ETV Bharat / state

मुंबईत संरक्षक भिंतीने घेतला 22 जणांचा बळी

भिंतीचा काही भाग वाकला असून धोकादायक स्थितीत आहे. यामुळे या परिसरातील इतर घरे देखील सुरक्षेच्या दृष्टीने रिकामी करण्यात आली. आज या नागरिकांना पालिकेच्या शाळेत निवारा देण्यात आला आहे.

author img

By

Published : Jul 3, 2019, 2:24 AM IST

मुंबईत संरक्षक भिंतीने घेतला 22 जणांचा बळी

मुंबई - वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंतच नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. पावसामुळे लवकर झोपेच्या तयारीत असतानाच सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास मालाडच्या पिंपरीपाडा व आंबेडकर नगर वसाहतीवर संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. आणि मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 22 जणांना या दुर्घटनेत आपला नाहक जीव गमवावा लागला. तर 79 जण जखमी झाले तर 15 जणांना उपचार करून सोडण्यात आले.

संरक्षक भिंतीने घेतला 22 जणांचा बळी

पालिकेचा पाणी साठा असलेली टाकी या मालाडच्या टेकडीवर आहे. या टेकडीखालीच या वसाहती वसल्या आहेत. हा भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. टेकडीपर्यँत अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिकेने संरक्षक भिंत उभारली होती. यातील आंबेडकर नगर मध्ये वनविभागाने सर्व्हे देखील केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या संरक्षक भिंतीच्या मध्यभागी असलेल्या भागातच मोठया प्रमाणात पाणी साचले. आणि सोमवारी रात्री पाण्याच्या वेगाने भिंतीचा भाग या वसाहतीवर कोसळला. रात्री 1 च्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तर पहाटे एनडीआरएफचे पथकही बचावकार्यासाठी दाखल झाले. स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दल या सर्वांनी एकत्र येत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

सोलापूरमधील बार्शी येथील वडार समाज मोठ्या संख्येने या भागात वसला आहे. पोटासाठी कडिया काम करून उदरनिर्वाह करणारा हा समाज या घटनेमुळे बेघर झाला आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या भिंतीचा भाग कोसळला कसा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सर्वच स्तरातून चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

भिंतीचा काही भाग अजूनही धोकादायक -

भिंतीचा काही भाग वाकला असून धोकादायक स्थितीत आहे. यामुळे या परिसरातील इतर घरे देखील सुरक्षेच्या दृष्टीने रिकामी करण्यात आली. आज या नागरिकांना पालिकेच्या शाळेत निवारा देण्यात आला आहे. तर लवकरच त्यांचे तात्पुरते पुनर्वसन माहुलमधील पालिकेच्या ट्रांझीस्ट कॅम्प मध्ये करण्यात येणार असल्याचे पी उत्तर विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष विनोद मिश्रा यांनी सांगितले.

मुंबई - वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंतच नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. पावसामुळे लवकर झोपेच्या तयारीत असतानाच सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास मालाडच्या पिंपरीपाडा व आंबेडकर नगर वसाहतीवर संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. आणि मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 22 जणांना या दुर्घटनेत आपला नाहक जीव गमवावा लागला. तर 79 जण जखमी झाले तर 15 जणांना उपचार करून सोडण्यात आले.

संरक्षक भिंतीने घेतला 22 जणांचा बळी

पालिकेचा पाणी साठा असलेली टाकी या मालाडच्या टेकडीवर आहे. या टेकडीखालीच या वसाहती वसल्या आहेत. हा भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. टेकडीपर्यँत अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिकेने संरक्षक भिंत उभारली होती. यातील आंबेडकर नगर मध्ये वनविभागाने सर्व्हे देखील केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या संरक्षक भिंतीच्या मध्यभागी असलेल्या भागातच मोठया प्रमाणात पाणी साचले. आणि सोमवारी रात्री पाण्याच्या वेगाने भिंतीचा भाग या वसाहतीवर कोसळला. रात्री 1 च्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तर पहाटे एनडीआरएफचे पथकही बचावकार्यासाठी दाखल झाले. स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दल या सर्वांनी एकत्र येत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

सोलापूरमधील बार्शी येथील वडार समाज मोठ्या संख्येने या भागात वसला आहे. पोटासाठी कडिया काम करून उदरनिर्वाह करणारा हा समाज या घटनेमुळे बेघर झाला आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या भिंतीचा भाग कोसळला कसा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सर्वच स्तरातून चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

भिंतीचा काही भाग अजूनही धोकादायक -

भिंतीचा काही भाग वाकला असून धोकादायक स्थितीत आहे. यामुळे या परिसरातील इतर घरे देखील सुरक्षेच्या दृष्टीने रिकामी करण्यात आली. आज या नागरिकांना पालिकेच्या शाळेत निवारा देण्यात आला आहे. तर लवकरच त्यांचे तात्पुरते पुनर्वसन माहुलमधील पालिकेच्या ट्रांझीस्ट कॅम्प मध्ये करण्यात येणार असल्याचे पी उत्तर विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष विनोद मिश्रा यांनी सांगितले.

Intro:मुंबई - वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेने दोन वर्षांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंतच नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. पावसामुळे लवकर झोपेच्या तयारीत असतानाच सोमवारी रात्री 12.30 वाजताच्या सुमारास मालाडच्या पिंपरी पाडा व आंबेडकर नगर वसाहतीवर संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. आणि मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत 22 जणांना या दुर्घटनेत आपला नाहक जीव गमवावा लागला. तर 79 जण जखमी झाले तर 15 जणांना उपचार करून सोडण्यात आले.Body:पालिकेचा जलाशय साठा असलेली टाकी या मालाडच्या टेकडीवर आहे. या टेकडीखालीच या वसाहती वसल्या असून हा भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. टेकडीपर्यँत अतिक्रमण होऊ नये म्हणून पालिकेने संरक्षक भिंत उभारली.
यातील आंबेडकर नगर मध्ये वनविभागाने सर्व्हे देखील केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या संरक्षक भिंतीच्या मध्यभागी असलेल्या भागातच मोठया प्रमाणात पाणी साचले. आणि सोमवारी रात्री पाण्याच्या वेगाने भिंतीचा भाग ताडपत्रीवर उभारलेल्या या वसाहतीवर कोसळला. रात्री 1वाजताच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तर पहाटे एनडीआरएफचे पथकही बचावकार्यासाठी दाखल झाले. स्थानिक नागरिक, पोलीस, अग्निशमन दल या सर्वांनी एकत्र येत जखमींना रुग्णालयात दाखल केले.Conclusion:मूळचे सोलापूरमधील बार्शी येथील वडार समाज मोठ्या संख्येने या भागात वसला आहे. पोटासाठी कडिया काम करून उदरनिर्वाह करणारा हा समाज या घटनेमुळे बेघर झाला आहे.
मात्र दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली भिंतीचा भाग कोसळला कसा हा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत सर्वच स्तरातून चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
भिंतीचा काही भाग अजूनही धोकादायक
भिंतीचा काही भाग वाकला असून धोकादायक स्थितीत आहे. यामुळे या परिसरातील इतर घरं देखील सुरक्षेच्या दृष्टीने खाली करण्यात आली.
आज या नागरिकांना पालिकेच्या शाळेत निवारा देण्यात आला आहे. तर लवकरच त्यांचे तात्पुरते पुर्नवसन माहुलमधील पालिकेच्या ट्रांझीस्ट कॅम्प मध्ये करण्यात येणार असल्याचे पी उत्तर विभागाचे प्रभाग समिती अध्यक्ष विनोद मिश्रा यांनी सांगितले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.