ETV Bharat / state

Mumbai Rain: पुढील 24 तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

author img

By

Published : Jul 19, 2021, 10:28 AM IST

मुंबईत दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत मोठी जीवितहानी देखील झाली आहे. मात्र अजूनही धोका कायम आहे. पुढील चोवीस तासांत मुंबईमध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे. असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण जिल्ह्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई उपनगरमध्ये पावसाचा जोर कायम आहे.

Heavy rains expected in Mumbai in next 24 hours
पुढील 24 तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

मुंबई - दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापि कायम आहे. तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात जोरदार अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई उपनगरमध्ये पावसाचा जोर कायम -

मुंबईत दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत मोठी जीवितहानी देखील झाली आहे. मात्र अजूनही धोका कायम आहे. पुढील चोवीस तासांत मुंबईमध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे. असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण जिल्ह्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई उपनगरमध्ये पावसाचा जोर कायम आहे.

रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत -

गेले दोन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आजची स्थिती पाहिल्यास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होऊ शकते. सर्व स्थिती पाहता मुख्यमंत्री देखील प्रशासनाला अलर्ट राहण्याची निर्देश दिलेले आहे.

24 तासांतील पाऊस -

गेल्या 24 तासांत मुंबई शहर 48.88, पश्चिम उपनगर 51.89, पूर्व उपनगर 90.65, मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाची रिपरिप ही मुंबईतल्या सर्वच भागात सुरू आहे.

कोकणात रेड ऑरेंज अलर्ट -

कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अ‌ॅलर्ट आणि ऑरेंज अ‌ॅलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचे प्रशासन हे अलर्ट झाले आहे. तर राज्याच्या इतर भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या जिल्ह्यात रेड अलर्ट -

आज सोमवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई - दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा जोर अद्यापि कायम आहे. तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईत जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात जोरदार अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबई उपनगरमध्ये पावसाचा जोर कायम -

मुंबईत दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत मोठी जीवितहानी देखील झाली आहे. मात्र अजूनही धोका कायम आहे. पुढील चोवीस तासांत मुंबईमध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे. असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आलेला आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण जिल्ह्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई उपनगरमध्ये पावसाचा जोर कायम आहे.

रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत -

गेले दोन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र आजची स्थिती पाहिल्यास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र, असाच पाऊस सुरू राहिल्यास पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होऊ शकते. सर्व स्थिती पाहता मुख्यमंत्री देखील प्रशासनाला अलर्ट राहण्याची निर्देश दिलेले आहे.

24 तासांतील पाऊस -

गेल्या 24 तासांत मुंबई शहर 48.88, पश्चिम उपनगर 51.89, पूर्व उपनगर 90.65, मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाची रिपरिप ही मुंबईतल्या सर्वच भागात सुरू आहे.

कोकणात रेड ऑरेंज अलर्ट -

कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अ‌ॅलर्ट आणि ऑरेंज अ‌ॅलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचे प्रशासन हे अलर्ट झाले आहे. तर राज्याच्या इतर भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या जिल्ह्यात रेड अलर्ट -

आज सोमवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.