ETV Bharat / state

Uday Samant In Davos : दावोसमध्ये 45 हजार कोटींचे सामंजस्य करार; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा

author img

By

Published : Jan 17, 2023, 4:11 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सांमत हे स्वित्झर्लंड येथील दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी गेले आहेत. या बैठकीत महाराष्ट्राने आपला ठसा उमटवत विविध कंपन्यांसोबत सुमारे 45 हजार 700 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. याद्वारे राज्यात सुमारे दहा हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

Industry Minister Uday Sammat In Davos
दावोसमध्ये 45 हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत स्विझरलँडमधील दावोस येथील परिषदेला उपस्थित राहिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दालनाला भेट दिली. या ठिकाणी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.

पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची बाजी : दाओस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतून महाराष्ट्र राज्याला भरभरून गुंतवणूक मिळावी या प्रयत्नात मुख्यमंत्री आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशीच्या बैठकीत अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

१० हजार तरुणांना रोजगार : याबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, आज दाओस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. या ठिकाणी महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत तब्बल ४५,९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांना रोजगार मिळणार आहेत.


कोणत्या कंपन्यांसोबत झाले किती रुपयांचे करार ?
या बैठकीत Greenko energy Projects Pvt.Ltd सोबत १२००० कोटींची गुंतवणूक, Berkshire Hathaway Home Services Orenda India सोबत १६००० कोटींची गुंतवणूक, ICP Investments/ Indus Capital सोबत १६००० कोटींची गुंतवणूक, Rukhi foods सोबत ४८० कोटींची गुंतवणूक तर Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. सोबत १६५० कोटींची गुंतवणूक असे ४५९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आलेत. यावेळी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन आदी उपस्थित होते.

तत्कालीन उद्योगमंत्र्यांनीही केले होते प्रयत्न : स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी मे, 2022 रोजी जागतिक आर्थिक परिषद पडली होती. या परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. यामाध्यमातून राज्यभरातील सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला होता.

हेही वाचा : Union Budget 2023 : मी देखील मध्यमवर्गीय आहे; अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांची स्पष्टोक्ती

मुंबई : जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत स्विझरलँडमधील दावोस येथील परिषदेला उपस्थित राहिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दालनाला भेट दिली. या ठिकाणी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले.

पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची बाजी : दाओस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतून महाराष्ट्र राज्याला भरभरून गुंतवणूक मिळावी या प्रयत्नात मुख्यमंत्री आहेत. त्यानुसार पहिल्याच दिवशीच्या बैठकीत अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

१० हजार तरुणांना रोजगार : याबाबत माहिती देताना उदय सामंत म्हणाले, आज दाओस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. या ठिकाणी महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत तब्बल ४५,९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे १०००० तरूणांना रोजगार मिळणार आहेत.


कोणत्या कंपन्यांसोबत झाले किती रुपयांचे करार ?
या बैठकीत Greenko energy Projects Pvt.Ltd सोबत १२००० कोटींची गुंतवणूक, Berkshire Hathaway Home Services Orenda India सोबत १६००० कोटींची गुंतवणूक, ICP Investments/ Indus Capital सोबत १६००० कोटींची गुंतवणूक, Rukhi foods सोबत ४८० कोटींची गुंतवणूक तर Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd. सोबत १६५० कोटींची गुंतवणूक असे ४५९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आलेत. यावेळी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन आदी उपस्थित होते.

तत्कालीन उद्योगमंत्र्यांनीही केले होते प्रयत्न : स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी मे, 2022 रोजी जागतिक आर्थिक परिषद पडली होती. या परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले होते. यामाध्यमातून राज्यभरातील सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला होता.

हेही वाचा : Union Budget 2023 : मी देखील मध्यमवर्गीय आहे; अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी निर्मला सीतारमण यांची स्पष्टोक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.