ETV Bharat / state

#महाराष्ट्र लॉकडाऊन : आगामी काळातील नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

author img

By

Published : May 15, 2020, 7:12 PM IST

१७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आहे. यानंतर केंद्र शासन लॉकडाऊनचा चौथा टप्पा कशा स्वरूपात ठरविते ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र, राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. गेल्या सुमारे ५५ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित)

मुंबई - लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरू करणे याबाबत आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. यासंदर्भात दादर येथे बैठक घेण्यात आली.

१७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आहे. यानंतर केंद्र शासन लॉकडाऊनचा चौथा टप्पा कशा स्वरूपात ठरवेल ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र, राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत, त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. गेल्या सुमारे ५५ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला.

राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहेत? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने-आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरू करण्यात आले होते. यानंतर ६५ हजार उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यात ३५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तसेच ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले.

परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरू आहे. पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरू आहे. उद्योग सुरू झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत वाढला गेला आहे. तसेच परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. बैठकीत आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची यावरही चर्चा झाली.

हेही वाचा - तिरडीवर झोपलेल्या सरकारने जागे व्हावे, सदाभाऊ खोतांचा आंदोलनातून सरकारला इशारा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारने कशी वेगाने पाऊले उचलली तसेच त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसले, ते सांगितले. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊनच पुढील नियोजन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. संकट अजून टळलेले नाही. डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मदत आपण घेतो आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने जे पॅकेज दिले आहे, त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची? तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे? आणि दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे? यासाठी तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई - लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरू करणे याबाबत आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. यासंदर्भात दादर येथे बैठक घेण्यात आली.

१७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत आहे. यानंतर केंद्र शासन लॉकडाऊनचा चौथा टप्पा कशा स्वरूपात ठरवेल ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. मात्र, राज्याला ज्या महत्वपूर्ण सूचना करायच्या आहेत, त्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. गेल्या सुमारे ५५ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला.

राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहेत? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने-आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरू करण्यात आले होते. यानंतर ६५ हजार उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यात ३५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तसेच ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले.

परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरू आहे. पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरू आहे. उद्योग सुरू झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत वाढला गेला आहे. तसेच परराज्यातील कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. बैठकीत आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा रीतीने पाळायची यावरही चर्चा झाली.

हेही वाचा - तिरडीवर झोपलेल्या सरकारने जागे व्हावे, सदाभाऊ खोतांचा आंदोलनातून सरकारला इशारा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून राज्य सरकारने कशी वेगाने पाऊले उचलली तसेच त्याचे सकारात्मक परिणाम काय दिसले, ते सांगितले. जिल्ह्यांच्या सीमा न उघडता मर्यादित स्वरूपात आणि पुरेशी काळजी घेऊनच पुढील नियोजन करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. संकट अजून टळलेले नाही. डॉक्टर्सच्या टास्क फोर्सची मदत आपण घेतो आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. लॉकडाऊनमुळे राज्यातील साखर उद्योगासंमोर आव्हान उभे ठाकले आहे. याबाबत आपण पंतप्रधानांना पत्र लिहून मार्ग काढण्याची विनंती केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

केंद्र सरकारने जे पॅकेज दिले आहे, त्याची राज्यात अंमलबजावणी कशी करायची? तसेच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे वैद्यकीय संकट कसे रोखायचे? आणि दुसरीकडे आर्थिक आघाडीवर ठामपणे कसे उभे राहायचे? यासाठी तज्ञांच्या समितीने दिलेल्या अहवालावरही बैठकीत चर्चा झाली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.