ETV Bharat / state

महायुती 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल - मिलिंद नार्वेकर

नार्वेकर यांनी पत्नी मिरा नार्वेकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मालाड येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. यावेळी त्याच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

author img

By

Published : Oct 21, 2019, 11:52 AM IST

मिलिंद नार्वेकर

मुंबई - शिवसेना-भाजप-रासप-रिपाई महायुती 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी व्यक्त केला. नार्वेकर यांनी पत्नी मिरा नार्वेकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मालाड येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. यावेळी त्याच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा- विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

मिलिंद नार्वेकर

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

मुंबई - शिवसेना-भाजप-रासप-रिपाई महायुती 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी व्यक्त केला. नार्वेकर यांनी पत्नी मिरा नार्वेकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मालाड येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं. यावेळी त्याच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा- विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

मिलिंद नार्वेकर

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:शिवसेना भाजप रासप रिपाई महायुती 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास
शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी व्यक्त केला. नार्वेकर यांनी पत्नी मिरा नार्वेकर यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. सकाळी मालाड येथील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलं.Body:बाईट विझ्युल वेबमोजोवरून अपलोडConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.