ETV Bharat / state

केसरबाई इमारत दुर्घटनेला मुख्यमंत्री जबाबदार; अबू आझमी यांचा आरोप

सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत करायला पाहीजे. तसेच त्यांच्या निवासाची सोय करण्याची मागणी आझमी यांनी यावेळी केली.

author img

By

Published : Jul 16, 2019, 6:11 PM IST

डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल बोलताना अबू आझमी

मुंबई - दक्षिण मध्य मुंबईततील 19 हजार इमारती धोकादायक असल्याचे गेल्या १० वर्षांपासून ओरडून सांगत आहे. मात्र, त्याकडे यापूर्वीच्या सरकारने आणि आत्ताच्या सेना-भाजप सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामध्ये नाहक बळी जात आहेत. याला मुख्यमंत्री सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे. डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेबाबत ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.

डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल बोलताना अबू आझमी

गेल्या १० वर्षांपासून विधीमंडळ आणि बाहेर देखील धोकादायक इमारतींचा प्रश्न मांडलेला आहे. त्यांचा पुर्नविकास करणे गरजेचे आहे. मात्र, सरकारने आमची ओरड कधीच ऐकली नाही. त्यामुळे आजच्यासारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप अबू आझमी यांनी यावेळी केला.

सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत करायला पाहीजे. तसेच त्यांच्या निवासाची सोय करण्याची मागणी आझमी यांनी यावेळी केली. तसेच सरकारने या इमारत दुर्घटनेसाठी कुठल्याही चौकशीचे सोंग करू नये. त्यापेक्षा या इमारतीच्या आणि दक्षिम मध्य मुंबईमधील सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवावा. त्यामधून लोकांना काहीतरी दिलासा मिळेल. अन्यथा केवळ चौकशी होऊन त्याबाबतची माहिती फाईलमध्ये बंद होईल, अशी भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुंबई - दक्षिण मध्य मुंबईततील 19 हजार इमारती धोकादायक असल्याचे गेल्या १० वर्षांपासून ओरडून सांगत आहे. मात्र, त्याकडे यापूर्वीच्या सरकारने आणि आत्ताच्या सेना-भाजप सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामध्ये नाहक बळी जात आहेत. याला मुख्यमंत्री सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे. डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेबाबत ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.

डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल बोलताना अबू आझमी

गेल्या १० वर्षांपासून विधीमंडळ आणि बाहेर देखील धोकादायक इमारतींचा प्रश्न मांडलेला आहे. त्यांचा पुर्नविकास करणे गरजेचे आहे. मात्र, सरकारने आमची ओरड कधीच ऐकली नाही. त्यामुळे आजच्यासारख्या दुर्दैवी घटना घडत आहेत. यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप अबू आझमी यांनी यावेळी केला.

सरकारने दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तातडीने मदत करायला पाहीजे. तसेच त्यांच्या निवासाची सोय करण्याची मागणी आझमी यांनी यावेळी केली. तसेच सरकारने या इमारत दुर्घटनेसाठी कुठल्याही चौकशीचे सोंग करू नये. त्यापेक्षा या इमारतीच्या आणि दक्षिम मध्य मुंबईमधील सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवावा. त्यामधून लोकांना काहीतरी दिलासा मिळेल. अन्यथा केवळ चौकशी होऊन त्याबाबतची माहिती फाईलमध्ये बंद होईल, अशी भितीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Intro:सरकार आमच्या ऐकत नसल्याने अशा दुर्घटना घडतात -अबू आझमी

मुंबई, ता. 16 :


मी विधांमंडळात आणि बाहेरही दक्षिण मध्य मुंबईत 19 हजार इमारती धोकादायक असल्याचे मी मागील दहा वर्षापासून ओरडून सांगतोय, परंतु त्यावर मागील सरकारने आणि आत्ताच्या सेना भाजप सरकारने ही दुर्लक्ष केल्यामुळेच इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडत असून त्यामुळे नाहक बळी जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला.
डोंगरी येथील केसरबाग इमारत दुर्घटनेला केवळ सरकार आणि स्वतः मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप हे त्याने करत यासाठीचा हलगर्जीपणा सर्वसामान्यांना होत असल्याचेही ते म्हणाले.

मी मागील दहा वर्षापासून ओरडून ओरडून सांगतोय के दक्षिण मध्य मुंबईत 19 हजार हून अधिक इमारती धोकादायक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास करणे अत्यंत निकाफीचर आहे. परंतु मागील सरकार आणि हे सरकार ऐकत नाही. त्यामुळे नाहक लोकांचा बळी जात आहे.आज झालेली दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे परंतु यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
या दुर्घटनेत बळी गेले आहेत त्या सर्वांना सरकारने तातडीने मदत केली पाहिजे आणि त्यांच्या निवासाची सोय केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच या इमारत दुर्घटनेतसाठी कोणतीही चौकशी करण्याचे सोंग सरकारने करू नये त्यापेक्षा या इमारतीच्या आणि दक्षिण मध्य मुंबईतल्या सर्व इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आधी सोडवावा त्यातूनच काहीतरी लोकांना दिलासा मिळेल अन्यथा केवळ चौकशा ह्यात फायलींमध्ये बंद पडतील अशी भीतीही त्यांनी 'ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.


Body:सरकार आमच्या ऐकत नसल्याने अशा दुर्घटना घडतात -अबू आझमी


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.