ETV Bharat / state

आमदार फोडण्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर - बाळासाहेब थोरात

सत्ता स्थापन करण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजपकडून आमच्या पक्षातील काही आमदारांना फोडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. यासाठीची माहिती मला आमदारांकडून मिळाली असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.

author img

By

Published : Nov 7, 2019, 7:31 PM IST

बाळासाहेब थोरात

मुंबई - विधानसभेत सर्वात जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजपकडून आमच्या पक्षातील काही आमदारांना फोडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. यासाठीची माहिती मला आमदारांकडून मिळाली असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. सत्ता स्थापन करण्यासाठी हे लोक गोड बातमी देतोय, असे सांगत होते, ती बातमी काही येत नाही, पण गोड बातमी म्हणजे 'मॅटर्निटी होम' केले काय? असे महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला असल्याची टीकाही थोरात यांनी केली.

बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

यावेळी थोरात म्हणाले की, भाजपचे लोक आमच्याकडे येत असल्याचा निरोप आमच्या काही आमदारांकडून आपल्याला मिळाला आहे. हे लोक साम-दाम-दंड-भेद या सगळ्या नीतीचा वापर करत आहेत, असेही आमदार मला सांगत आहेत. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात असे घडू नये, अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या लोकांनी अशा गोष्टी केल्या. आमचे अनेक लोक फोडले आणि या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे असा प्रकार त्यांनी करू नये, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यातच सेना-भाजप हे विधानसभा निवडणूक एकत्र लढले होते. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करावी, अशी अपेक्षा असल्याचे थोरात म्हणाले.

हेही वाचा - शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत

भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांची भेट घेतली. परंतु, सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. यावर विचारले असताना थोरात म्हणाले की, आज खरे तर सत्ता स्थापन करण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यामुळे आम्हाला असे वाटत होते की, हे लोक गोड बातमी, गोड बातमी असे जे बोलत होते, ती आज आम्हाला बातमी कळेल. परंतु, ही बातमी अद्याप काय आली नाही.

हेही वाचा - मी पुन्हा येईन...'गप्प बसा', शिवसेनेची मुंबईत बॅनरबाजी

राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजप करत नाही. परंतु, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण करू नये आणि त्यासाठी जबाबदारी ही भाजपची आहे. मित्रपक्ष आपल्यासोबत का येत नाही? त्याची कारणे त्यांनी शोधली पाहिजेत आणि ती शोधून त्यांनी सत्ता स्थापन केली पाहिजे. कारण, आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, असेही थोरात म्हणाले.

मुंबई - विधानसभेत सर्वात जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजपकडून आमच्या पक्षातील काही आमदारांना फोडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. यासाठीची माहिती मला आमदारांकडून मिळाली असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला. सत्ता स्थापन करण्यासाठी हे लोक गोड बातमी देतोय, असे सांगत होते, ती बातमी काही येत नाही, पण गोड बातमी म्हणजे 'मॅटर्निटी होम' केले काय? असे महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला असल्याची टीकाही थोरात यांनी केली.

बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

यावेळी थोरात म्हणाले की, भाजपचे लोक आमच्याकडे येत असल्याचा निरोप आमच्या काही आमदारांकडून आपल्याला मिळाला आहे. हे लोक साम-दाम-दंड-भेद या सगळ्या नीतीचा वापर करत आहेत, असेही आमदार मला सांगत आहेत. मात्र, दुर्दैवाने महाराष्ट्रात असे घडू नये, अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या अगोदर भाजपच्या लोकांनी अशा गोष्टी केल्या. आमचे अनेक लोक फोडले आणि या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे असा प्रकार त्यांनी करू नये, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यातच सेना-भाजप हे विधानसभा निवडणूक एकत्र लढले होते. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करावी, अशी अपेक्षा असल्याचे थोरात म्हणाले.

हेही वाचा - शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत

भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांची भेट घेतली. परंतु, सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. यावर विचारले असताना थोरात म्हणाले की, आज खरे तर सत्ता स्थापन करण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यामुळे आम्हाला असे वाटत होते की, हे लोक गोड बातमी, गोड बातमी असे जे बोलत होते, ती आज आम्हाला बातमी कळेल. परंतु, ही बातमी अद्याप काय आली नाही.

हेही वाचा - मी पुन्हा येईन...'गप्प बसा', शिवसेनेची मुंबईत बॅनरबाजी

राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजप करत नाही. परंतु, राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण करू नये आणि त्यासाठी जबाबदारी ही भाजपची आहे. मित्रपक्ष आपल्यासोबत का येत नाही? त्याची कारणे त्यांनी शोधली पाहिजेत आणि ती शोधून त्यांनी सत्ता स्थापन केली पाहिजे. कारण, आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, असेही थोरात म्हणाले.

Intro:भाजपकडून आमदार फोडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर - बाळासाहेब थोरात


mh-mum-01-cong-balasahebthorat-121-7201153


(फीड mojo var पाठवले आहे)


मुंबई, ता. ७ :
राज्यात विधानसभेत सर्वात जास्त जागा मिळूनही सत्ता स्थापन करण्यासाठी अपयशी ठरलेल्या भाजपाकडून आमच्या पक्षातील काही आमदारांना फोडण्यासाठी साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. यासाठीची माहिती मला आमदारांकडून मिळालीे असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ' ईटीवी भारत' शी बोलताना आज केला. सत्ता स्थापन करण्यासाठी हे लोक गोड बातमी देतोय असे सांगत होते, ती बातमी काही येत नाही पण गोड बातमी म्हणजे मॅटर्निटी होम केले काय असं महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला असल्याची टीकाही थोरात यांनी केली.
थोरात म्हणाले की, भाजपाचे लोक आमच्याकडे येत असल्याचा निरोप आमच्या काही आमदारांकडून आपल्याला मिळाला आहे. हे लोक साम-दाम-दंड-भेद या सगळ्यां नीतीचा वापर करत आहेत, असेही आमदार मला सांगत आहेत. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात असे घडू नये अशी अपेक्षा आहे. निवडणुकीच्या अगोदर भाजपाच्या लोकांनी अशा गोष्टी केल्या आमचे अनेक लोक फोडले आणि या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून लोकांनी भाजपाच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे अशा पद्धतीने भाजपाने प्रकार करु नये, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यातच सेना भाजप हे विधानसभा निवडणूक एकत्र लढले होते त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून असल्याचे थोरात म्हणाले.
भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल महोदयांची यांची भेट घेतली, परंतु सत्ता स्थापनेचा दावा केला नाही, यावर विचारले असतात थोरात म्हणाले की, आज खरं तर त्यांनी सत्ता स्थापन करण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यामुळे आम्हाला असं वाटत होते की, हे लोक गोड बातमी, गोड बातमी असे जे बोलत होतेे ती आज आम्हाला बातमी कळेल. परंतु ही बातमी अद्याप काय आली नाही.
राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा भाजप करत नाही परंतु राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण करू नये आणि त्यासाठी जबाबदारी ही भाजपाची आहे मित्रपक्ष आपल्यासोबत का येत नाही,त्याची कारणे त्यांनी शोधलीे पाहिजे आणि ते शोधून त्यांनी सत्ता स्थापन केले पाहिजे कारण आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे बसणार आहोत असेही थोरात म्हणाले.


Body:mh-mum-01-cong-balasahebthorat-121-7201153
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.