मुंबई- राज्य सरकारनं ईद ए मिलादची सुट्टी शुक्रवारी जाहीर केली आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शुक्रवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता यावे, यासाठी २९ तारखेला सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.
विसर्जन मिरवणुकीतही शिस्त पाळावी- राज्याच्या विविध भागात अनंत चतुर्दशीनिमित्त मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. तसेच मुस्लीम बांधवांकडून ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी रस्त्यांवर गर्दी होणार असल्यानं पोलिसांची दमछाक होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणांवर ताण टाळण्याकरिता २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणरायाला आपण सर्वजण अनंत चतुर्दशीनिला मनोभावे निरोप देणार आहोत. नेहमीप्रमाणे विसर्जन मिरवणुकीतही शिस्त पाळावी. शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावं, असे मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना आवाहन केले आहे.
-
ईद - ए - मिलाद च्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य सरकारने ईद - ए - मिलाद निमित्त शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ईद - ए - मिलाद च्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य सरकारने ईद - ए - मिलाद निमित्त शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 27, 2023ईद - ए - मिलाद च्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य सरकारने ईद - ए - मिलाद निमित्त शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 27, 2023
गेले दहा दिवस श्री गणेशाच्या आगमनाने मांगल्याचे वातावरण निर्माण झाले. येणाऱ्या काळातही ईद तसेच नवरात्री, दसरा –दिवाळीसारखे सण आहेत. सर्वांनी एकोप्याने आणि भक्तिभावाने हे सण पार पाडावे आणि राज्याची परंपरा अधिक उज्वल करावी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
१ ऑक्टोबरला आपली गावे कचरामुक्त करू- गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहील, याची काळजी घेतली. तसेच एकूणच गणेश मंडळांनीदेखील नियमांचे पालन करून सर्वांचा हा आवडता उत्सव आनंदाने पार पाडला, त्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. उत्सव साजरा करताना आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व डोळ्याआड करता येणार नाही. स्वच्छ महाराष्ट्राची मोहीम आपण हाती घेतली आहे. १ ऑक्टोबरला आपण आपली गावे आणि वॉर्ड कचरामुक्त करणार आहोत. गणेश मंडळांनीदेखील विसर्जन आणि त्यानंतर आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रशासनाला मदत करावी. चांगला संदेश द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.
ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा- ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा, अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
हेही वाचा-