ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान, ५८ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,५२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५२,९०२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

author img

By

Published : Dec 31, 2020, 7:29 PM IST

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - आज राज्यात ३,५०९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,३२,११२ वर पोहचला आहे. राज्यात आज ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,५२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५२,९०२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के -

राज्यात आज ३,६१२ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १८,२८,५४६ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२७,४७,६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३२,११२ नमुने म्हणजेच १५.१६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,८१,३०३ व्यक्ती गृह अलगीकरणात असून राज्यात एकूण ५२,९०२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

मुंबई - आज राज्यात ३,५०९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,३२,११२ वर पोहचला आहे. राज्यात आज ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,५२१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५२,९०२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के -

राज्यात आज ३,६१२ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १८,२८,५४६ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२७,४७,६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३२,११२ नमुने म्हणजेच १५.१६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,८१,३०३ व्यक्ती गृह अलगीकरणात असून राज्यात एकूण ५२,९०२ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.