ETV Bharat / state

'राजभवनाच्या अंगणात जाण्यापेक्षा भाजपने स्वतः च्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी'

author img

By

Published : May 22, 2020, 7:50 PM IST

सत्ता गेल्याने राज्यातील भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून सत्तेसाठी त्यांची तडफड होत आहे. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या, तर त्यांचे स्वागतच केले जाईल. परंतु, त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

balasaheb thorat criticized BJP  balasaheb thorat on BJP agitation  balasaheb thorat latest news  बाळासाहेब थोरातांची भाजपवर टीका  भाजपच्या आंदोलनावर बाळासाहेब थोरात  बाळासाहेब थोरात लेटेस्ट न्युज
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा खंबीरपणे सामना करत आहे. मात्र, भाजप राज्यात अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. त्यासाठी त्यांनी आज केलेल्या आंदोलनामुळे त्यांचे हसे झाले. वारंवार राजभवनाच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजप नेत्यांनी आतातरी स्वतः च्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

भाजपच्या फसलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना थोरात म्हणाले, की कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली आहे. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून सत्तेसाठी त्यांची तडफड होत आहे. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या, तर त्यांचे स्वागतच केले जाईल. परंतु, त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे, असेही थोरात म्हणाले.

'मेरा अंगण मेरा रणांगण' या आंदोलनाचा बार फुसका -

चंद्रकांतदादा पाटील यांचे खरे अंगण कोणते? पुणे की कोल्हापूर?, देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून 'मेरा अंगण मेरा रणांगण' या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही. अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पाहायला मिळाले, असेही थोरात म्हणाले.

केंद्राचा राज्यासोबत दुजाभाव -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा समाचार घेताना थोरात म्हणाले, की विविध राज्यांतील ५० लाखांहून अधिक मजुरांना रोजगार देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. केंद्राला कररुपाने सर्वाधिक उत्पन्न देऊनही महाराष्ट्राला केंद्राकडून अपेक्षित मदत दिली जात नाही. वैद्यकीय उपकरणे, पीपीई कीट, टेस्टिंग कीट, औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य मागणीच्या अवघे ३० टक्के पुरवली जात आहेत. केंद्र सरकारने जीएसटी परताव्याची रक्कम, विविध कल्याणकारी योजनांचा निधी व जीएसटी व्यतिरिक्त इतर करांच्या परताव्यापोटी रक्कम अद्याप दिली नाही. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधील २ लाख दहा हजार कोटी रुपयेच खर्च करण्यासारखे आहे, त्यातील सर्वाधिक रक्कम ही मनरेगासाठी आहे. त्यामुळे यातून कोणालाही थेट मदत मिळत नाही, असेही थोरात यांनी सांगितले.

राज्यातील स्थलांतरीत मजुरांची संख्या पाहता जास्त रेल्वेची गरज -

राज्य सरकारने आतापर्यंत ४३४ ट्रेनमधून ६ लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवले आहे, तर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून ३ लाख ६५ हजार मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. राज्यातील स्थलांतरित मजुरांची संख्या पाहता दररोज ९० रेल्वे सोडण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ४५ ते ५० गाड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

भाजपची आजची काळी कृती इतिहास कधीही विसरणार नाही -

राज्यात ६ लाख गरीब आणि स्थलांतरित बांधवाना मोफत जेवण दिले जाते. राज्यातील ८.५० कोटी नागरिकांना रेशनद्वारे धान्य पुरवठा केला जात आहे. यासाठी केंद्र सरकारकडे गहू पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पण, केंद्र सरकारने अद्याप गहू दिला नाही. फडणवीसांनी अंगणाला रणांगण बनविण्यापेक्षा पक्षातले आपण वजन खर्च करून महाराष्ट्राच्या हिस्स्याची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे थोरात म्हणाले. संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण आहे? राजकारणासाठी आयुष्य पडले आहे, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहास भाजपची आजची ही काळी कृती कधीही विसरणार नाही. कोरोनाच्या लढाईत सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्स, पोलीस दल, सफाई कामगार यांच्यासह विविध क्षेत्रातले लोक व सामाजिक संस्था जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले योगदान देत आहेत. अशा वेळी एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सत्ता मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी गरीब जनतेला मदत करावी, असे थोरात म्हणाले.

