ETV Bharat / state

Aslam Sheikh : माजी मंत्री अस्लम शेख यांना महाराष्ट्र पर्यावरण विभागाची नोटीस

author img

By

Published : Aug 6, 2022, 10:57 AM IST

Updated : Aug 6, 2022, 11:32 AM IST

Aslam Sheikh : भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी काँग्रेस नेते व मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अस्लम शेख यांनी करोना काळात मढच्या समुद्रात सर्व नियमांना डावलत बांधकाम करण्यासाठी मदत केली. यातून समुद्रात मोठी मोठी बांधकामे उभी राहिली, यातून जवळपास हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

किरीट सोमय्या यांचा अस्लम शेख यांच्यावर आरोप
किरीट सोमय्या यांचा अस्लम शेख यांच्यावर आरोप

मुंबई - भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी काँग्रेस नेते व मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अस्लम शेख यांनी करोना काळात मढच्या समुद्रात सर्व नियमांना डावलत बांधकाम करण्यासाठी मदत केली. यातून समुद्रात मोठी मोठी बांधकामे उभी राहिली, यातून जवळपास हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्या संदर्भात आता महाराष्ट्र पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस बजावली आहे.

किरीट सोमय्या यांचा अस्लम शेख यांच्यावर आरोप

सीआरझेड नियमांचे उल्लंघन - काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री असलम शेख यांनी मुंबईत, मालाड, मढ येथे अनधिकृत पणे स्टुडिओ घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी सर्व सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून पाच स्टुडिओ समुद्रात उभारण्यात आले होते. हा घोटाळा एकंदरीत एक हजार कोटींचा असल्याचा आरोप ही सोमय्या यांनी केला होता. २०१९ मध्ये जेव्हा युतीचे सरकार होतं, त्यादरम्यान त्या ठिकाणी काहीही बांधकाम नव्हतं. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मँग्रोजची कत्तल करून स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता या प्रकरणी याची दखल घेत महाराष्ट्र पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस बजावली आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या - पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस पाठवल्यानंतर या विषयावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास हजार कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली आहेत, हा एक हजार कोटींचा घोटाळा अस्लम शेख व त्यांच्या मित्र परिवाराने केला आहे. या संदर्भामध्ये आता पर्यावरण विभागाने मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महापालिकेला यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अस्लम शेख यांनी घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट - किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर या प्रकरणी आरोप केल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर ईडीचा ससेमिरा अस्लम शेख यांच्या मागे लागणार की काय ? यासाठी ते भाजपात प्रवेश करणार की काय ? अशा चर्चाही रंगू लागली होती.

पहिल्यांदा काँग्रेसचा मंत्री निशाण्यावर - किरीट सोमय्यांनी आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले त्यांचावर ईडी, सीबीआय्, अशा चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले आहे. यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. मात्र काँग्रेसच्या कोणत्यांही नेत्यामागे चौकशी लागली नव्हती, आता मात्र शिवसेनेतील फुटीनंतर भाजपचे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडीतील अनेक नेते अडचणीत आले. अनेकांच्या पाठिमागे चौकशीचा ससेमिरा लागला. अखेर ईडी चौकशीच्या ससेमिराला कंटाळून काही शिवसेना नेत्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना पत्र लिहून किंवा इतर माध्यमातून विनंती करत भाजपसोबत हातमिळवणी करण्याची विनंती केली.

हेही वाचा - Shinde Government Cabinet Expansion : राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे वर्ग, मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे सरकारची कसरत

हेही वाचा - Deepak Kesarkar : 'भाजपसोबतचे त्यांचे जुने नाते पुन्हा जागृत करावे'; दीपक केसरकरांचा कळकळीचा सल्ला

मुंबई - भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी काँग्रेस नेते व मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अस्लम शेख यांनी करोना काळात मढच्या समुद्रात सर्व नियमांना डावलत बांधकाम करण्यासाठी मदत केली. यातून समुद्रात मोठी मोठी बांधकामे उभी राहिली, यातून जवळपास हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्या संदर्भात आता महाराष्ट्र पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस बजावली आहे.

किरीट सोमय्या यांचा अस्लम शेख यांच्यावर आरोप

सीआरझेड नियमांचे उल्लंघन - काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री असलम शेख यांनी मुंबईत, मालाड, मढ येथे अनधिकृत पणे स्टुडिओ घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी सर्व सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून पाच स्टुडिओ समुद्रात उभारण्यात आले होते. हा घोटाळा एकंदरीत एक हजार कोटींचा असल्याचा आरोप ही सोमय्या यांनी केला होता. २०१९ मध्ये जेव्हा युतीचे सरकार होतं, त्यादरम्यान त्या ठिकाणी काहीही बांधकाम नव्हतं. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मँग्रोजची कत्तल करून स्टुडिओ उभारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. आता या प्रकरणी याची दखल घेत महाराष्ट्र पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस बजावली आहे.

काय म्हणाले किरीट सोमय्या - पर्यावरण विभागाने अस्लम शेख यांना नोटीस पाठवल्यानंतर या विषयावर बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास हजार कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली आहेत, हा एक हजार कोटींचा घोटाळा अस्लम शेख व त्यांच्या मित्र परिवाराने केला आहे. या संदर्भामध्ये आता पर्यावरण विभागाने मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई महापालिकेला यावर ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

अस्लम शेख यांनी घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट - किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर या प्रकरणी आरोप केल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर ईडीचा ससेमिरा अस्लम शेख यांच्या मागे लागणार की काय ? यासाठी ते भाजपात प्रवेश करणार की काय ? अशा चर्चाही रंगू लागली होती.

पहिल्यांदा काँग्रेसचा मंत्री निशाण्यावर - किरीट सोमय्यांनी आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले त्यांचावर ईडी, सीबीआय्, अशा चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिले आहे. यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. मात्र काँग्रेसच्या कोणत्यांही नेत्यामागे चौकशी लागली नव्हती, आता मात्र शिवसेनेतील फुटीनंतर भाजपचे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडीतील अनेक नेते अडचणीत आले. अनेकांच्या पाठिमागे चौकशीचा ससेमिरा लागला. अखेर ईडी चौकशीच्या ससेमिराला कंटाळून काही शिवसेना नेत्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना पत्र लिहून किंवा इतर माध्यमातून विनंती करत भाजपसोबत हातमिळवणी करण्याची विनंती केली.

हेही वाचा - Shinde Government Cabinet Expansion : राज्यात मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे वर्ग, मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे सरकारची कसरत

हेही वाचा - Deepak Kesarkar : 'भाजपसोबतचे त्यांचे जुने नाते पुन्हा जागृत करावे'; दीपक केसरकरांचा कळकळीचा सल्ला

Last Updated : Aug 6, 2022, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.