मुंबई - राज्यातील मुस्लीम समाजाला पाच टक्के नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तातडीने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. दलवाई यांच्या या मागणीमुळे राज्यात येत्या काळात मुस्लिमांच्या आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
राज्यात यापूर्वी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षणाचा अध्यादेश २१ जुलै २०१४ रोजी पारित करून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु यात केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाचा पाठपुरावा मागील सरकारने केला आणि मुस्लीम समाजाला मात्र त्यांच्या एकूणच परिस्थितीचा विचार करून आरक्षण हवे असतानाही त्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आला नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने यासाठीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुस्लीम समाजाला तातडीने ५ टक्के आरक्षण द्या; हुसेन दलवाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Muslim reservation news
राज्यातील मुस्लीम समाजाला पाच टक्के नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तातडीने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

मुंबई - राज्यातील मुस्लीम समाजाला पाच टक्के नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने तातडीने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. दलवाई यांच्या या मागणीमुळे राज्यात येत्या काळात मुस्लिमांच्या आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
राज्यात यापूर्वी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षणाचा अध्यादेश २१ जुलै २०१४ रोजी पारित करून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु यात केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाचा पाठपुरावा मागील सरकारने केला आणि मुस्लीम समाजाला मात्र त्यांच्या एकूणच परिस्थितीचा विचार करून आरक्षण हवे असतानाही त्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आला नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने यासाठीचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.