ETV Bharat / state

पाकिस्तानी गायकांची गाणी वाजवू नका, मनसेने दिला एफएम वाहिन्यांना दम

भारतीय संगीत कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांकडून गाणी गावून घेऊन नयेत, असे मनसेने रविवारी सांगितले. पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका मनसेने घेतली आहे.

author img

By

Published : Feb 18, 2019, 5:07 PM IST

मनसे

मुंबई - एफएम वाहिन्यांवर पाकिस्तानी गायकांची गाणी वाजवणे बंद करा, असा दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारीला हल्ला केला होता. त्या पार्श्वभूमीवर मनसेने पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. याआधी संगीत कंपन्यांनाही त्यांनी पाकिस्तानी गायकांना संधी न देण्याबद्दल सांगितले होते.


महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी एफएम वाहिन्यांना यासंबंधी एक पत्र पाठवले आहे. त्यात त्या म्हणाल्या, “शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध आहोत. आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर मात्र अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक - संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत.


पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आपल्या देशाविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहे. भारत-पाक सीमेवर अत्यंत तणावाचे वातावरण आहे. तसेच, या दोन देशांमध्ये कधीही युद्धाचा भडका उडेल अशी नाजूक स्थिती असताना आपली रेडिओ वाहिनी मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी करोडो भारतीयांना ऐकवत आहे.

undefined


संगीत ऐकणाऱयांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते हे खरे आहे. तरी सध्याच्या संवेदनशील स्थितीत पाकिस्तानी गायक - संगीतकारांची गाणी मात्र देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण करत आहेत. म्हणूनच रेडिओ वाहिन्यांवर पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जाऊ नयेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.”


भारतीयांच्या भावनांचा आपण आदर कराल याची खात्री आहेच. अन्यथा आपल्या रेडिओ वाहिनीवरून वाजवली जाणारी पाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाऊक आहेच, असा धमकीवजा इशाराच शालिनी ठाकरे यांनी पत्राद्वारे सर्व एफएम रेडिओ वाहिन्यांच्या संचालकांना आणि कार्यक्रम प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.

मुंबई - एफएम वाहिन्यांवर पाकिस्तानी गायकांची गाणी वाजवणे बंद करा, असा दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने १४ फेब्रुवारीला हल्ला केला होता. त्या पार्श्वभूमीवर मनसेने पाकिस्तानी कलाकारांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. याआधी संगीत कंपन्यांनाही त्यांनी पाकिस्तानी गायकांना संधी न देण्याबद्दल सांगितले होते.


महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या शालिनी ठाकरे यांनी एफएम वाहिन्यांना यासंबंधी एक पत्र पाठवले आहे. त्यात त्या म्हणाल्या, “शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध आहोत. आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर मात्र अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक - संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत.


पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आपल्या देशाविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहे. भारत-पाक सीमेवर अत्यंत तणावाचे वातावरण आहे. तसेच, या दोन देशांमध्ये कधीही युद्धाचा भडका उडेल अशी नाजूक स्थिती असताना आपली रेडिओ वाहिनी मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी करोडो भारतीयांना ऐकवत आहे.

undefined


संगीत ऐकणाऱयांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते हे खरे आहे. तरी सध्याच्या संवेदनशील स्थितीत पाकिस्तानी गायक - संगीतकारांची गाणी मात्र देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण करत आहेत. म्हणूनच रेडिओ वाहिन्यांवर पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जाऊ नयेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.”


भारतीयांच्या भावनांचा आपण आदर कराल याची खात्री आहेच. अन्यथा आपल्या रेडिओ वाहिनीवरून वाजवली जाणारी पाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाऊक आहेच, असा धमकीवजा इशाराच शालिनी ठाकरे यांनी पत्राद्वारे सर्व एफएम रेडिओ वाहिन्यांच्या संचालकांना आणि कार्यक्रम प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.

Intro:पाकिस्तानी गायकांची गाणी एफएमवर वाजवणं बंद करा मनसेचा इशारा



मुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झालेत. भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका कधी उडेल, काही सांगता येत नाही. अशा स्फोटक वातावरणात आपल्या रेडिओ वाहिन्या मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी भारतीयांना ऐकवतायत. सिनेमा असो की यूट्यूब किंवा अगदी रेडिओ वाहिन्या, दरवेळी काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच पाकिस्तानी कलाकारांना विरोध करायचा? या रेडिओ वाहिन्यांमध्ये जे लोक काम करतात किंवा इथल्या कार्यक्रमांचं शेड्यूल जे आखतात, त्यांना देशवासीयांची भावना काय आहे, याची काहीच जाणीव नाही का ? मनसे जोपर्यंत विरोध करणार नाही तोपर्यंत पाकिस्तानचं किरीकर वाजतच राहणार का ?” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी एफएम रेडिओ वाहिन्यांना रोखठोक इशारा दिला आहे.



एफएम रेडिओ वाहिन्यांना पाठवलेल्या पत्रात शालिनी ठाकरे म्हणतात, “शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा सूड घेण्यासाठी एक देश म्हणून आपण सर्व भारतीय वचनबद्ध असताना आपल्या लोकप्रिय रेडिओ वाहिनीवर मात्र अत्यंत निर्लज्जपणे पाकिस्तानी गायक -संगीतकारांची गाणी वाजवली जात आहेत. पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र आपल्या देशाविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत असताना, भारत-पाक सीमेवर अत्यंत तणावाचं वातावरण असताना तसंच या दोन देशांमध्ये कधीही युद्धाचा भडका उडेल अशी नाजूक स्थिती असताना आपली रेडिओ वाहिनी मात्र नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम, अली झफर, सज्जाद अली, गुलाम अली, रेश्मा, सफाकत अमानत अली यांसारख्या पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी करोडो भारतीयांना ऐकवत आहे. संगीत ऐकणा-याच्या मनात प्रेमाची भावना निर्माण होते हे खरं असलं तरी सध्याच्या संवेदनशील स्थितीत पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी मात्र देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण करत आहेत. म्हणूनच रेडिओ वाहिन्यांवर पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी वाजवली जाऊ नयेत, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे.”



आपल्या रेडिओ वाहिनीच्या करोडो श्रोत्यांच्या पाकिस्तानबाबतच्या संतप्त भावना लक्षात घेऊन आपण पाकिस्तानी गायक-संगीतकारांची गाणी आपल्या रेडिओ वाहिनीवर वाजवणं तत्काळ थांबवावं, ही आग्रहाची मागणी आम्ही या पत्राद्वारे करत आहोत. भारतीयांच्या भावनांचा आपण आदर कराल याची खात्री आहेच, अन्यथा आपल्या रेडिओ वाहिनीवरून वाजवली जाणारी पाकिस्तानी गाणी बंद करण्यासाठी ‘सर्जिकल स्ट्राइक’ कसा करायचा, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ठाऊक आहेच, असा इशाराच शालिनी ठाकरे यांनी पत्राद्वारे सर्व एफएम रेडिओ वाहिन्यांच्या संचालकांना तसंच प्रोग्राम हेड्सना पाठवलेल्या पत्रात दिला आहे.Body:कConclusion:ह
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.