ETV Bharat / state

टेस्ला कंपनीने कर्नाटकची निवड केल्याने मनसेने साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

भारतातील वाहन उत्पादन क्षेत्रातील मागणी सर्व बाहेरील देशातील कंपनी भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची भारतात एंट्री झाली आहे. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने उत्पादन करण्यासाठी कर्नाटक राज्याची निवड केली आहे.

author img

By

Published : Jan 13, 2021, 2:05 PM IST

टेस्ला कंपनीने कर्नाटकची निवड केल्याने मनसेने साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा
टेस्ला कंपनीने कर्नाटकची निवड केल्याने मनसेने साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई - भारतातील वाहन उत्पादन क्षेत्रातील मागणी सर्व बाहेरील देशातील कंपनी भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची भारतात एंट्री झाली आहे. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने उत्पादन करण्यासाठी कर्नाटक राज्याची निवड केली आहे. आता यावरून राजकरण तापू लागले आहे. या कंपनीने महाराष्ट्राची निवड न केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली आहे.


रिट्वीट करुन टीका
मंत्री आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली होती. तसेच केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन हे निमंत्रण दिल्याचे ट्विटरद्वारे आदित्य यांनी सांगितले होते. आदित्याच्या त्याच ट्विटला रिप्लाय देताना देशपांडे यांनी, “टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका” असे ट्विट करत आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे.


गंभीर होण्याची गरज
सुमारे तीस वर्षांपूर्वी टेस्लासारख्या कंपनीला देशात कार्यालय, संशोधन केंद्र सुरू करायचे असते तर त्यांनी प्राधान्याने महाराष्ट्राचा विचार केला असता. आज महाराष्ट्राने प्रयत्न करूनही त्यांनी कर्नाटकचा विचार केला. आपण सर्वांनी गंभीर होत ह्याचा विचार केला पाहिजे, असा सल्ला मनसे नेते अनिल शिदोरे यांनी दिला आहे.


हेही वाचा - लग्न तोडल्याच्या रागातून तरुणी आणि तिच्या आईचे अपहरण; नवरदेवाला अटक

मुंबई - भारतातील वाहन उत्पादन क्षेत्रातील मागणी सर्व बाहेरील देशातील कंपनी भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची भारतात एंट्री झाली आहे. एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने ‘टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने उत्पादन करण्यासाठी कर्नाटक राज्याची निवड केली आहे. आता यावरून राजकरण तापू लागले आहे. या कंपनीने महाराष्ट्राची निवड न केल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली आहे.


रिट्वीट करुन टीका
मंत्री आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली होती. तसेच केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन हे निमंत्रण दिल्याचे ट्विटरद्वारे आदित्य यांनी सांगितले होते. आदित्याच्या त्याच ट्विटला रिप्लाय देताना देशपांडे यांनी, “टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका” असे ट्विट करत आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे.


गंभीर होण्याची गरज
सुमारे तीस वर्षांपूर्वी टेस्लासारख्या कंपनीला देशात कार्यालय, संशोधन केंद्र सुरू करायचे असते तर त्यांनी प्राधान्याने महाराष्ट्राचा विचार केला असता. आज महाराष्ट्राने प्रयत्न करूनही त्यांनी कर्नाटकचा विचार केला. आपण सर्वांनी गंभीर होत ह्याचा विचार केला पाहिजे, असा सल्ला मनसे नेते अनिल शिदोरे यांनी दिला आहे.


हेही वाचा - लग्न तोडल्याच्या रागातून तरुणी आणि तिच्या आईचे अपहरण; नवरदेवाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.