ETV Bharat / state

विनय तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करा, भाजपचे आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन

author img

By

Published : Aug 3, 2020, 7:06 PM IST

सिनेकलावंत सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास आलेल्या बिहार पोलीस दलातील अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिवारी यांच्या तपासात अनेकांची नावे समोर येऊ शकतील म्हणून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या केसचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी पालिकेने तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करावे, या मागणीसाठी आज भाजपने गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

bjp demanded Cancel the quarantine of Bihar IPS officer Vinay Tiwari in mumbai
विनय तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करा, भाजपचे आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई - सिनेकलावंत सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास आलेल्या बिहार पोलीस दलातील अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिवारी यांच्या तपासात अनेकांची नावे समोर येऊ शकतील म्हणून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या केसचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी पालिकेने तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करावे, या मागणीसाठी आज भाजपने गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासासाठी बिहार पोलीस मुंबईत आले आहेत. काल आयपीएस अधिकारी असलेले विनय तिवारी हे मुंबईत आले असता त्यांना पालिकेने क्वारंटाईन केले आहे. याचा जाब विचारण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी पालिका आयुक्त कार्यालयात नसल्याने तसेच भाजपचे निवेदन घेण्यास कोणताही वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याने पालिका आयुक्त कार्यालयाच्या बाहेर नगरसेवकांनी निवेदन चिकटवून निषेध केला.

bjp demanded Cancel the quarantine of Bihar IPS officer Vinay Tiwari in mumbai
विनय तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करा, भाजपचे आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन
आम्ही पालिका आयुक्तांचा वेळ मागितला होता. मात्र, आयुक्त मंत्रालयात मिटिंग असल्याचे कारण देऊन पळून गेल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. सुशांत सिंह प्रकरणात तपास करणारे अधिकारी विनय तिवारी हे रविवारी सायंकाळी 4 वाजता मुंबईत आले. त्यांना रात्री 11 वाजता क्वारंटाईन करण्यात आले. ते कोणाच्या आदेशाने करण्यात आले असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या 25 जूनच्या नियमाप्रमाणे 7 दिवसांहून कमी कालावधीसाठी राज्यात आल्यास त्यांना क्वारंटाईन करू नये, असे म्हटले आहे. त्यानंतरही विनय तिवारी यांना क्वारंटाईन केले गेले. हे बेकायदेशीर असल्याने त्यांचे क्वारंटाईन त्वरित रद्द करावे, अशी मागणी शिंदे यांनी केली. विनय तिवारी यांच्या तपासात मोठी नावे बाहेर येतील म्हणून, त्यांच्या तपासात आडकाठी आणली जात असून त्यात पालिका आयुक्तही सामील असल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.

मुंबई - सिनेकलावंत सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास आलेल्या बिहार पोलीस दलातील अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिवारी यांच्या तपासात अनेकांची नावे समोर येऊ शकतील म्हणून, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या केसचा तपास योग्य दिशेने होण्यासाठी पालिकेने तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करावे, या मागणीसाठी आज भाजपने गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासासाठी बिहार पोलीस मुंबईत आले आहेत. काल आयपीएस अधिकारी असलेले विनय तिवारी हे मुंबईत आले असता त्यांना पालिकेने क्वारंटाईन केले आहे. याचा जाब विचारण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी गटनेते प्रभाकर शिंदे व पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी पालिका आयुक्त कार्यालयात नसल्याने तसेच भाजपचे निवेदन घेण्यास कोणताही वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याने पालिका आयुक्त कार्यालयाच्या बाहेर नगरसेवकांनी निवेदन चिकटवून निषेध केला.

bjp demanded Cancel the quarantine of Bihar IPS officer Vinay Tiwari in mumbai
विनय तिवारी यांचे क्वारंटाईन रद्द करा, भाजपचे आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन
आम्ही पालिका आयुक्तांचा वेळ मागितला होता. मात्र, आयुक्त मंत्रालयात मिटिंग असल्याचे कारण देऊन पळून गेल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. सुशांत सिंह प्रकरणात तपास करणारे अधिकारी विनय तिवारी हे रविवारी सायंकाळी 4 वाजता मुंबईत आले. त्यांना रात्री 11 वाजता क्वारंटाईन करण्यात आले. ते कोणाच्या आदेशाने करण्यात आले असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारच्या 25 जूनच्या नियमाप्रमाणे 7 दिवसांहून कमी कालावधीसाठी राज्यात आल्यास त्यांना क्वारंटाईन करू नये, असे म्हटले आहे. त्यानंतरही विनय तिवारी यांना क्वारंटाईन केले गेले. हे बेकायदेशीर असल्याने त्यांचे क्वारंटाईन त्वरित रद्द करावे, अशी मागणी शिंदे यांनी केली. विनय तिवारी यांच्या तपासात मोठी नावे बाहेर येतील म्हणून, त्यांच्या तपासात आडकाठी आणली जात असून त्यात पालिका आयुक्तही सामील असल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.