ETV Bharat / state

मालाड दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरूणीला 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश

author img

By

Published : Jul 2, 2019, 4:50 PM IST

Updated : Jul 2, 2019, 8:29 PM IST

मालाड दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरूणीला 14 तासांनी बाहेर काढले

2019-07-02 16:30:06

मालाडमधील पिंपरी पाड्यातील भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 वर्षीय तरूणीला अखेर 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे.

मालाड दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरूणीला 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश

मुंबई - मालाडमधील पिंपरी पाड्यातील भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 वर्षीय तरूणीला अखेर 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या तरूणीची जगण्यासाठी झुंज सुरू आहे. संचिता नलावडे, असे ढिगाऱ्याखालून काढलेल्या तरूणीचे नाव आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरात घरांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये संचिताचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आहे. ननावरे कुटुंबियात संचिताच्या 2 बहिणी, 1 भाऊ व आई-वडील असा परिवार होता. 

मुळचे सोलापूरच्या बार्शी गावातील हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईतील मालाड मध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून वास्तव्यास होते.
 

2019-07-02 16:30:06

मालाडमधील पिंपरी पाड्यातील भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 वर्षीय तरूणीला अखेर 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे.

मालाड दुर्घटना : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 'त्या' तरूणीला 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश

मुंबई - मालाडमधील पिंपरी पाड्यातील भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 वर्षीय तरूणीला अखेर 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या तरूणीची जगण्यासाठी झुंज सुरू आहे. संचिता नलावडे, असे ढिगाऱ्याखालून काढलेल्या तरूणीचे नाव आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरात घरांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये संचिताचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आहे. ननावरे कुटुंबियात संचिताच्या 2 बहिणी, 1 भाऊ व आई-वडील असा परिवार होता. 

मुळचे सोलापूरच्या बार्शी गावातील हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईतील मालाड मध्ये गेल्या 20 ते 25 वर्षांपासून वास्तव्यास होते.
 

Intro:मुंबई - मालाडच्या पिंपरी पाड्यातील कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 वर्षीय
मुलीला अखेर 14 तासानंतर बाहेर काढण्यात यश आलं आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर निघाली तरी सदर मुलगी जखमी असून तिची जगण्यासाठीची झुंज सुरूच आहे. Body:सोमवारची रात्र अखेरची ठरेल असं पिंपरी पाड्यातील व आंबेडकर नगरच्या रहिवाशांना
वाटलंही नसेल. पालिकेच्या जलाशय विभागाभोवती उभारण्यात आलेली संरक्षक भिंतच लोकांचे जीवघेणारी ठरली. संचिता नलावडे असे त्या मुलीचे नाव आहे. संचिता ननावरे जखमी अवस्थेत बाहेर निघाली असून अजूनही तिची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. जखमी अवस्थेत तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Conclusion:यात संचिताच संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडलं आहे. ननावरे कुटुंबियात संचिताच्या 2 बहिणी, 1भाऊ व आई वडील असा परिवार होता. मुळचे सोलापूरच्या बार्शी गावातील हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबईतील मालाड मध्ये गेले 20 ते 25 वर्षांपासून वास्तव्यास आहेत.
Last Updated : Jul 2, 2019, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.