ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : जय जवान गोविंदा पथकाचा दहीहंडी साजरा न करण्याचा निर्णय

author img

By

Published : Jun 24, 2020, 6:24 PM IST

पथकातील गोविंदा व त्यांच्या परिवाराच्या सुरक्षिततेला प्राधान्य आहे. यंदा सण साजरा करता येणार नाही, याचे दुःख आहे. मात्र, सामाजिक भान जपणे तितकेच गरजेचे आहे. यंदा आम्ही कोरोनात गरजूंना मदत करून सामाजिक जबाबदारी पार पडत असल्याचे जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले.

mumbai latest news  mumbai corona update  corona effect on dahihandi celebration  dahihandi celebration 2020  gopalkala 2020  मुंबई लेटेस्ट न्यूज  दहीहंडी उत्सव २०२०  दहीहंडी उत्सवावर कोरोनाचा परिणाम  गोपाळकाला २०२०
जय जवान गोविंदा पथकाचा दहीहंडी साजरा न करण्याचा निर्णय

मुंबई - तब्बल नऊ थर लावल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या जोगेश्वरीच्या जय गोविंदा पथकाने यंदा दहीहंडी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटात सर्वांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने गोपाळकाला साजरा केला जाईल. मात्र, एकही गोविंदा बाहेर पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले.

जय जवान गोविंदा पथकाचा दहीहंडी साजरा न करण्याचा निर्णय

पथकातील गोविंदा व त्यांच्या परिवाराच्या सुरक्षिततेला प्राधान्य आहे. यंदा सण साजरा करता येणार नाही, याचे दुःख आहे. मात्र, सामाजिक भान जपणे तितकेच गरजेचे आहे. यंदा आम्ही कोरोनात गरजूंना मदत करून सामाजिक जबाबदारी पार पडत असल्याचे जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले. माहीम, वडाळा, दादर परिसरातील शिवसेना पुरस्कृत दहीहंडी देखील रद्द करण्यात आल्याचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून सांगण्यात आले.

अंध गोविंदा पथकाचा दहीकाला उत्सव रद्द -

महाराष्ट्रातील पहिले दृष्टिहीन मुलांचे आणि मुलींचे गोविंदा पथक असलेल्या नयन फाऊंडेशननेही यंदा दहीहंडी उत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. दृष्टिहीन बांधंवांचे आरोग्य ही आमची मुख्य जबाबदारी असल्यामुळे गोविंदा पथकाने दहीकाला उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थेचे संस्थापक पोन्नलगर देवेंद्र यांनी सांगितले.

मुंबई - तब्बल नऊ थर लावल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या जोगेश्वरीच्या जय गोविंदा पथकाने यंदा दहीहंडी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटात सर्वांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने गोपाळकाला साजरा केला जाईल. मात्र, एकही गोविंदा बाहेर पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले.

जय जवान गोविंदा पथकाचा दहीहंडी साजरा न करण्याचा निर्णय

पथकातील गोविंदा व त्यांच्या परिवाराच्या सुरक्षिततेला प्राधान्य आहे. यंदा सण साजरा करता येणार नाही, याचे दुःख आहे. मात्र, सामाजिक भान जपणे तितकेच गरजेचे आहे. यंदा आम्ही कोरोनात गरजूंना मदत करून सामाजिक जबाबदारी पार पडत असल्याचे जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितले. माहीम, वडाळा, दादर परिसरातील शिवसेना पुरस्कृत दहीहंडी देखील रद्द करण्यात आल्याचे शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून सांगण्यात आले.

अंध गोविंदा पथकाचा दहीकाला उत्सव रद्द -

महाराष्ट्रातील पहिले दृष्टिहीन मुलांचे आणि मुलींचे गोविंदा पथक असलेल्या नयन फाऊंडेशननेही यंदा दहीहंडी उत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. दृष्टिहीन बांधंवांचे आरोग्य ही आमची मुख्य जबाबदारी असल्यामुळे गोविंदा पथकाने दहीकाला उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे संस्थेचे संस्थापक पोन्नलगर देवेंद्र यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.