ETV Bharat / state

Human Organ Transplantation : अवयवदान करतानाचा गैरप्रकार रोखले जाणार

author img

By

Published : Jan 28, 2023, 7:46 PM IST

Updated : Feb 2, 2023, 6:12 PM IST

मानवी अवयवांच्या प्रत्यारोपणात गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय समिती नेमण्यात आली आहे. विभागीय अवयवदान प्राधिकरण समितीवर आता पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अवयवदान करताना संबंधित व्यक्तीची माहिती तसेच फसवणूक रोखण्यासाठी मदत होणार आहे.

organ donation
अवयवदान
अवयवदान करतानाचा गैरप्रकार रोखले जाणार

मुंबई : मानवी अवयव प्रत्यारोपण करताना बऱ्याचवेळा लाखोंचे व्यवहार होतात. बोगस दाते समोर आणले जातात अशी नेहमी चर्चा ऐकायला येते. यामुळे अवयवदान करताना संबंधित व्यक्तीची माहिती मिळावी, तसेच फसवणुक टाळण्यासाठी विभागवार समिती नेमण्यात आली आहे. अवयवदानात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विभागीय अवयव प्रत्यार्पण प्राधिकारण समितीवर पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी समिती : राज्यात अवैध अवयवदान होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून कायदा करण्यात आला होता. त्याअनुषंगाने १९९४ मध्ये शासन निर्णय काढण्यात आला आहे. २०१८ पासून याची अंमलबजावणी केली जात आहे. अवयवदान करताना गैरप्रकार होऊ नये, यासाठी सरकारने शासन स्तरावर विभागीय समिती स्थापन केली आहे. या समितीकडे अवयवदान करणारे आणि अवयव घेणारे यांच्यात काही पैशांचा व्यवहार झाला आहे का? हे तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच दात्यांचे कागदपत्रे तपासण्याची, त्यानंतर अवयवदानाला परवानगी देण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. या समितीवर सर्व सदस्य डॉक्टरांची नियुक्ती असल्यांने समितीला खरे खोटेपणा तपासण्यात अडचण निर्माण झाली होती.

समितीवर पोलिसांची नियुक्ती : अवयवदान करताना आलेला व्यक्तीची पडताळणी करताना त्या व्यक्तीने सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत का? हे तपासणे डॉक्टरांना शक्य नसते. आता दाते तसेच अवयव प्राप्त करणारी व्यक्तींची ऑन कॅमेरा चौकशी करण्यात येणार आहे. यावेळी समोरील व्यक्तीचे हावभाव आणि तो सांगत असलेली माहिती यातील सत्यता पडताळने पोलिसांच्या मदतीने शक्य होणार आहे. समितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. दक्षिण मुंबईतील विभागीय अवयव प्रत्यार्पन प्राधिकारण समितीवर आता सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर तुषार पालवे यांनी दिली आहे.

इतके झाले अवयवदान : राज्यात १९९७ ते २०२२ या कालावधीत ९८५ किडनी, ४५६ लिव्हर, ३ किडनी आणि लिव्हर, १८१ हृदय, ३९ फुफ्फुस, ५ हृदय आणि फुफ्फुस, ५ किडनी आणि स्वादुपिंड, ३ लहान आतडी, ११ जणांना प्रत्यारोपन केल्याची माहिती विभागीय अवयवदान केंद्र मुंबई यांच्याकडून देण्यात आली आहे.

कोणाला अवयवदान करता येते : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मेंदु मृत झाल्यास त्याचे अवयवदान करता येऊ शकते. एखाद्या गरजू व्यक्तीला जगण्यासाठी अवयवांची गरज असते त्याला दुसऱ्या व्यक्तीचे अवयव दिले जातात. याला अवयवदान असे म्हणतात. १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकतो.

हेही वाचा - Prakash Ambedkar On ED CBI : ईडी सीबीआयच्या भीतीने 7 लाख 65 हजार व्यावसायिकांनी सोडला देश - प्रकश आंबेडकर

अवयवदान करतानाचा गैरप्रकार रोखले जाणार

मुंबई : मानवी अवयव प्रत्यारोपण करताना बऱ्याचवेळा लाखोंचे व्यवहार होतात. बोगस दाते समोर आणले जातात अशी नेहमी चर्चा ऐकायला येते. यामुळे अवयवदान करताना संबंधित व्यक्तीची माहिती मिळावी, तसेच फसवणुक टाळण्यासाठी विभागवार समिती नेमण्यात आली आहे. अवयवदानात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विभागीय अवयव प्रत्यार्पण प्राधिकारण समितीवर पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी समिती : राज्यात अवैध अवयवदान होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून कायदा करण्यात आला होता. त्याअनुषंगाने १९९४ मध्ये शासन निर्णय काढण्यात आला आहे. २०१८ पासून याची अंमलबजावणी केली जात आहे. अवयवदान करताना गैरप्रकार होऊ नये, यासाठी सरकारने शासन स्तरावर विभागीय समिती स्थापन केली आहे. या समितीकडे अवयवदान करणारे आणि अवयव घेणारे यांच्यात काही पैशांचा व्यवहार झाला आहे का? हे तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच दात्यांचे कागदपत्रे तपासण्याची, त्यानंतर अवयवदानाला परवानगी देण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे. या समितीवर सर्व सदस्य डॉक्टरांची नियुक्ती असल्यांने समितीला खरे खोटेपणा तपासण्यात अडचण निर्माण झाली होती.

समितीवर पोलिसांची नियुक्ती : अवयवदान करताना आलेला व्यक्तीची पडताळणी करताना त्या व्यक्तीने सादर केलेली कागदपत्रे खरी आहेत का? हे तपासणे डॉक्टरांना शक्य नसते. आता दाते तसेच अवयव प्राप्त करणारी व्यक्तींची ऑन कॅमेरा चौकशी करण्यात येणार आहे. यावेळी समोरील व्यक्तीचे हावभाव आणि तो सांगत असलेली माहिती यातील सत्यता पडताळने पोलिसांच्या मदतीने शक्य होणार आहे. समितीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. दक्षिण मुंबईतील विभागीय अवयव प्रत्यार्पन प्राधिकारण समितीवर आता सहाय्यक पोलीस निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉक्टर तुषार पालवे यांनी दिली आहे.

इतके झाले अवयवदान : राज्यात १९९७ ते २०२२ या कालावधीत ९८५ किडनी, ४५६ लिव्हर, ३ किडनी आणि लिव्हर, १८१ हृदय, ३९ फुफ्फुस, ५ हृदय आणि फुफ्फुस, ५ किडनी आणि स्वादुपिंड, ३ लहान आतडी, ११ जणांना प्रत्यारोपन केल्याची माहिती विभागीय अवयवदान केंद्र मुंबई यांच्याकडून देण्यात आली आहे.

कोणाला अवयवदान करता येते : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मेंदु मृत झाल्यास त्याचे अवयवदान करता येऊ शकते. एखाद्या गरजू व्यक्तीला जगण्यासाठी अवयवांची गरज असते त्याला दुसऱ्या व्यक्तीचे अवयव दिले जातात. याला अवयवदान असे म्हणतात. १८ वर्षावरील कोणीही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकतो.

हेही वाचा - Prakash Ambedkar On ED CBI : ईडी सीबीआयच्या भीतीने 7 लाख 65 हजार व्यावसायिकांनी सोडला देश - प्रकश आंबेडकर

Last Updated : Feb 2, 2023, 6:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.