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटाचा खंबीरपणे सामना करत आहे. मात्र, भाजप राज्यात अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. त्यासाठी त्यांनी आज केलेल्या आंदोलनामुळे त्यांचे हसे झाले. वारंवार राजभवनाच्या अंगणात जाण्याची सवय लागलेल्या भाजप नेत्यांनी आतातरी स्वतः च्या अंगणात म्हणजेच मतदारसंघात जाऊन जनतेला मदत करावी, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

भाजपच्या फसलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना थोरात म्हणाले, की कोरोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली आहे. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून सत्तेसाठी त्यांची तडफड होत आहे. विरोधी पक्षाने कोरोनाच्या संकटात सरकाला काही विधायक सूचना केल्या, तर त्यांचे स्वागतच केले जाईल. परंतु, त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे, असेही थोरात म्हणाले.

'मेरा अंगण मेरा रणांगण' या आंदोलनाचा बार फुसका -

चंद्रकांतदादा पाटील यांचे खरे अंगण कोणते? पुणे की कोल्हापूर?, देवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का? त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून 'मेरा अंगण मेरा रणांगण' या आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही. अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पाहायला मिळाले, असेही थोरात म्हणाले.

केंद्राचा राज्यासोबत दुजाभाव -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचा समाचार घेताना थोरात म्हणाले, की विविध राज्यांतील ५० लाखांहून अधिक मजुरांना रोजगार देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. केंद्राला कररुपाने सर्वाधिक उत्पन्न देऊनही महाराष्ट्राला केंद्राकडून अपेक्षित मदत दिली जात नाही. वैद्यकीय उपकरणे, पीपीई कीट, टेस्टिंग कीट, औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य मागणीच्या अवघे ३० टक्के पुरवली जात आहेत. केंद्र सरकारने जीएसटी परताव्याची रक्कम, विविध कल्याणकारी योजनांचा निधी व जीएसटी व्यतिरिक्त इतर करांच्या परताव्यापोटी रक्कम अद्याप दिली नाही. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधील २ लाख दहा हजार कोटी रुपयेच खर्च करण्यासारखे आहे, त्यातील सर्वाधिक रक्कम ही मनरेगासाठी आहे. त्यामुळे यातून कोणालाही थेट मदत मिळत नाही, असेही थोरात यांनी सांगितले.

राज्यातील स्थलांतरीत मजुरांची संख्या पाहता जास्त रेल्वेची गरज -

राज्य सरकारने आतापर्यंत ४३४ ट्रेनमधून ६ लाखांहून अधिक स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पाठवले आहे, तर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून ३ लाख ६५ हजार मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. राज्यातील स्थलांतरित मजुरांची संख्या पाहता दररोज ९० रेल्वे सोडण्याची आवश्यकता आहे. मात्र, प्रत्यक्षात ४५ ते ५० गाड्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

भाजपची आजची काळी कृती इतिहास कधीही विसरणार नाही -

राज्यात ६ लाख गरीब आणि स्थलांतरित बांधवाना मोफत जेवण दिले जाते. राज्यातील ८.५० कोटी नागरिकांना रेशनद्वारे धान्य पुरवठा केला जात आहे. यासाठी केंद्र सरकारकडे गहू पुरवठा करण्याची मागणी केली आहे. पण, केंद्र सरकारने अद्याप गहू दिला नाही. फडणवीसांनी अंगणाला रणांगण बनविण्यापेक्षा पक्षातले आपण वजन खर्च करून महाराष्ट्राच्या हिस्स्याची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे थोरात म्हणाले. संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनवणे हे कुठले शहाणपण आहे? राजकारणासाठी आयुष्य पडले आहे, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे. इतिहास भाजपची आजची ही काळी कृती कधीही विसरणार नाही. कोरोनाच्या लढाईत सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्स, पोलीस दल, सफाई कामगार यांच्यासह विविध क्षेत्रातले लोक व सामाजिक संस्था जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपले योगदान देत आहेत. अशा वेळी एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सत्ता मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा भाजप नेत्यांनी गरीब जनतेला मदत करावी, असे थोरात म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.