ETV Bharat / state

सावरकरांचा द्वेष करणाऱ्यांसोबत जाणाऱ्यांनी विचार करावा; भाजपचा शिवसेनेला टोला

author img

By

Published : Nov 20, 2019, 7:06 PM IST

Updated : Nov 20, 2019, 9:40 PM IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत लावून धरली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भाजपसोबत फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे.

भाजपचे मुख्य प्रवक्ते  माधव भांडारी

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सावरकरांचा द्वेष करणे सुरूच ठेवला आहे. त्यांच्या सोबत जाणाऱ्यांनी त्यांच्या या भूमिकेचा विचार करावा, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेला लगावला आहे. काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी वि. दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याला विरोध केला आहे, यावर भांडारी यांनी प्रतिक्रिया दिली.

सावरकरांचा द्वेष करणाऱ्यांसोबत जाणाऱ्यांनी विचार करावा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत लावून धरली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भाजपसोबत फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची धर्मनिरपेक्ष विचारधारा असून शिवसेना हिंदुत्ववादी विचारसरणीची आहे. या दरम्यानच स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा - संपूर्ण देशात लागू करणार 'एनआरसी' : अमित शाह


काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकरांचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून सावरकरांचा धडा ही वगळला आहे. त्यामुळे सावरकरांच्या कार्याबद्दल शंका घेणाऱ्यांचा विचार सावरकरांवर प्रेम करणाऱ्यांनी करावा, असे भांडारी म्हणाले. केंद्र सरकारने भारतरत्न देण्यासाठी कोणाच्या शिफारसींची गरज नसल्याचे जाहीर केल्याने सावरकरांना भारतरत्न देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे भांडारी यांनी सांगितले .

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सावरकरांचा द्वेष करणे सुरूच ठेवला आहे. त्यांच्या सोबत जाणाऱ्यांनी त्यांच्या या भूमिकेचा विचार करावा, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेला लगावला आहे. काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी वि. दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याला विरोध केला आहे, यावर भांडारी यांनी प्रतिक्रिया दिली.

सावरकरांचा द्वेष करणाऱ्यांसोबत जाणाऱ्यांनी विचार करावा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत लावून धरली होती. मात्र, विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भाजपसोबत फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची धर्मनिरपेक्ष विचारधारा असून शिवसेना हिंदुत्ववादी विचारसरणीची आहे. या दरम्यानच स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा - संपूर्ण देशात लागू करणार 'एनआरसी' : अमित शाह


काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकरांचा महात्मा गांधींच्या हत्येत सहभाग होता, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून सावरकरांचा धडा ही वगळला आहे. त्यामुळे सावरकरांच्या कार्याबद्दल शंका घेणाऱ्यांचा विचार सावरकरांवर प्रेम करणाऱ्यांनी करावा, असे भांडारी म्हणाले. केंद्र सरकारने भारतरत्न देण्यासाठी कोणाच्या शिफारसींची गरज नसल्याचे जाहीर केल्याने सावरकरांना भारतरत्न देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे भांडारी यांनी सांगितले .

Intro:सावरकरांचा विद्वेष करणाऱ्या काँग्रेस -राष्ट्रवादीच्या भूमिकेचा ,
सोबत जाणाऱ्यांनी विचार करावा , भाजपचा शिवसेनेला टोला .

मुंबई

राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सावरकरांचा विद्वेष सुरूच ठेवला असून त्यांच्या सोबत जाणाऱ्यांनी या भूमिकेचा विचार करावा , असा टोला भाजपने शिवसेनेला लगावला आहे . काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी वि .दा .सावरकर यांना भारतरत्न देण्याला विरोध केला आहे . यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली आहे . भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते .
एकीकडे स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत लावून धरली होती .तसेच हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा केला होता . मात्र आता राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत घरोबा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे . राष्ट्रवादी आणि काँग्रेसची धर्मनिरपेक्ष विचारधारा असून शिवसेना हिंदुत्ववादी विचारसरणीची असल्याने किमान सामान कार्यक्रमाच्या धारेवर राज्यात महाशिवगडाई उभारण्याचा प्रयत्न सुरु आहे . मात्र या दरम्यानच स्वातंत्रवीर सावरकर यांच्या भारतरत्न देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे .
या दरम्यान काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याला विरोध करतानाच सावरकर यांचा महात्मा गांधी यांच्या हत्येत सहभाग होता असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे . यावर भाजपचे प्रवक्ते भांडारी यांनी म्हटले की , काँग्रेस सावरकरांचा विद्वेष करत आहेच पण राजस्थानच्या काँग्रेस सरकारने शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकातून सावरकर यांचा धडा ही वगळला आहे . त्यामुळे सावरकरांवर त्यांच्या कार्याबद्दल शंका घेणाऱ्यांचा विचार सावरकरांवर प्रेम करणार्यांनी करावा असा टोला त्यांनी शिवसेनाला लगावला आहे . त्याचबरोबर केंद्र सरकारने भारतरत्न देण्याबाबत कोणाच्या शिफारसींची गरज नसल्याचे जाहीर केल्याने सावरकरांनाभारतरत्न देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे भांडारी यांनी सांगितले . Body:माधव भांडारी यांचा byte live 3G वरून पाठवला आहे. Conclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.