ETV Bharat / state

'भाजप सरकार हे शेतकरीविरोधी, त्यांना फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता'

author img

By

Published : Sep 14, 2019, 4:07 PM IST

इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भाजपचा दुतोंडीपणा असल्याचे वक्तव्य काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले.

बाळासाहेब थोरात

मुंबई - इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भाजपचा दुतोंडीपणा असल्याचे वक्तव्य काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले? असा सवालही थोरात यांनी केला आहे.

भाजपला शेतकऱ्यांची काही चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता असल्याचे थोरात म्हणाले. एमएमटीसीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदा काढली आहे.

मुंबई - इतरवेळी पाकिस्तानला शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे पाकिस्तानचा कांदा आयात करायचा हा भाजपचा दुतोंडीपणा असल्याचे वक्तव्य काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता जास्त असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखालील एमएमटीसीने (मेटल्स अँड मिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन) पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढली आहे. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले? असा सवालही थोरात यांनी केला आहे.

भाजपला शेतकऱ्यांची काही चिंता नाही. हे सरकार शेतकरीविरोधी असून भाजपला फक्त व्यापाऱ्यांचीच चिंता असल्याचे थोरात म्हणाले. एमएमटीसीने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान, इजिप्त आणि अफगाणिस्तान या देशातून दोन हजार टन कांद्याची आयात करण्यासाठी ६ सप्टेंबर रोजी निविदा काढली आहे.

Intro:ड्रग्ज विक्रेत्यांचे हात पाय तोडू जितेंद्र आव्हाड उदयन राजेंच्या चुकिना कशाला पाठीशी घालता आव्हाडांचा शरद पवारांना सवालBody: जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदयन राजेंच्या बालिश चुकांना पाठीशी घालून, त्यांच्यासाठी जवळच्या लोकांना नाराज करून पवार साहेब तुम्हाला काय मिळाले असा सवाल त्यांनी शरद पवार यांना केलाय. तर दुसरीकडे पाकिस्तान मधून कांदा आयात केला तर दुकांना आग लावु व्यापाऱ्यांनी पाकिस्तानचा कांदा दुकानांमध्ये ठेऊन दाखवावा असे ते म्हणालेत. याच सोबत ड्रग्स विकणारे कोणी सापडले तर त्याचे हात पाय तोडून कायदा हातात घेऊ अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Byte जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.