ETV Bharat / state

मुख्यमंत्री पदाबाबत भाजप-सेनेचे गुऱ्हाळ सुरूच, नेत्यांचेही हवेत बार

आदित्य ठाकरे गेली 10 वर्ष युवा सेनेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी निवडणूक लढवावी ही माझी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. त्यावर पक्ष श्रेष्टी योग्य निर्णय घेतील, असे वरुण सरदेसाई म्हणाले.

author img

By

Published : Jul 15, 2019, 6:40 PM IST

भाजप शिवसेना

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आमचं ठरलय' म्हणत महायुती वर शिक्कामोर्तब केले असले तरी अजूनही मुख्यमंत्री कोणाचा हे अनुत्तरित आहे. यातच शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. मात्र, युवासेनेचे नेतेही यावर अधांतरीच वक्तव्य करत आहेत.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील याची चर्चा आहे. सोमवारी युवासेनेच्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता युवासेना सरचिटणीसांनी यावर आपण काही बोलू इच्छित नाही. मुख्यमंत्री पदाबाबत आणि जागा वाटपा संबंधात भाजपचे नेते अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असे सांगितले.

आदित्य ठाकरे जिथे प्रचार करतात तिथे शिवसेनेचा विजय नक्की आहे. त्यांनी निवडणूक लढवावी अशी प्रत्येक शिवसैनिकाची आणि युवासेनेची देखील इच्छा आहे. मात्र, निवडणूक लढायची की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही फक्त इच्छा व्यक्त केली. सध्या आदित्य ठाकरे युवासेना आणि शिवसेना जनसंवाद यात्रेमार्फत जनतेशी संवाद साधणार आहेत, असे युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी सांगितले.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'आमचं ठरलय' म्हणत महायुती वर शिक्कामोर्तब केले असले तरी अजूनही मुख्यमंत्री कोणाचा हे अनुत्तरित आहे. यातच शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. मात्र, युवासेनेचे नेतेही यावर अधांतरीच वक्तव्य करत आहेत.

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील याची चर्चा आहे. सोमवारी युवासेनेच्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता युवासेना सरचिटणीसांनी यावर आपण काही बोलू इच्छित नाही. मुख्यमंत्री पदाबाबत आणि जागा वाटपा संबंधात भाजपचे नेते अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असे सांगितले.

आदित्य ठाकरे जिथे प्रचार करतात तिथे शिवसेनेचा विजय नक्की आहे. त्यांनी निवडणूक लढवावी अशी प्रत्येक शिवसैनिकाची आणि युवासेनेची देखील इच्छा आहे. मात्र, निवडणूक लढायची की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आम्ही फक्त इच्छा व्यक्त केली. सध्या आदित्य ठाकरे युवासेना आणि शिवसेना जनसंवाद यात्रेमार्फत जनतेशी संवाद साधणार आहेत, असे युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी सांगितले.

Intro:

मुख्यमंत्री पदाबाबत भाजप- सेनेचे गुऱ्हाळ सुरूच , नेत्यांचे ही हवेत बार.....



शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "आमचं ठरलय म्हणत महायुती वर शिक्कामोर्तब केले असले तरी अजूनही मुख्यमंत्री कोणाचा हे अनुत्तरित आहे. यातच शिवसेनेकडून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जातंय, मात्र युवा सेनेचे नेते ही यावर अधांतरीच वक्तव्य करत आहेत..

शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील याची चर्चा आहे. त्यावर आज युवासेनेच्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारलं असता युवा सेना सरचिटणीसानी यांवर आपण काही बोलू इच्छित नाही मुख्यमंत्री पदाबाबत आणि जागा वाटपा संबंधात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरतील असे सांगितले.

आदित्य ठाकरे जिथे प्रचार करतात तिथे शिवसेनेचा विजय नक्की आहेत. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे व युवा सेनेची देखील इच्छा आहे आदित्य साहेब यांनी निवडणूक लढवावी परंतु तो त्यांचा वयक्तिक विषय आहे. लढवायचं की नाही ते .आम्ही फक्त इच्छा व्यक्त केली आहे असे युवासेनेच्या सरचिटणीसवरून देसाई यांनी सांगितले.
आदीत्य ठाकरे गेली 10 वर्ष युवा सेनेचे नेतृत्व करत आहेत.आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी ही माझी नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. त्यावर पक्ष श्रेष्टी योग्य निर्णय घेतील. सध्या आदित्य ठाकरे युवासेना शिवसेना जन संवाद यात्रेमार्फत जनतेशी संवाद साधणार आहे .Body:.Conclusion:.बाईट मोजोवरून अपलोड केला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.