ETV Bharat / state

MLA Bachu Kadu Case : आमदार बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, पुढील सुनावणीस हजर न राहील्यास ...

राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणात (Ministry official assault case) मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची पुढील सुनावणी 12 जानेवारी रोजी होणार आहे. तसेच 12 जानेवारीच्या सुनावणी दरम्यान (next hearing on January 12) आमदार बच्चू कडू हजर न राहिल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

author img

By

Published : Jan 3, 2023, 4:11 PM IST

MLA Bachu Kadu Case
बच्चू कडूंचे मंत्रालयातील अधिकारी मारहाण प्रकरण

मुंबई : राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणात (Ministry official assault case) मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज आरोप निश्चिती करण्यात येणार होती. मात्र बच्चू कडू आज पुन्हा प्रकृतीचे कारण देत, मुंबई सत्र न्यायालयात हजर राहू शकले नाही. त्यामुळे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बच्चू कडू पुढील सुनावणीस हजर न राहिल्यास वॉरंट जारी करण्यात येईल, असे बच्चू कडू यांच्या वकिलांना म्हटले आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 12 जानेवारी रोजी (next hearing on January 12) होणार आहे.




अडचणी वाढण्याची शक्यता : बच्चू कडू यांच्या विरोधात आज आरोप निश्चिती करण्यात येणार होती. मात्र बच्चू कडू यांची तब्येत खराब असल्याचे सर्टिफिकेट न्यायालयासमोर बच्चू कडू यांच्या वकिलांनी सादर केले. तसेच आज उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती अर्जाद्वारे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पुढील तारखेला हजर न राहिल्यास वॉरंट जारी करण्यात येईल, असे बच्चू कडू यांच्या वकिलांना म्हटले आहे. मागील सुनावणी वेळी देखील बच्चू कडू उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात नोटीस बजावण्यात आली होती. 12 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान बच्चू कडू न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.



प्रहार संघटनेचे वेगळेपण : बच्चू कडू यांना 2016 मध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात गिरगाव कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. सध्या बच्चू कडू जामीनावर बाहेर आहे. बच्चू कडू यांनी या पहिले देखील अनेकदा उग्र रूपाचे अनेक आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल आहे. प्रहार संघटना ही वेगळे आंदोलने करण्या करिता लोकप्रिय आहे.



काय आहे प्रकरण : सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. 30 मार्च 2016 ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.



बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. 'राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे’, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मात्र आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर,संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मुंबई : राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी प्रकरणात (Ministry official assault case) मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आज आरोप निश्चिती करण्यात येणार होती. मात्र बच्चू कडू आज पुन्हा प्रकृतीचे कारण देत, मुंबई सत्र न्यायालयात हजर राहू शकले नाही. त्यामुळे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बच्चू कडू पुढील सुनावणीस हजर न राहिल्यास वॉरंट जारी करण्यात येईल, असे बच्चू कडू यांच्या वकिलांना म्हटले आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 12 जानेवारी रोजी (next hearing on January 12) होणार आहे.




अडचणी वाढण्याची शक्यता : बच्चू कडू यांच्या विरोधात आज आरोप निश्चिती करण्यात येणार होती. मात्र बच्चू कडू यांची तब्येत खराब असल्याचे सर्टिफिकेट न्यायालयासमोर बच्चू कडू यांच्या वकिलांनी सादर केले. तसेच आज उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात यावी, अशी विनंती अर्जाद्वारे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पुढील तारखेला हजर न राहिल्यास वॉरंट जारी करण्यात येईल, असे बच्चू कडू यांच्या वकिलांना म्हटले आहे. मागील सुनावणी वेळी देखील बच्चू कडू उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात नोटीस बजावण्यात आली होती. 12 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणी दरम्यान बच्चू कडू न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.



प्रहार संघटनेचे वेगळेपण : बच्चू कडू यांना 2016 मध्ये मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणात गिरगाव कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांना 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. सध्या बच्चू कडू जामीनावर बाहेर आहे. बच्चू कडू यांनी या पहिले देखील अनेकदा उग्र रूपाचे अनेक आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे देखील दाखल आहे. प्रहार संघटना ही वेगळे आंदोलने करण्या करिता लोकप्रिय आहे.



काय आहे प्रकरण : सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता. 30 मार्च 2016 ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.



बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. 'राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे’, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मात्र आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर,संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.