ETV Bharat / state

GST चे २२ हजार कोटी येणे बाकी, मोदींना प्रश्न विचारायची हिम्मत आहे का?; ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

author img

By

Published : Sep 9, 2020, 6:41 AM IST

संकटाच्या काळात आमचे हक्काचे जीएसटीचे २२ हजार कोटी येणे आहेत. ते आम्हाला केंद्र सरकार देत नाही. उलट कर्ज काढा म्हणत आहेत, सेवा कराची मांडणी चुकीची झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांना प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला आहे.

cm uddhav thackeray criticised to modi government in Legislative Council
GST चे २२ हजार कोटी येणे बाकी, मोदींना प्रश्न विचारायची हिम्मत आहे का?; ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

मुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय गाफील राहू नका, यापेक्षा मोठे संकट येऊ शकेल. यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. अजूनही आपल्याकडे कोरोनाची लस आली नाही. त्यामुळे उद्या मंदिर उघडा म्हणून घंटा वाजवू नका, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे चिमटे काढले. विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठीचे निवेदन केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडून कोरोनाच्या काळात मंदिर उघडा, अशी मागणी जात असल्याने त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन करताना विरोधकांची चिमटे काढले.


कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर असून आपण सर्वजण विचित्र परिस्थितीत जगत आहोत. अशा काळात हे संकट परतवून लावण्यासाठी आपण स्वयंशिस्त पाळावी, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाची घोषणा केली. हा कार्यक्रम नसून ही चळवळ जनतेची चळवळ असली पाहिजे. ही चळवळ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, गाव, पाड्यात जाऊन यासाठी ही मोहीम राबविणार असून यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल. या संकटातून मुक्त होण्यासाठी सगळ्यांनी मला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विरोधकांनी राज्यात कोरोनाच्या संदर्भात सरकारकडून हलगर्जीपणा होत असल्याचे अनेक आरोप केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, संकटाच्या काळात आमचे हक्काचे जीएसटीचे २२ हजार कोटी येणे आहेत. ते आम्हाला केंद्र सरकार देत नाही. उलट कर्ज काढा म्हणत आहेत, सेवा कराची मांडणी चुकीची झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांना प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. आज आपल्याकडे आपत्ती आणि हे जे संकट आले आहे, त्यावर आपण एक एक टप्प्याने लॉकडाऊन करत होतो. पण केंद्राने सगळे एकाच वेळी केले आणि आता सगळ्या नाड्या आवळून टाकायच्या आणि म्हणायचे आता तुम्ही सर्व करा. असे सांगत केंद्र सरकारवर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला.

अत्यंत विचित्र परिस्थितीत आपण हे आधिवेशन घेतलो, मी सर्वांचे धन्यवाद देतो. मात्र सणाच्या काळात कुठेही गर्दी, उत्सवी स्वरूप न देता ते पार पाडावीत, हे संकट फार विचित्र असल्याचे ते म्हणाले. दरेकर यांनी केलेल्या अनेक आरोपांचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले. मला आजही जुना शिवसैनिक असलेले दरेकर आठवतात. ते माझे ऐकायचे. पण आता मी त्यांच्या ९७ पत्रांचे उत्तर दिले नाही, असे ते मला सांगतात. त्यामुळे माफ करा, असे सांगत त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आणि उत्तर देण्यापेक्षा मी कार्यवाही करण्यावर भर दिला पण आता उत्तर देऊ, असेही सांगितले.

केंद्र सरकारने कोरोनाला घालवण्यासाठी घंटा आणि टाळ्या वाजवण्याचे कार्यक्रम केले होते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच घेरले. टाळ्या आणि घंटा वाजवून कोरोना गेला नाही. या काळात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी जंम्बो रुग्णालय उभे केले. आज राज्यात पाचशेच्या घरात तपासणी केंद्र आहेत. बेड, आयसीयू ऑक्सिजनची व्यवस्था आदी वाढवली. प्लाझमा थेरेपी वाढवली असल्याची माहिती त्यांनी दिली.


