ETV Bharat / state

विधानसभा रणधुमाळी : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ९० टक्के जागा वाटपाचा सुटला तिढा

author img

By

Published : Sep 3, 2019, 9:59 PM IST

राज्यात मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते आमदार, माजी आमदार हे सेना-भाजप मध्ये जात आहेत. त्यासाठी जागा वाटप आणि उमेदवार लवकर निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षाचे एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली होती. ती बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बैठकीला उपस्थित दोन्ही पक्षांचे नेते

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीतील जागावाटपाचा 90 टक्के विषय आज (मंगळवारी) मार्गी लावण्यात आला आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून याविषयीचा ठोस निर्णय घेण्यात आला. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या राज्यातल्या आणि मुंबईतल्या ९० टक्के जागा वाटपाचा तिढा सुटला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ९० टक्के जागा वाटपाचा तिढा सुटला

हेही वाचा - आखाडा विधानसभेचा : खामगाव विधानसभेसाठी होणार तिरंगी लढत; वंबआची भूमिका ठरणार परिणामकारक

राज्यात मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते आमदार, माजी आमदार हे सेना-भाजप मध्ये जात आहेत. त्यासाठी जागा वाटप आणि उमेदवार लवकर निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षाचे एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली होती. ती बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार शरद रणपिसे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार नसीम खान, राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड, संजय खोडके, प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते.

या बैठकीत दोन्ही पक्षाकडून जागा वाटपाचा विषय पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या नावाच्या याद्या आणि त्यांची माहिती यावर नेत्यांनी स्वतंत्र अशी चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाचा उमेदवार अधिक प्रभावशाली आहे, यावर दोन्ही पक्षांनी मिळून त्या त्या जागांवर देवाणघेवाण करण्यावरही एकमत झाले असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - 'वंचित-एमआयएम'चा जागा वाटपाचा तिढा कायम; हैदराबादेत आंबेडकर-ओवेसींची होणार बैठक

दरम्यान, अनेक जण सेना-भाजपमध्ये गेले असल्याने त्या ठिकाणी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना अधिक संधी देण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते तयार झाले आहेत, असेही सांगण्यात येत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत येणार नसल्याचे तूर्तास दिसत आहे. त्यामुळे इतर पर्याय म्हणून बहुजन समाज पक्ष, बीआरएसपी आदी पक्षांसोबत बोलणी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले जाणार आहे. त्यासोबत इतर जे आंबेडकरी, ओबीसी समाजाचे पक्ष आहेत, त्यांच्यासोबत बोलणी करून सोबत घेण्यासाठी विचार केला जाणार आहे. त्यामुळे आज झालेल्या या बैठकीत लवकरच आघाडी सोबत येणाऱ्या मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना देण्यात येणाऱ्या जागा वाटपाचा विषय सोडवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीतील जागावाटपाचा 90 टक्के विषय आज (मंगळवारी) मार्गी लावण्यात आला आहे. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून याविषयीचा ठोस निर्णय घेण्यात आला. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दोन्ही पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या राज्यातल्या आणि मुंबईतल्या ९० टक्के जागा वाटपाचा तिढा सुटला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ९० टक्के जागा वाटपाचा तिढा सुटला

हेही वाचा - आखाडा विधानसभेचा : खामगाव विधानसभेसाठी होणार तिरंगी लढत; वंबआची भूमिका ठरणार परिणामकारक

राज्यात मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते आमदार, माजी आमदार हे सेना-भाजप मध्ये जात आहेत. त्यासाठी जागा वाटप आणि उमेदवार लवकर निश्चित करण्यासाठी दोन्ही पक्षाचे एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले. सकाळी अकराच्या सुमारास या बैठकीला सुरुवात झाली होती. ती बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार शरद रणपिसे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार नसीम खान, राष्ट्रवादीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड, संजय खोडके, प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते.

या बैठकीत दोन्ही पक्षाकडून जागा वाटपाचा विषय पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांच्या नावाच्या याद्या आणि त्यांची माहिती यावर नेत्यांनी स्वतंत्र अशी चर्चा करण्यात आली. कोणत्या पक्षाचा उमेदवार अधिक प्रभावशाली आहे, यावर दोन्ही पक्षांनी मिळून त्या त्या जागांवर देवाणघेवाण करण्यावरही एकमत झाले असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.

हेही वाचा - 'वंचित-एमआयएम'चा जागा वाटपाचा तिढा कायम; हैदराबादेत आंबेडकर-ओवेसींची होणार बैठक

दरम्यान, अनेक जण सेना-भाजपमध्ये गेले असल्याने त्या ठिकाणी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना अधिक संधी देण्यासाठी दोन्ही पक्षाचे नेते तयार झाले आहेत, असेही सांगण्यात येत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत येणार नसल्याचे तूर्तास दिसत आहे. त्यामुळे इतर पर्याय म्हणून बहुजन समाज पक्ष, बीआरएसपी आदी पक्षांसोबत बोलणी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले जाणार आहे. त्यासोबत इतर जे आंबेडकरी, ओबीसी समाजाचे पक्ष आहेत, त्यांच्यासोबत बोलणी करून सोबत घेण्यासाठी विचार केला जाणार आहे. त्यामुळे आज झालेल्या या बैठकीत लवकरच आघाडी सोबत येणाऱ्या मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना देण्यात येणाऱ्या जागा वाटपाचा विषय सोडवला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.