ETV Bharat / state

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसकडून #पाडा रे रॅप साँग; बंडखोरांना केले टार्गेट - Pada Ray song News

काँग्रेसला सोडून कमलाबाई म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व गद्दारांना आणि बंडखोरांना या निवडणुकीत पाडा. आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, असे संदेश देणारे गीत काँग्रेसकडून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले.

#पाडा रे रॅप साँग
author img

By

Published : Oct 20, 2019, 3:22 AM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांनी काँग्रेसला सोडून कमलाबाई म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व गद्दारांना आणि बंडखोरांना या निवडणुकीत पाडा. आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, असे संदेश देणारे गीत काँग्रेसकडून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले.

काँग्रेसच्या रॅप साँग बद्दल सांगताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

'# पाडा रे ' असे या रॅप साँगचे नाव आहे. काँग्रेस पक्ष सोडून भाजपात गेलेल्यांना जनतेने निवडणुकीत पाडावे. हे लोक स्वतःचे इमान विकून बेइमानी करणाऱ्यांच्या टोळीत जाऊन सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना पाडा, असा संदेश रॅपच्या माध्यमातून एक तरुण गात असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाण्यात जी लोक काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत त्यांचा उल्लेख भगोडे, गुलगुळे, बंडखोर, गद्दार असा करण्यात आला आहे. "आमच्यासोबत जनतेचा हात हाय, गद्दारी करणाऱ्यांना अजिबात थारा नाय, जनता यांना या वेळेस पाडल्या बिगर राहात नाय,....पाडा रे !" अशा ओळी या रॅप साँगमध्ये तरूण गाताना दिसत आहे.

तसेच "सत्तेसाठी कमळाबाईच्या कळपात सामील होणाऱ्यांना, आम्ही पाडल्या बिगर राहतोय, ...पाडा रे", "जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना पाडा रे, सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांना, सत्तेसाठी इमान विकून बेइमनाच्या टोळीत जाणाऱ्यांना पाडा रे!" असे गाण हे तरुण गात असून त्यातून मागील काही काळात काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनतेनी अद्दल घडवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा- EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांनी काँग्रेसला सोडून कमलाबाई म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व गद्दारांना आणि बंडखोरांना या निवडणुकीत पाडा. आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, असे संदेश देणारे गीत काँग्रेसकडून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आले.

काँग्रेसच्या रॅप साँग बद्दल सांगताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

'# पाडा रे ' असे या रॅप साँगचे नाव आहे. काँग्रेस पक्ष सोडून भाजपात गेलेल्यांना जनतेने निवडणुकीत पाडावे. हे लोक स्वतःचे इमान विकून बेइमानी करणाऱ्यांच्या टोळीत जाऊन सामील झाले आहेत. त्यामुळे त्यांना पाडा, असा संदेश रॅपच्या माध्यमातून एक तरुण गात असताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. गाण्यात जी लोक काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले आहेत त्यांचा उल्लेख भगोडे, गुलगुळे, बंडखोर, गद्दार असा करण्यात आला आहे. "आमच्यासोबत जनतेचा हात हाय, गद्दारी करणाऱ्यांना अजिबात थारा नाय, जनता यांना या वेळेस पाडल्या बिगर राहात नाय,....पाडा रे !" अशा ओळी या रॅप साँगमध्ये तरूण गाताना दिसत आहे.

तसेच "सत्तेसाठी कमळाबाईच्या कळपात सामील होणाऱ्यांना, आम्ही पाडल्या बिगर राहतोय, ...पाडा रे", "जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना पाडा रे, सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांना, सत्तेसाठी इमान विकून बेइमनाच्या टोळीत जाणाऱ्यांना पाडा रे!" असे गाण हे तरुण गात असून त्यातून मागील काही काळात काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनतेनी अद्दल घडवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा- EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी  काँग्रेसचा #पाडा रे रॅप सोंग;
कमळाबाईच्या टोळीत सामील होणाऱ्यांना पाडा रे चा संदेश

(यासाठी मोजोवर फीड हे सचिन सावंत यांच्या बातमीसोबत पाठवले आहे, ते वापरावे)
मुंबई, ता. 19 :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या लोकांनी काँग्रेसला सोडून कमलाबाई म्हणजेच भासत मध्ये अशा सर्व गद्दारांना आणि बंडखोरांना या निवडणुकीत पाडा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा असा संदेश देणारा काँग्रेसकडून आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

'# पाडा रे '  असे  या रॅप सोंगचे नाव असून याच नावाने  काँग्रेसने आपल्याकडून जे भाजपात जाऊन सामील झालेले आहेत, त्यांना जनतेने या निवडणुकीत पाडावे, हे लोक स्वतःचे इमान विकून बेईमानी करणाऱ्यांच्या टोळीत जाऊन सामील झाले आहेत, त्यामुळे त्यांना पाडा असा संदेश यात तरुण रॅप सोंग गात देताना दिसत आहेत.
यामध्ये, काँग्रेसमधून भाजपात गेलेले आहेत त्यांचा उल्लेख हा भगोडे, गुलगुळे, बंडखोर, गद्दार असा करण्यात आला आहे.
"आमच्यासोबत साथ जनतेचा हात हाय, गद्दारी करणाऱ्यांना अजिबात थारा नाय, जनता यांना यावेळेस पाडल्या बिगर राहत नाय,....पाडा रे !"
अशा ओळी या रॅप सोंग मध्ये तरूण गात आहेत. तसेच "सत्तेसाठी कमळाबाईच्या कळपात सामील होणाऱ्याना, आम्ही पाडल्या बिगर राहतोय, ...पाडा रे", "जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना पाडा रे, सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांना,सत्तेसाठी इमान विकून बेईमनाच्या टोळीत जाणाऱ्यांना पाडा रे!" असे गाणे हे तरुण गात असून त्यातून मागील काही काळात काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना जनतेनी अद्दल घडवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.