संकटाला मुकाबला करण्यासाठी आपल्याला आरोग्य व्यवस्था मजबूत करायची आहे. यामुळे मला सहकार्य हवे आहे. हा आजार ५५ वयाच्या वरच्या लोकांना घातक ठरत आहे. त्याच्यासाठी आपण एकत्र येऊन एक कार्यक्रम राबवू, आपण सर्व एकवटलो तर चमत्कार करू, माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमात सगळे सहभागी व्हा, असे आवाहन केले.

मुंबई - जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय गाफील राहू नका, यापेक्षा मोठे संकट येऊ शकेल. यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज आहे. अजूनही आपल्याकडे कोरोनाची लस आली नाही. त्यामुळे उद्या मंदिर उघडा म्हणून घंटा वाजवू नका, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचे चिमटे काढले. विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठीचे निवेदन केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडून कोरोनाच्या काळात मंदिर उघडा, अशी मागणी जात असल्याने त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे निवेदन करताना विरोधकांची चिमटे काढले.


कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर असून आपण सर्वजण विचित्र परिस्थितीत जगत आहोत. अशा काळात हे संकट परतवून लावण्यासाठी आपण स्वयंशिस्त पाळावी, गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमाची घोषणा केली. हा कार्यक्रम नसून ही चळवळ जनतेची चळवळ असली पाहिजे. ही चळवळ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, गाव, पाड्यात जाऊन यासाठी ही मोहीम राबविणार असून यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल. या संकटातून मुक्त होण्यासाठी सगळ्यांनी मला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विरोधकांनी राज्यात कोरोनाच्या संदर्भात सरकारकडून हलगर्जीपणा होत असल्याचे अनेक आरोप केले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, संकटाच्या काळात आमचे हक्काचे जीएसटीचे २२ हजार कोटी येणे आहेत. ते आम्हाला केंद्र सरकार देत नाही. उलट कर्ज काढा म्हणत आहेत, सेवा कराची मांडणी चुकीची झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांना प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. आज आपल्याकडे आपत्ती आणि हे जे संकट आले आहे, त्यावर आपण एक एक टप्प्याने लॉकडाऊन करत होतो. पण केंद्राने सगळे एकाच वेळी केले आणि आता सगळ्या नाड्या आवळून टाकायच्या आणि म्हणायचे आता तुम्ही सर्व करा. असे सांगत केंद्र सरकारवर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला.

अत्यंत विचित्र परिस्थितीत आपण हे आधिवेशन घेतलो, मी सर्वांचे धन्यवाद देतो. मात्र सणाच्या काळात कुठेही गर्दी, उत्सवी स्वरूप न देता ते पार पाडावीत, हे संकट फार विचित्र असल्याचे ते म्हणाले. दरेकर यांनी केलेल्या अनेक आरोपांचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले. मला आजही जुना शिवसैनिक असलेले दरेकर आठवतात. ते माझे ऐकायचे. पण आता मी त्यांच्या ९७ पत्रांचे उत्तर दिले नाही, असे ते मला सांगतात. त्यामुळे माफ करा, असे सांगत त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आणि उत्तर देण्यापेक्षा मी कार्यवाही करण्यावर भर दिला पण आता उत्तर देऊ, असेही सांगितले.

केंद्र सरकारने कोरोनाला घालवण्यासाठी घंटा आणि टाळ्या वाजवण्याचे कार्यक्रम केले होते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच घेरले. टाळ्या आणि घंटा वाजवून कोरोना गेला नाही. या काळात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी जंम्बो रुग्णालय उभे केले. आज राज्यात पाचशेच्या घरात तपासणी केंद्र आहेत. बेड, आयसीयू ऑक्सिजनची व्यवस्था आदी वाढवली. प्लाझमा थेरेपी वाढवली असल्याची माहिती त्यांनी दिली.


संकटाला मुकाबला करण्यासाठी आपल्याला आरोग्य व्यवस्था मजबूत करायची आहे. यामुळे मला सहकार्य हवे आहे. हा आजार ५५ वयाच्या वरच्या लोकांना घातक ठरत आहे. त्याच्यासाठी आपण एकत्र येऊन एक कार्यक्रम राबवू, आपण सर्व एकवटलो तर चमत्कार करू, माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमात सगळे सहभागी व्हा, असे आवाहन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.