ETV Bharat / state

'रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत समोर आली'

author img

By

Published : Oct 1, 2020, 7:55 PM IST

Updated : Oct 1, 2020, 9:27 PM IST

हाथरस येथील घटनेचा तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झालेल्या घटनेचा निषेध करत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील

मुंबई - महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि कृती उलटी करायची, रामाचे नाव घ्यायचे कृती नथुरामाची करायची, ही भाजपची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे, असा जोरदार टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचाही निषेध केला आहे.

बोलताना जयंत पाटील
हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. देशातील एका जुन्या व मुख्य पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपने ज्यापद्धतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करुन बरीच आंदोलने चिरडली. तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपने वेळीच आपली धोरणे व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - पायल घोष प्रकरणात अनुराग कश्यपची पोलिसांकडून आठ तास चौकशी

मुंबई - महात्मा गांधींचे नाव घ्यायचे आणि कृती उलटी करायची, रामाचे नाव घ्यायचे कृती नथुरामाची करायची, ही भाजपची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे, असा जोरदार टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी त्यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचाही निषेध केला आहे.

बोलताना जयंत पाटील
हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. देशातील एका जुन्या व मुख्य पक्षाच्या प्रमुखाला अशाप्रकारे दिलेली वागणूक ही अत्यंत निंदनीय आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

भाजपने ज्यापद्धतीने उत्तरप्रदेश आणि देशामध्ये बळाचा वापर करुन बरीच आंदोलने चिरडली. तसेच राहुल गांधी यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रकार आहे. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा निषेध करतानाच भाजपने वेळीच आपली धोरणे व भूमिका सुधारली पाहिजे नाहीतर देशातील परिस्थिती आणखी बिकट होईल, अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - पायल घोष प्रकरणात अनुराग कश्यपची पोलिसांकडून आठ तास चौकशी

Last Updated : Oct 1, 2020, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.