ETV Bharat / state

केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावलो; मालाड दुर्घटनाग्रस्ताने सांगितला थरार..!

मालाड येथील भिंत ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी सर्वात पहिले घर अंबालाल जाधव यांचे आहे. त्यामुळे जाधव कुटुंब नशिबानेच वाचले, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.

author img

By

Published : Jul 2, 2019, 8:57 PM IST

Updated : Jul 2, 2019, 9:11 PM IST

नशीब बलवत्तर म्हणून वाचले कुटुंब - अंबालाल जाधव

मुंबई - रात्री मुसळधार पाऊस पडत होता, अचानक कसलातरी आवाज झाला आणि काही कळायच्या आत आम्ही ढिगाऱ्याखाली गाढलो गेलो. मात्र, आमचे नशीब चांगले म्हणून आमचे कुटुंबीय या दुर्घटनेतून वाचले, अशी प्रतिक्रिया दुर्घटनेतून बचावलेले अंबालाल जाधव यांनी दिली आहे.

मालाड येथील भिंत ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी सर्वात पहिले घर अंबालाल जाधव यांचे आहे. त्यामुळे जाधव कुटुंब नशिबानेच वाचले, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नशीब बलवत्तर म्हणून वाचले कुटुंब - अंबालाल जाधव

मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची सुरक्षा भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी आहेत. या जखमींना पालिकेच्या ट्रॉमा केअर, कूपर, शताब्दी, एमव्ही देसाई तसेच केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात अंबालाल जाधव यांचे संपूर्ण कुटुंब वाचल्याची चर्चा ऐकून त्याचा मागोवा घेतला असता, नवव्या मजल्यावर अंबालाल जाधव यांचा मुलगा उपचार घेत असल्याचे समजले. त्याची प्रकृती स्थिर असून रुग्णालयाकडून उपचार सुरु आहेत. दुर्घटना घडली त्यावेळी अंबालाल जाधव यांच्या कुटुंबातील 5 जण घरात होते. हे पाचही जण या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत.

या दुर्घटनेबाबत अंबालाल जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले, आम्ही झोपलो होतो, घरात पाणी शिरले म्हणून आम्ही जागे झालो. कसला तरी आवाज झाला म्हणून मुलांना घराच्या बाहेर ढकलले. काय होते आहे, हे समजण्याआधीच मी व माझे कुटुंबीय ढिगाऱ्याखाली गाढले गेलो. त्यानंतर जेव्हा आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा आम्ही रुग्णालयात होतो.

माझी बायको, मुलगा, सून आणि नात ढिगाऱ्याखालून कुठून निघाली? आम्हाला ढिगाऱ्याखालून कोणी बाहेर काढले? रुग्णालयात कोणी आणले? याची काहीही माहिती नाही. मात्र, आमचे नशीब चांगले म्हणून माझे कुटुंब या दुर्घटनेतून वाचले, असे जाधव यांनी सांगितले. या ठिकाणी सुमारे 100 झोपड्या असून 10 ते 15 घरांवर भिंत कोसळल्याचे जाधव यांनी सांगितले.

मुंबई - रात्री मुसळधार पाऊस पडत होता, अचानक कसलातरी आवाज झाला आणि काही कळायच्या आत आम्ही ढिगाऱ्याखाली गाढलो गेलो. मात्र, आमचे नशीब चांगले म्हणून आमचे कुटुंबीय या दुर्घटनेतून वाचले, अशी प्रतिक्रिया दुर्घटनेतून बचावलेले अंबालाल जाधव यांनी दिली आहे.

मालाड येथील भिंत ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी सर्वात पहिले घर अंबालाल जाधव यांचे आहे. त्यामुळे जाधव कुटुंब नशिबानेच वाचले, अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.

नशीब बलवत्तर म्हणून वाचले कुटुंब - अंबालाल जाधव

मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची सुरक्षा भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी आहेत. या जखमींना पालिकेच्या ट्रॉमा केअर, कूपर, शताब्दी, एमव्ही देसाई तसेच केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात अंबालाल जाधव यांचे संपूर्ण कुटुंब वाचल्याची चर्चा ऐकून त्याचा मागोवा घेतला असता, नवव्या मजल्यावर अंबालाल जाधव यांचा मुलगा उपचार घेत असल्याचे समजले. त्याची प्रकृती स्थिर असून रुग्णालयाकडून उपचार सुरु आहेत. दुर्घटना घडली त्यावेळी अंबालाल जाधव यांच्या कुटुंबातील 5 जण घरात होते. हे पाचही जण या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत.

