ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : राज्यात आज ५ हजार ५४४ नव्या रुग्णांचे निदान; ८५ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Nov 29, 2020, 8:40 PM IST

आज राज्यात ५ हजार ५४४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख २० हजार ५९ वर पोहोचला आहे. राज्यात आज ८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे.

Corona Review Maharashtra
कोरोना आढावा महाराष्ट्र

मुंबई - आज राज्यात ५ हजार ५४४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख २० हजार ५९ वर पोहोचला आहे. राज्यात आज ८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण ९० हजार ९९७ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ८० हजार ९२६ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ४ हजार ४२२ नमुन्यांपैकी १८ लाख २० हजार ५९ नमुने म्हणजेच, १६.८५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४, १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५, १७ नोव्हेंबरला २ हजार ८४०, २० नोव्हेंबरला ५ हजार ६४०, तर २१ नोव्हेंबरला ५ हजार ७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

मुंबई - आज राज्यात ५ हजार ५४४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख २० हजार ५९ वर पोहोचला आहे. राज्यात आज ८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण ९० हजार ९९७ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ८० हजार ९२६ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ४ हजार ४२२ नमुन्यांपैकी १८ लाख २० हजार ५९ नमुने म्हणजेच, १६.८५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्ण, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४, १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५, १७ नोव्हेंबरला २ हजार ८४०, २० नोव्हेंबरला ५ हजार ६४०, तर २१ नोव्हेंबरला ५ हजार ७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत करणार प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.