ETV Bharat / state

...तर राज्याची कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिली असती - नाना पटोले

author img

By

Published : Apr 14, 2021, 5:31 PM IST

राज्य सरकार चांगले काम करत असताना केंद्रातून टीका केली जात आहे. लोकांच्या मृत्यूवर देखील भाजप राजकारण करत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

मुंबई
मुंबई

मुंबई - महाराष्ट्रात वेळीच लसीचा साठा केला असता तर राज्याची कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिली असती. केंद्राकडून भेदभाव केला जात आहे. राज्य सरकार चांगले काम करत असताना केंद्रातून टीका केली जात आहे. लोकांच्या मृत्यूवर देखील भाजप राजकारण करत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या टाळेबंदीच्या निर्णयावर आणि हातावर पोट असलेल्या लोकांसाठी जाहीर केलेल्या निधीवर विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली होती. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

बोलताना नाना पटोले
ही राष्ट्रीय आपत्ती आहे. पंतप्रधान मोदी यांना नियमांचा विसर पडला आहे. विनामास्क फिरून मोदी प्रचार करत आहेत, लोकांमध्ये काय संदेश जाईल याचा विचार केला पाहिजे. बंगालच्या निवडणुकीनंतर देशात टाळेबंदी जाहीर होईल. मध्य प्रदेशचे सरकार पडले, मग टाळेबंदी केली. विरोधी पक्षाचे नेते मात्र राजकारणात दंग आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचे काम करत आहोत. तर विरोधक खुर्चीसाठी राजकारण करत आहेत. मोदी हे प्रचारजीवी आहेत, ते मास्क न घालता प्रचार करत सुटले आहेत आणि लोकांना मास्क घाला म्हणून सांगत आहेत. भाजप मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खात आहे, अशी टीका पटोले यांनी भाजपवर केली. पटोले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबई - महाराष्ट्रात वेळीच लसीचा साठा केला असता तर राज्याची कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिली असती. केंद्राकडून भेदभाव केला जात आहे. राज्य सरकार चांगले काम करत असताना केंद्रातून टीका केली जात आहे. लोकांच्या मृत्यूवर देखील भाजप राजकारण करत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या टाळेबंदीच्या निर्णयावर आणि हातावर पोट असलेल्या लोकांसाठी जाहीर केलेल्या निधीवर विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली होती. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

बोलताना नाना पटोले
ही राष्ट्रीय आपत्ती आहे. पंतप्रधान मोदी यांना नियमांचा विसर पडला आहे. विनामास्क फिरून मोदी प्रचार करत आहेत, लोकांमध्ये काय संदेश जाईल याचा विचार केला पाहिजे. बंगालच्या निवडणुकीनंतर देशात टाळेबंदी जाहीर होईल. मध्य प्रदेशचे सरकार पडले, मग टाळेबंदी केली. विरोधी पक्षाचे नेते मात्र राजकारणात दंग आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचे काम करत आहोत. तर विरोधक खुर्चीसाठी राजकारण करत आहेत. मोदी हे प्रचारजीवी आहेत, ते मास्क न घालता प्रचार करत सुटले आहेत आणि लोकांना मास्क घाला म्हणून सांगत आहेत. भाजप मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खात आहे, अशी टीका पटोले यांनी भाजपवर केली. पटोले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.