्या नियमांना आव्हान देत आहात ते तुम्ही दाखल केलेले नाहीत? (JEE Main exam) या संदर्भातील माहिती देण्याकरिता याचिकाकर्ता वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी 10 जानेवारीपर्यंत तहकुब केली आहे.

Mumbai High Court
Mumbai High Court

मुंबई: जानेवारी महिन्याच्या शेवटी अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे (JEE Main exam) ढकलण्यात यावी, आणि 75 टक्के गुणांच्या पात्रतेचा निकष शिथिल करावेत, अशी मागणी करणारी (High Court) जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. (Mumbai High Court) या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता यांना कोणत्या नियमाच्या आधारे याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती याचिकेसोबत जोडली नसल्याने न्यायालयाने याचिकाकर्ता फटकारले आहे. कोणत्या नियमावली आधारे याचिका दाखल केली. या संदर्भातील माहिती देण्याकरिता याचिकाकर्ता वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी 10 जानेवारीपर्यंत तहकुब केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जेईई मेन 2023 सत्र 1 पुढे ढकलण्याच्या याचिकेवर स्थगिती दिली आहे. याचिकाकर्ता परीक्षेचं माहितीपत्रक सादर करू शकला नाही. त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहे. तुम्ही ज्या नियमांना आव्हान देत आहात ते तुम्ही दाखल केलेले नाहीत? तुम्ही ज्या नियमांना आव्हान देत आहात त्या नियमांशिवाय तुम्ही याचिका कशी दाखल करू शकता? हे कसे अन्यायकारक आहे, ते आम्हाला तपासावे लागेल अशी टिप्पणी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठाने केली आहे.

24 ते 31 जानेवारीदरम्यान होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासह आयआयटीमध्ये प्रवेशास पत्र होण्यासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करावा अशी मागणी वकील अँड. अनुभा श्रीवास्तव सहाय जनहित याचिकेतून केली आहे. तसेच जेईई मुख्य परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेने 15 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेलाही याचिकेला आव्हान दिले आहे.

प्रभारी मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर कार्यकर्ते अनुभा सहाय यांनी बारावीच्या किमान 75% गुणांच्या पात्रतेच्या निकषाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी केली. आगामी जेईई मेन परीक्षा एप्रिल 2023 पर्यंत पुढे ढकलण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने माहितीपत्रक रेकॉर्डवर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. पुढील तारीख 10 जानेवारी असे आदेश देताना न्यायालयाने सांगितले.

आयआयटीमधील प्रवेशासाठी उच्च माध्यमिक परीक्षेतील 75 टक्के गुणांचा पात्रता निकष किमान उत्तीर्ण गुणांपर्यंत शिथिल करण्यात यावी. मागील वर्षीपर्यंत 75 टक्के गुणांचा पात्रता निकष लागू नव्हता असेही सहाय यांनी याचिकेत म्हटले आहे. अचानक करण्यात पात्रता निकषांतील या बदलामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो असेही याचिकेत म्हटले आहे. जेईई परीक्षेच्या कालावधीत 12 वीच्या विविध राज्य व अन्य परीक्षा मंडळांच्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. बहुतांश राज्य मंडळांनी जानेवारीमध्ये त्यांच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचे वेळापत्रक आखले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई मुख्य परीक्षा देणे शक्य होणार नाही.

जेईई परीक्षेची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली असून साधारणपणे वेळापत्रकाच्या तीन चार महिने आधी परीक्षा जाहीर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो. परंतु जानेवारीमधील नियोजित मुख्य परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर सुट्टीकालीन न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती एस.जी.चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर आले असता खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे याचिकेवर नियमित न्यायालयासमोर सुनावणी आज पार पडली आहे.

मुंबई: जानेवारी महिन्याच्या शेवटी अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे (JEE Main exam) ढकलण्यात यावी, आणि 75 टक्के गुणांच्या पात्रतेचा निकष शिथिल करावेत, अशी मागणी करणारी (High Court) जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली होती. (Mumbai High Court) या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता यांना कोणत्या नियमाच्या आधारे याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती याचिकेसोबत जोडली नसल्याने न्यायालयाने याचिकाकर्ता फटकारले आहे. कोणत्या नियमावली आधारे याचिका दाखल केली. या संदर्भातील माहिती देण्याकरिता याचिकाकर्ता वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी 10 जानेवारीपर्यंत तहकुब केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जेईई मेन 2023 सत्र 1 पुढे ढकलण्याच्या याचिकेवर स्थगिती दिली आहे. याचिकाकर्ता परीक्षेचं माहितीपत्रक सादर करू शकला नाही. त्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहे. तुम्ही ज्या नियमांना आव्हान देत आहात ते तुम्ही दाखल केलेले नाहीत? तुम्ही ज्या नियमांना आव्हान देत आहात त्या नियमांशिवाय तुम्ही याचिका कशी दाखल करू शकता? हे कसे अन्यायकारक आहे, ते आम्हाला तपासावे लागेल अशी टिप्पणी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठाने केली आहे.

24 ते 31 जानेवारीदरम्यान होणारी जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यासह आयआयटीमध्ये प्रवेशास पत्र होण्यासाठी 75 टक्के गुणांचा पात्रता निकष शिथिल करावा अशी मागणी वकील अँड. अनुभा श्रीवास्तव सहाय जनहित याचिकेतून केली आहे. तसेच जेईई मुख्य परीक्षा घेण्याबाबत आणि परीक्षेच्या पात्रता निकषाबाबत केंद्रीय परीक्षा संस्थेने 15 डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेलाही याचिकेला आव्हान दिले आहे.

प्रभारी मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठासमोर कार्यकर्ते अनुभा सहाय यांनी बारावीच्या किमान 75% गुणांच्या पात्रतेच्या निकषाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी केली. आगामी जेईई मेन परीक्षा एप्रिल 2023 पर्यंत पुढे ढकलण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने माहितीपत्रक रेकॉर्डवर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. पुढील तारीख 10 जानेवारी असे आदेश देताना न्यायालयाने सांगितले.

आयआयटीमधील प्रवेशासाठी उच्च माध्यमिक परीक्षेतील 75 टक्के गुणांचा पात्रता निकष किमान उत्तीर्ण गुणांपर्यंत शिथिल करण्यात यावी. मागील वर्षीपर्यंत 75 टक्के गुणांचा पात्रता निकष लागू नव्हता असेही सहाय यांनी याचिकेत म्हटले आहे. अचानक करण्यात पात्रता निकषांतील या बदलामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो असेही याचिकेत म्हटले आहे. जेईई परीक्षेच्या कालावधीत 12 वीच्या विविध राज्य व अन्य परीक्षा मंडळांच्या पूर्वपरीक्षा होणार आहेत. बहुतांश राज्य मंडळांनी जानेवारीमध्ये त्यांच्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचे वेळापत्रक आखले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयआयटी जेईई मुख्य परीक्षा देणे शक्य होणार नाही.

जेईई परीक्षेची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली असून साधारणपणे वेळापत्रकाच्या तीन चार महिने आधी परीक्षा जाहीर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळतो. परंतु जानेवारीमधील नियोजित मुख्य परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर सुट्टीकालीन न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती एस.जी.चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर आले असता खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे याचिकेवर नियमित न्यायालयासमोर सुनावणी आज पार पडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.