ETV Bharat / state

राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन - late Prime Minister Rajiv Gandhi Memorial Day

देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या नेतृत्व व दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीव गांधींना आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली.

Deputy Chief Minister on the occasion
Deputy Chief Minister on the occasion
author img

By

Published : May 21, 2021, 12:48 PM IST

मुंबई- दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया रचला. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या नेतृत्व व दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीव गांधींना आहे,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहीली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य-
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशातील युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांच्या विकासाचे धोरण राबवले. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. कोरोना संकटात आज अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संपर्क, संवाद साधत आहेत. ज्या डिजिटल क्रांतीमुळे हे शक्य झाले ती डिजीटल क्रांती राजीव गांधींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित रहावी, सर्वधर्म समभाव कायम रहावा यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांचा स्मृतीदिन 'दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस' म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असेही उपमुख्ममंत्री यावेळी म्हणाले.

मुंबई- दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात संगणक, डिजिटल क्रांतीचा पाया रचला. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या नेतृत्व व दूरदृष्टीमुळे शक्य झाली आहे. देशात संगणक युग सुरु करण्याचे श्रेय राजीव गांधींना आहे,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहीली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य-
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशातील युवकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन त्यांच्या विकासाचे धोरण राबवले. अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. कोरोना संकटात आज अनेक जण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे संपर्क, संवाद साधत आहेत. ज्या डिजिटल क्रांतीमुळे हे शक्य झाले ती डिजीटल क्रांती राजीव गांधींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित रहावी, सर्वधर्म समभाव कायम रहावा यासाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांचा स्मृतीदिन 'दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस' म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असेही उपमुख्ममंत्री यावेळी म्हणाले.

हेही वाचा-गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान; एक तास चकमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.