ETV Bharat / state

एकाच मैदानावर सुरु होते दोन सामने; क्षेत्ररक्षण करताना 52 वर्षीय खेळाडूचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 1:32 PM IST

Player Death due to ball hitting Head : मुंबईतील माटुंगा परिसरात क्रिकेट सामना सुरू असताना क्षेत्ररक्षण करताना एका 52 वर्षीय खेळाडूचा डोक्याला चेंडू लागल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही घटना सोमवारी घडली असून यामागे घातपात नसल्यांच पोलिसांनी म्हटलं.

Player Death due to ball hitting Head
Player Death due to ball hitting Head

मुंबई Player Death due to ball hitting Head : मुंबईतील माटुंगा येथील दादरकर मैदानावर क्रिकेट खेळताना डोक्याला चेंडू लागल्यानं 52 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. क्षेत्ररक्षण करत असताना लगतच्या खेळपट्टीवर सुरू असलेल्या सामन्यातील चेंडू सदर व्यक्तीच्या डोक्याला लागला. यावेळी खेळाडूचा जागीच मृत्यू झालाय. हा खेळाडू दुसऱ्या दिशेला तोंड करुन क्षेत्ररक्षण करत होता. त्यामुळं चेंडू त्याच्या दिशेने येत असल्याची त्याला कल्पना नव्हती. चेंडू लागल्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. यामुळं मुंबईतील क्रिकेटपटूंमध्ये शोककळा पसरलीय.

एकाच मैदानावर सुरु होते दोन सामने : याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, माटुंगा येथील मैदानावर क्रिकेट खेळत असताना भाईंदर येथील जयेश चुन्नीलाल सावला या 52 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला. जयेश सामना खेळत असताना बाजूच्या खेळपट्टीवरही सामना सुरू होता. दोन्ही कच्छी व्हिसा ओसवाल विकास लीजंड कपमध्ये खेळले जात होते. या स्पर्धेत 50 आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी T20 स्पर्धा आहे. मात्र जागा आणि वेळेअभावी एकाच मैदानावर दोन सामने झाले. जयेश खेळत असताना क्षेत्ररक्षण करत होते. तेव्हा एक चेंडू त्यांच्या डोक्याला लागल्यानं ते बेशुद्ध झाले. यानंतर जयेश यांना तातडीनं रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडलीय.

"आम्ही या प्रकरणी अपघाती मृत्यू अहवाल म्हणजेच एडीआर नोंदवला असून सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. - दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माटुंगा पोलीस ठाणे

  • पालकांमध्ये भीतीचं वातावरण : या घटनेनं पालक पुन्हा एकदा घाबरले आहेत. भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय आहे. प्रत्येक दुसऱ्या घरातील मूलगा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहतो. अशा परिस्थितीत या घटनेनं पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या घटनेमुळं क्रिकेट खेळाताना खेळाडूनं मैदानावर सजग राहून खेळ केला पाहिजे हे अधोरिखेत झालं आहे.

हेही वाचा :

  1. जपानच्या दोन विमानांची जोरदार टक्कर; जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग, पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू
  2. साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात, कर्नाटकातील चार भाविकांचा मृत्यू

मुंबई Player Death due to ball hitting Head : मुंबईतील माटुंगा येथील दादरकर मैदानावर क्रिकेट खेळताना डोक्याला चेंडू लागल्यानं 52 वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. क्षेत्ररक्षण करत असताना लगतच्या खेळपट्टीवर सुरू असलेल्या सामन्यातील चेंडू सदर व्यक्तीच्या डोक्याला लागला. यावेळी खेळाडूचा जागीच मृत्यू झालाय. हा खेळाडू दुसऱ्या दिशेला तोंड करुन क्षेत्ररक्षण करत होता. त्यामुळं चेंडू त्याच्या दिशेने येत असल्याची त्याला कल्पना नव्हती. चेंडू लागल्यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. यामुळं मुंबईतील क्रिकेटपटूंमध्ये शोककळा पसरलीय.

एकाच मैदानावर सुरु होते दोन सामने : याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, माटुंगा येथील मैदानावर क्रिकेट खेळत असताना भाईंदर येथील जयेश चुन्नीलाल सावला या 52 वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला. जयेश सामना खेळत असताना बाजूच्या खेळपट्टीवरही सामना सुरू होता. दोन्ही कच्छी व्हिसा ओसवाल विकास लीजंड कपमध्ये खेळले जात होते. या स्पर्धेत 50 आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी T20 स्पर्धा आहे. मात्र जागा आणि वेळेअभावी एकाच मैदानावर दोन सामने झाले. जयेश खेळत असताना क्षेत्ररक्षण करत होते. तेव्हा एक चेंडू त्यांच्या डोक्याला लागल्यानं ते बेशुद्ध झाले. यानंतर जयेश यांना तातडीनं रुग्णालयात नेलं असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडलीय.

"आम्ही या प्रकरणी अपघाती मृत्यू अहवाल म्हणजेच एडीआर नोंदवला असून सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. - दीपक चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माटुंगा पोलीस ठाणे

  • पालकांमध्ये भीतीचं वातावरण : या घटनेनं पालक पुन्हा एकदा घाबरले आहेत. भारतात क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय आहे. प्रत्येक दुसऱ्या घरातील मूलगा क्रिकेटर बनण्याचं स्वप्न पाहतो. अशा परिस्थितीत या घटनेनं पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या घटनेमुळं क्रिकेट खेळाताना खेळाडूनं मैदानावर सजग राहून खेळ केला पाहिजे हे अधोरिखेत झालं आहे.

हेही वाचा :

  1. जपानच्या दोन विमानांची जोरदार टक्कर; जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग, पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू
  2. साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात, कर्नाटकातील चार भाविकांचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.