पुणे - पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला 200 च्या पुढे जागा मिळणार आहे आणि यंदा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यंदा भाजपची सत्ता येणार -
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध वातावरण तयार झाले आहे. ममता बॅनर्जी भाजपवर चिडल्या आहे. म्हणूनच भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावर हल्ला केला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांपैकी 200 च्यावर जागा भाजप जिंकणार आहे आणि यंदा भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणार आहे, असे मत मंत्री आठवले यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - बारामतीत अजित पवारांची 'अशीही' बॅटिंग
आम्हाला 10 जागा द्याव्यात -
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर निवडणूक लढवणार आहोत. भाजपने आम्हाला पश्चिम बंगालमध्ये 10 जागा तरी द्यावा, अशी मागणी मी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे करणार आहे, असे माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, यावेळी शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.