ETV Bharat / state

कोकणातील तीन जिल्ह्यांचा' इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकास करा - शरद पवार

author img

By

Published : Jan 7, 2021, 5:31 PM IST

कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकास करा, अशी सूचना खासदार शरदपवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली.

शरद पवार
शरद पवार

मुंबई - कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर नाविन्यपूर्ण संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (दि. 7 जाने.) केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून शरद पवार साहेबांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास बैठकीत दिला.

सह्याद्री अतिथीगृहात झाली बैठक

कोकण विभागास आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन विभाग म्हणून विकसित करण्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज (गुरुवार) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटीव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

पुढील शंभर वर्षांचा विचार करत निर्णय घेतला पाहिजे

नेते शरद पवार यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था या ठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोहोचविता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील पन्नास–शंभर वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.

हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तिनही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पर्यावरणाचा ऱ्हास न करता कोकणचा विकास या माध्यमातून साधला जाणार आहे तसेच हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

प्रकल्पाचा विकास होण्यासाठी राजकीय बंधन अन् दबाव नसावा

पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे म्हणाले की, ‘इनोव्हेशन’ क्षेत्राचा विकास होण्यासाठी हे राजकीय बंधन आणि दबावापासून मुक्त असले पाहजे. त्यासाठी राज्याचे धोरण आवश्यक असल्याचेही अदित्य ठाकरे यांनी सांगितले.

‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भातील मुद्दे

  • इनोव्हेटीव्ह रिजन अंतर्गत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश
  • कोकणात गुणवत्ता असल्याने विकासाची अमर्याद संधी
  • कोकणातील साधनसंपत्तीचा उपयोग करुन पर्यावरणपुरक उद्योगांचा विकास
  • पर्यावरण व आर्थिक क्षेत्राचा एकत्रित शाश्वत विकास
  • उद्योग, विद्यापीठ व संशोधन केंद्रांच्या सहभागातून ज्ञानाधारित समाजाची निर्मिती
  • नागरिकांच्या जीवनपद्धतीत व आनंद निर्देशांकात वाढीचे ध्येय

हेही वाचा - नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

हेही वाचा - सोनू सूदविरोधात पोलिसात तक्रार; रहिवासी इमारतीला हॉटेल बनवल्याचा आरोप

मुंबई - कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर नाविन्यपूर्ण संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (दि. 7 जाने.) केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून शरद पवार साहेबांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास बैठकीत दिला.

सह्याद्री अतिथीगृहात झाली बैठक

कोकण विभागास आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन विभाग म्हणून विकसित करण्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज (गुरुवार) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटीव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

पुढील शंभर वर्षांचा विचार करत निर्णय घेतला पाहिजे

नेते शरद पवार यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था या ठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोहोचविता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील पन्नास–शंभर वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.

हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तिनही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पर्यावरणाचा ऱ्हास न करता कोकणचा विकास या माध्यमातून साधला जाणार आहे तसेच हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

प्रकल्पाचा विकास होण्यासाठी राजकीय बंधन अन् दबाव नसावा

पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे म्हणाले की, ‘इनोव्हेशन’ क्षेत्राचा विकास होण्यासाठी हे राजकीय बंधन आणि दबावापासून मुक्त असले पाहजे. त्यासाठी राज्याचे धोरण आवश्यक असल्याचेही अदित्य ठाकरे यांनी सांगितले.

‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भातील मुद्दे

  • इनोव्हेटीव्ह रिजन अंतर्गत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश
  • कोकणात गुणवत्ता असल्याने विकासाची अमर्याद संधी
  • कोकणातील साधनसंपत्तीचा उपयोग करुन पर्यावरणपुरक उद्योगांचा विकास
  • पर्यावरण व आर्थिक क्षेत्राचा एकत्रित शाश्वत विकास
  • उद्योग, विद्यापीठ व संशोधन केंद्रांच्या सहभागातून ज्ञानाधारित समाजाची निर्मिती
  • नागरिकांच्या जीवनपद्धतीत व आनंद निर्देशांकात वाढीचे ध्येय

हेही वाचा - नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

हेही वाचा - सोनू सूदविरोधात पोलिसात तक्रार; रहिवासी इमारतीला हॉटेल बनवल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.