या दुर्घटनेबाबत अंबालाल जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी ते म्हणाले, आम्ही झोपलो होतो, घरात पाणी शिरले म्हणून आम्ही जागे झालो. कसला तरी आवाज झाला म्हणून मुलांना घराच्या बाहेर ढकलले. काय होते आहे, हे समजण्याआधीच मी व माझे कुटुंबीय ढिगाऱ्याखाली गाढले गेलो. त्यानंतर जेव्हा आम्ही शुद्धीवर आलो तेव्हा आम्ही रुग्णालयात होतो.

माझी बायको, मुलगा, सून आणि नात ढिगाऱ्याखालून कुठून निघाली? आम्हाला ढिगाऱ्याखालून कोणी बाहेर काढले? रुग्णालयात कोणी आणले? याची काहीही माहिती नाही. मात्र, आमचे नशीब चांगले म्हणून माझे कुटुंब या दुर्घटनेतून वाचले, असे जाधव यांनी सांगितले. या ठिकाणी सुमारे 100 झोपड्या असून 10 ते 15 घरांवर भिंत कोसळल्याचे जाधव यांनी सांगितले.

Intro:मुंबई (विशेष बातमी)
रात्री मुसळधार पाऊस पडत होता. कसलातरी आवाज आला. आवाज कसला हे माहीती पडायच्या आतच आम्ही ढिगाऱ्याखाली गाढ़लो गेलो. मात्र आमचे नशीब चांगले म्हणून मी माझे कुटूंब या दुर्घटनेतून वाचले अशी प्रतिक्रिया या दुर्घटनेतून वाचलेले अंबालाल जाधव यांनी दिली आहे. मालाड येथील भिंत ज्या ठिकाणी कोसळली त्या ठिकाणी सर्वात पहिले घर अंबालाल जाधव यांचे आहे. यामुळे जाधव कुटुंब नशिबानेच वाचले अशी चर्चा ट्रामा केअर रुग्णालयात होती. Body:मध्यरात्री मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेच्या जलाशयाची सुरक्षा भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला असून ७५ जखमी झाले आहेत. या जखमींना पालिकेच्या ट्रॉमा केअर, कूपर, शताब्दी, एमव्ही देसाई तसेच केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात अंबालाल जाधव यांचे संपूर्ण कुटुंब वाचल्याची चर्चा ऐकून त्याचा मागोवा घेतला असता नवव्या मजल्यावर अंबालाल जाधव यांचा मुलगा उपचार घेत असल्याचे समजले. त्याची प्रकृती स्थिर असून रुग्णालयाकडून उपचार सुरु आहेत. दुर्घटना घडली त्यावेळी अंबालाल जाधव यांच्या कुटुंबातील पाच जण घरात होती. हे पाचही जण या दुर्घटनेतून सुखरूप बचावले आहेत.

या दुर्घटनेबाबत अंबालाल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, मध्यरात्री मोठा पाऊस पडत होता. आम्ही झोपलो होतो. घरात पाणी शिरले म्हणून आम्ही जागे झालो. कसला तरी आवाज आला म्हणून मुलांना घराच्या बाहेर ढकलले. काय होत आहे हे समजण्या आधीच मी व माझे कुटुंबीय ढिगाऱ्याखाली गाढले गेलो. जेव्हा आम्हाला समजले तेव्हा आम्ही रुग्णालयात होतो. माझी बायको, मुलगा, सुन आणि नात ढिगाऱ्याखालून कुठून निघाली कुठून निघाली आम्हाला ढिगाऱ्याखालून कोणी बाहेर काढले कोणी रुग्णालयात आणले याची काहीही माहिती नाही. मात्र आमचे नशीब चांगले म्हणून मी माझे कुटुंब या दुर्घटनेतून वाचलो असे जाधव यांनी सांगितले. या ठिकाणी सुमारे शंभर झोपड्या असून दहा ते पंधरा घरांवर भिंत कोसळल्याचे जाधव यांनी सांगितले.

बातमीसाठी रुग्णालयामधील vis आणि अंबालाल यांची बाईट एकाच व्हिडीओमध्ये आहेतConclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 9:11 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.