ETV Bharat / state

मुख्यमंत्री फडणवीस, तावडे यांच्यासह न्यायाधीश मोरे यांची सीबीआय चौकशी करा -  अॅड सदावर्ते

author img

By

Published : Jun 27, 2019, 8:17 PM IST

उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणबाबत निर्णय दिला. या निर्णयावर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी न्यायाधीश रणजित मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर संविधान पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप लावला आहे.

अॅड गुणरत्न सदावर्ते

मुंबई - उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणबाबत निर्णय दिला. या निर्णयावर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी न्यायाधीश रणजित मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर संविधान पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप लावला आहे.

अॅड गुणरत्न सदावर्ते बोलताना....

न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे हे माध्यमांसमोर येऊन सांगतात की, निकाल त्यांच्या बाजूने येणार आहे. विनोद तावडे यांना न्यायालय काय निर्णय देणार आहे, हे कसे कळले याची चौकशी होणे गरजेचे आहे. या संदर्भात न्यायाधीश मोरे, मुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे यांचे फोन कॉल तपासले जावेत अशी मागणी अॅड सदावर्ते यांनी केली आहे. तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी दिलेल्या निर्णयाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी मिळून संविधान पायदळी तुडविल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. आज मराठा आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विरोधी याचिका व समर्थनातील याचिकांवर सुनावणी झाली. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण 12 ते 13 टक्के दिले जाऊ शकते, असे म्हणत गायकवाड समितीच्या अहवलानुसार मराठा समाज हा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्याचे म्हटले आहे.

मुंबई - उच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणबाबत निर्णय दिला. या निर्णयावर याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी न्यायाधीश रणजित मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर संविधान पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप लावला आहे.

अॅड गुणरत्न सदावर्ते बोलताना....

न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे हे माध्यमांसमोर येऊन सांगतात की, निकाल त्यांच्या बाजूने येणार आहे. विनोद तावडे यांना न्यायालय काय निर्णय देणार आहे, हे कसे कळले याची चौकशी होणे गरजेचे आहे. या संदर्भात न्यायाधीश मोरे, मुख्यमंत्री फडणवीस, विनोद तावडे यांचे फोन कॉल तपासले जावेत अशी मागणी अॅड सदावर्ते यांनी केली आहे. तसेच त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी दिलेल्या निर्णयाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी मिळून संविधान पायदळी तुडविल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. आज मराठा आरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विरोधी याचिका व समर्थनातील याचिकांवर सुनावणी झाली. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण 12 ते 13 टक्के दिले जाऊ शकते, असे म्हणत गायकवाड समितीच्या अहवलानुसार मराठा समाज हा सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला असल्याचे म्हटले आहे.

Intro:मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयानंतर या संदर्भात प्रतिक्रिया देताना विरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांच्यावर आरोप करीत आजचा निर्णय हा न्यायदानाची शिस्त संपविणारा असल्याचे म्हणत थेट मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप करीत निशाणा साधला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रणजित मोरे यांनी दिलेल्या निर्णयाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. Body:या संदर्भात न्यायाधीश , मुख्यमंत्री , विनोद तावडे यांचे फोन कॉल तपासले जावेत अशी मागणी एड सदावर्ते यांनी केली आहे. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे हे माध्यमांसमोर येऊन सांगतात की निकाल त्यांच्या बाजूने येणार आहे. विनोद तावडे यांना न्यायालय काय निर्णय देणार आहे हे कसे कळले याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व न्यायमूर्ती रणजित देशमुख यांनी मिळून संविधान पायदळी तुडविल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.